शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हे कसले बायो-बबल? गर्भश्रीमंत बीसीसीआयपुढे कोरोनाचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 09:39 IST

अटीतटीचे स्पर्धात्मक सामने खेळताना बायो-बबलमध्ये राहणे ही खेळाडूंच्या मानसिक सामर्थ्याची परीक्षा पाहणारे आहे. विविध देशांच्या खेळाडूंनीही अनेकदा बायो-बबलमध्ये राहणे मानसिकरीत्या आव्हानात्मक असल्याचे जाहीररीत्या स्पष्ट केलेले आहे

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त बुधवारी रात्री समोर आले आणि एकच खळबळ माजली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्याच्या ४ दिवस आधीच भारतीय खेळाडूंना कोरोनाने ‘बाद’ केल्याने पुन्हा एकदा बीसीसीआयने तयार केलेल्या “जैविक कवचा”वर (बायो-बबल) प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाने गाठण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयपीएल, इंग्लंड दौऱ्यात कोरोनाचा प्रश्न उद्भवल्याने बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा आणि इंग्लंड दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. हा अनुभव पाठीशी असताना आणि सध्या कोरोनाचे सावट पूर्णपणे नाहीसे झालेले नसतानाही बीसीसीआय विविध मालिका, दौरे आणि स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न का करत आहे, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडणे स्वाभाविक आहे. यामागे अर्थातच आर्थिक गणित आहे. गेल्या वर्षी बीसीसीआयसाठी ‘सोन्याची अंडे देणारी कोंबडी’ असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे मे महिन्यात अर्ध्यावर स्थगित करण्यात आली होती. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामने खेळविणे अशक्य झाले होते. यावेळी सर्वच विदेशी खेळाडूंनी भारतातील गंभीर स्थिती पाहून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि हा दौराही अखेरचा कसोटी सामना स्थगित करून तात्पुरता संपविण्यात आला. हे दोन मोठे अनुभव पाठीशी असतानाही बीसीसीआयने खेळाडूंच्या जिवाशी खेळणे मात्र सोडले नाही. त्यामागचे कारण  उघड आहे. कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती काही का असेना, क्रीडांगणावर क्रिकेटचे सामने आणि त्यासाठी  दौरे झाले नाहीत, तर बीसीसीआयला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. 

अटीतटीचे स्पर्धात्मक सामने खेळताना बायो-बबलमध्ये राहणे ही खेळाडूंच्या मानसिक सामर्थ्याची परीक्षा पाहणारे आहे. विविध देशांच्या खेळाडूंनीही अनेकदा बायो-बबलमध्ये राहणे मानसिकरीत्या आव्हानात्मक असल्याचे जाहीररीत्या स्पष्ट केलेले आहे. मात्र, त्याकडेही बीसीसीआयने सतत दुर्लक्ष केले. भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेली खेळाडूंमधील स्पर्धाच बीसीसीआयच्या पथ्यावर पडत आहे. जर एखाद्या खेळाडूने कोरोना किंवा बायो-बबलचे कारण देऊन माघार घेतली, तर त्याची जागा घेण्यास दुसरा खेळाडू सज्जच असतो. त्यामुळे खेळाडूही सहजासहजी माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाहीत. बीसीसीआयने कायम, क्रिकेटचे सामने सुरक्षित वातावरणात व्हावेत यासाठी आम्ही कठोर बायो-बबल तयार करत असून, यामध्ये कोरोनाचा शिरकाव होणे खूप कठीण असल्याची भूमिका घेतली होती; पण बीसीसीआयचा हा फुगा आता फुटला आहे. पुढच्याच आठवड्यात आयपीएलचा लिलाव सोहळाही पार पडणार आहे. त्यासाठीही बीसीसीआयने कठोर बायो-बबल तयार करून फ्रेंचाईजींसाठी काही नियमावली तयार केली. मात्र, आता अहमदाबाद येथे विंडीजविरुद्धच्या मालिकेच्या काही दिवसआधीच खेळाडूंना कोरोना झाल्याने, बीसीसीआयच्या क्षमतेवरच प्रश्न निर्माण होत आहेत. अर्थात कोरोना संसर्गाचा प्रश्न फक्त क्रिकेटपुरताच मर्यादित नाही. मुंबईत एएफसी महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. पुण्यात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा सुरू आहे, तर गोव्यात आयएसएल सामने सुरू आहेत. यातील महिला फुटबॉलमध्ये भारतीय संघाला कोरोनाची लागण झाल्याने माघार घ्यावी लागली. हा एक अपवाद वगळता खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे इतर कोणतेही वृत्त समोर आले नाही. याचा अर्थ या सर्व संघांच्या व्यवस्थापनांनी कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही यासाठी “बायो-बबल”ची उत्तम व्यवस्था केलेली आहे.  

अत्यंत श्रीमंत संस्था असलेल्या बीसीसीआयला सक्षम बायो-बबल तयार करण्यात नेमके कुठे अपयश येत आहे, हाच प्रश्न पडतो. वेस्ट इंडिजचा संघ नुकताच अहमदाबादला पोहोचला आहे. त्यांच्या संघातही कोरोनाचे लक्षण आढळण्याची शक्यता अधिक आहे. खेळाडूंना सामने मिळावेत, प्रेक्षकांना खेळाचा आनंद मिळावा, अनेकांचे रोजगार यावर अवलंबून असतात या सर्व गोष्टी मान्य; पण वर्षभर सतत खेळत असलेल्या भारतीय संघाला सध्याच्या दिवसांमध्ये कमी खेळवले तरी कोणाचे काहीच बिघडणार नाही. केवळ एकच गोष्ट बिघडेल ती म्हणजे बीसीसीआयचे आर्थिक गणित. त्यांची तिजोरी सतत भरलेली राहावी यासाठीच सुरू आहे हा खटाटोप.

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघcorona virusकोरोना वायरस बातम्याBCCIबीसीसीआय