शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आगीचा फायदा कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 03:52 IST

भिवंडीजवळ १६ गोदामे जळून खाक झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला़ प्रत्यक्षात अशा आगीचा फायदा नेमका कोणाला होतो याचा शोध घेणेही आवश्यक आहे़

भिवंडीजवळ १६ गोदामे जळून खाक झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला़ प्रत्यक्षात अशा आगीचा फायदा नेमका कोणाला होतो याचा शोध घेणेही आवश्यक आहे़ मुंबईत मोठा व्यवसाय असणाºया उद्योजकांची बरीचशी गोदामे ठाणे, नवी मुंबई व आसपासच्या परिसरात आहेत़ या गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या वस्तू, कच्चा माल ठेवला जातो़ त्याला हानी पोहोचणार नाही किंवा नुकसान होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते़ त्यासाठी सरकारी अधिकारी - कर्मचारी, राजकीय नेत्यांचे खिसे भरले जातात़ तरीही यातील काही गोदामांना दरवर्षी आग लागते़ आर्थिक वर्ष संपण्याआधी अशी गोदामे, कारखाने यांना सर्रास आग लागते़ या आगीत जीवितहानी होत नाही, पण आर्थिक नुकसान मात्र होते़ त्याचा फायदा निश्चितच उद्योजकांना होतो़ विमा कंपन्यांकडून त्यांना रक्कम मिळते़ अशा आगी भविष्यात अनेकांचा बळीही घेऊ शकतात़ तेव्हा आग नेमकी का लागली याची कारणे शोधून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे़ गेल्या महिन्यात अशाच प्रकारे वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगरला आग लागली होती़ त्यातही जीवितहानी झाली नाही़ येथील सर्व झोपड्या अनधिकृत होत्या़ या झोपड्यांवर कारवाई होऊ नये, या हेतूने ही आग लावण्यात आली होती, हे पोलीस तपासात उघडकीस आले़ भिवंडी येथील गोदामांना लागलेली आग भडकण्याचे प्राथमिक कारण म्हणजे तेथे अग्निरोधक यंत्रणा नसणे़ त्यातून सुरक्षेचा मुद्दा पुढे आला़ प्रत्यक्षात तेथील अवैध उद्योगही वाढले आहेत़ ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यावर कारवाईचा निर्णय घेतला आणि राजकीय हस्तक्षेपानंतर बासनातही गुंडाळला. आमच्यावर कारवाईचा प्रयत्न झाल्यानेच ठाण्याच्या याआधीच्या जिल्हाधिकाºयांची आम्ही बदली घडवून आणली, असे सांगण्यापर्यंत या मंडळींची, त्यांच्या पाठीराख्यांची मजल गेली, हे धक्कादायक आहे़ कोणत्या गोदामात कोणत्या स्वरूपाचा किती माल साठवला जातो आहे, याच्या कोणत्याही नोंदी सरकारी यंत्रणांकडे नाहीत. देशात गाजलेल्या तेलगीच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मालही येथेच सापडला होता. यातील एकेका गोदामातील उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. संपूर्ण परिसर अब्जावधीच्या गुंतवणुकीचे केंद्र आहे आणि म्हणूनच तेथील सर्व बेकायदा उद्योगांकडे जितके सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष आहे, तेवढाच येथील राजकीय हस्तक्षेपही मोठा आहे. पण हेच बेकायदा उद्योग आता परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे अशा आगीच्या घटनांची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवी.

टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआग