शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

भाषा विषयांचे मारेकरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 04:30 IST

उच्च शिक्षणातील भाषा विषयांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी होत चालली आहे.

उच्च शिक्षणातील भाषा विषयांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी होत चालली आहे. याचे प्रमाण चिंताजनक आहे. यात मराठी, हिंदीसह सर्वच प्रादेशिक भाषा विषयांचा समावेश आहे. याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची, आपल्या भाषांचा विकास व्हावा, त्यात सातत्याने नवनिर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची मानसिकताच कुणाची दिसत नाही.सध्या व्यावसायिक शिक्षणाची चलती आहे. त्यामुळे दहावी, बारावी झाले की विद्यार्थी प्रथम अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडे वळतात. तेथे संधी मिळाली नाही तर अन्य शाखांचा, शेवटी कला शाखेचा, भाषा विषयाचा विचार होतो. काही जण ठरवून कला शाखेत करिअर करण्याचा प्रयत्न करीत असतीलही; पण त्यांचे प्रमाण नगण्य आहे.आज प्रत्येक भाषा हा अस्मितेचा विषय आहे. मराठी, हिंदी असो की इंग्रजी, सर्वच भाषांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी कमी होत आहेत. त्यामुळे पटसंख्या टिकविण्यासाठी महाविद्यालये अनेक फंडे वापरत आहेत. कारण विद्यार्थ्यांचा कोटा पूर्ण झाला नाही तर दोनमधील एक प्राध्यापक कमी करावा लागतो. त्याची नोकरी, महाविद्यालयाचा लौकिक टिकविण्यासाठीच हा आटापिटा?दुसरी बाब म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्याला केंद्रिभूत मानून तयार केले जात नाहीत. ते सक्षम आणि आव्हानात्मक अभ्यासक्रम नसतात. जास्तीत जास्त विद्यार्थी कसे उत्तीर्ण होतील, हे पाहणारे असतात. त्यामुळे बुद्धिमान विद्यार्थी या विषयाकडे वळत नाहीत. त्याचप्रमाणे आज शिक्षणाच्या प्रत्येक शाखेची सांगड रोजगाराशी घातली जात आहे. भाषा विषयातील शिक्षण म्हणजे शिक्षक, प्राध्यापक होण्यासाठीच असा एक समज आहे. शिक्षक, प्राध्यापक होण्यासाठी किती अर्थपूर्ण दिव्य करावे लागते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे रोजगार देणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जवळचे वाटतात.भाषा विषयातही रोजगार संधी आहेत. मात्र, त्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न कुणी फारसा करीत नाही. भाषांतर, संपादन, दुभाषी अशा अनेक क्षेत्रात संधी आहेत; पण विद्यार्थ्यांना सांगायला हव्यात. अशा संधी त्यांना निर्माण करून द्यायला हव्यात.शिवाजी विद्यापीठात पदवी परीक्षेचा निकाल लागला त्याच्या दुसºयाच दिवशी आॅनलाईन प्रवेशअर्ज भरण्याची मुदत संपली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला एका दिवसात निकाल हातात घेऊन सायबर कॅफेत जाऊन अर्ज करणे शक्य होईल का, याचा साधा विचारही विद्यापीठ प्रशासनाने केला नाही. प्रवेशअर्ज कमी आल्याने काही दिवसांनी पुन्हा जाहिरात देण्यात आली. त्यानंतर दिलेल्या मुदतीत तीन-चार दिवस सर्व्हर डाऊन होता. दरम्यान, आॅफलाईन प्रवेश असलेल्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेतात. पण या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचार केला जात नाही.एकंदरीत विचार करता अभ्यासक्रम तयार करणारी मंडळे, शासन, विद्यापीठ प्रशासन या सर्वांनीच भाषा विषयांकडे लक्ष देऊन होणारी अधोगती टाळायला हवी, अन्यथा भाषा विषयांचे मारेकरी कोण, याचा शोध भाषाभिमान्यांनाच घ्यावा लागेल.- चंद्रकांत कित्तुरे 

टॅग्स :Educationशिक्षण