शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

आगीचा फायदा कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 03:52 IST

भिवंडीजवळ १६ गोदामे जळून खाक झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला़ प्रत्यक्षात अशा आगीचा फायदा नेमका कोणाला होतो याचा शोध घेणेही आवश्यक आहे़

भिवंडीजवळ १६ गोदामे जळून खाक झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला़ प्रत्यक्षात अशा आगीचा फायदा नेमका कोणाला होतो याचा शोध घेणेही आवश्यक आहे़ मुंबईत मोठा व्यवसाय असणाºया उद्योजकांची बरीचशी गोदामे ठाणे, नवी मुंबई व आसपासच्या परिसरात आहेत़ या गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या वस्तू, कच्चा माल ठेवला जातो़ त्याला हानी पोहोचणार नाही किंवा नुकसान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते़ त्यासाठी सरकारी अधिकारी - कर्मचारी, राजकीय नेत्यांचे खिसे भरले जातात़ तरीही यातील काही गोदामांना दरवर्षी आग लागते़ आर्थिक वर्ष संपण्याआधी अशी गोदामे, कारखाने यांना सर्रास आग लागते़ या आगीत जीवितहानी होत नाही, पण आर्थिक नुकसान मात्र होते़ त्याचा फायदा निश्चितच उद्योजकांना होतो़ विमा कंपन्यांकडून त्यांना रक्कम मिळते़ अशा आगी भविष्यात अनेकांचा बळीही घेऊ शकतात़ तेव्हा आग नेमकी का लागली याची कारणे शोधून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे़ गेल्या महिन्यात अशाच प्रकारे वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगरला आग लागली होती़ त्यातही जीवितहानी झाली नाही़ येथील सर्व झोपड्या अनधिकृत होत्या़ या झोपड्यांवर कारवाई होऊ नये, या हेतूने ही आग लावण्यात आली होती, हे पोलीस तपासात उघडकीस आले़ भिवंडी येथील गोदामांना लागलेली आग भडकण्याचे प्राथमिक कारण म्हणजे तेथे अग्निरोधक यंत्रणा नसणे़ त्यातून सुरक्षेचा मुद्दा पुढे आला़ प्रत्यक्षात तेथील अवैध उद्योगही वाढले आहेत़ ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यावर कारवाईचा निर्णय घेतला आणि राजकीय हस्तक्षेपानंतर बासनातही गुंडाळला. आमच्यावर कारवाईचा प्रयत्न झाल्यानेच ठाण्याच्या याआधीच्या जिल्हाधिकाºयांची आम्ही बदली घडवून आणली, असे सांगण्यापर्यंत या मंडळींची, त्यांच्या पाठीराख्यांची मजल गेली, हे धक्कादायक आहे़ कोणत्या गोदामात कोणत्या स्वरूपाचा किती माल साठवला जातो आहे, याच्या कोणत्याही नोंदी सरकारी यंत्रणांकडे नाहीत. देशात गाजलेल्या तेलगीच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मालही येथेच सापडला होता. यातील एकेका गोदामातील उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. संपूर्ण परिसर अब्जावधीच्या गुंतवणुकीचे केंद्र आहे आणि म्हणूनच तेथील सर्व बेकायदा उद्योगांकडे जितके सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष आहे, तेवढाच येथील राजकीय हस्तक्षेपही मोठा आहे. पण हेच बेकायदा उद्योग आता परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे अशा आगीच्या घटनांची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवी.

टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआग