शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आगीचा फायदा कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 03:52 IST

भिवंडीजवळ १६ गोदामे जळून खाक झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला़ प्रत्यक्षात अशा आगीचा फायदा नेमका कोणाला होतो याचा शोध घेणेही आवश्यक आहे़

भिवंडीजवळ १६ गोदामे जळून खाक झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला़ प्रत्यक्षात अशा आगीचा फायदा नेमका कोणाला होतो याचा शोध घेणेही आवश्यक आहे़ मुंबईत मोठा व्यवसाय असणाºया उद्योजकांची बरीचशी गोदामे ठाणे, नवी मुंबई व आसपासच्या परिसरात आहेत़ या गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या वस्तू, कच्चा माल ठेवला जातो़ त्याला हानी पोहोचणार नाही किंवा नुकसान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते़ त्यासाठी सरकारी अधिकारी - कर्मचारी, राजकीय नेत्यांचे खिसे भरले जातात़ तरीही यातील काही गोदामांना दरवर्षी आग लागते़ आर्थिक वर्ष संपण्याआधी अशी गोदामे, कारखाने यांना सर्रास आग लागते़ या आगीत जीवितहानी होत नाही, पण आर्थिक नुकसान मात्र होते़ त्याचा फायदा निश्चितच उद्योजकांना होतो़ विमा कंपन्यांकडून त्यांना रक्कम मिळते़ अशा आगी भविष्यात अनेकांचा बळीही घेऊ शकतात़ तेव्हा आग नेमकी का लागली याची कारणे शोधून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे़ गेल्या महिन्यात अशाच प्रकारे वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगरला आग लागली होती़ त्यातही जीवितहानी झाली नाही़ येथील सर्व झोपड्या अनधिकृत होत्या़ या झोपड्यांवर कारवाई होऊ नये, या हेतूने ही आग लावण्यात आली होती, हे पोलीस तपासात उघडकीस आले़ भिवंडी येथील गोदामांना लागलेली आग भडकण्याचे प्राथमिक कारण म्हणजे तेथे अग्निरोधक यंत्रणा नसणे़ त्यातून सुरक्षेचा मुद्दा पुढे आला़ प्रत्यक्षात तेथील अवैध उद्योगही वाढले आहेत़ ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यावर कारवाईचा निर्णय घेतला आणि राजकीय हस्तक्षेपानंतर बासनातही गुंडाळला. आमच्यावर कारवाईचा प्रयत्न झाल्यानेच ठाण्याच्या याआधीच्या जिल्हाधिकाºयांची आम्ही बदली घडवून आणली, असे सांगण्यापर्यंत या मंडळींची, त्यांच्या पाठीराख्यांची मजल गेली, हे धक्कादायक आहे़ कोणत्या गोदामात कोणत्या स्वरूपाचा किती माल साठवला जातो आहे, याच्या कोणत्याही नोंदी सरकारी यंत्रणांकडे नाहीत. देशात गाजलेल्या तेलगीच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मालही येथेच सापडला होता. यातील एकेका गोदामातील उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. संपूर्ण परिसर अब्जावधीच्या गुंतवणुकीचे केंद्र आहे आणि म्हणूनच तेथील सर्व बेकायदा उद्योगांकडे जितके सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष आहे, तेवढाच येथील राजकीय हस्तक्षेपही मोठा आहे. पण हेच बेकायदा उद्योग आता परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे अशा आगीच्या घटनांची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवी.

टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआग