शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोणता झेंडा घेऊ हाती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 16:34 IST

अल्पावधीत पक्षांतर, उमेदवारी आणि विजय

मिलिंद कुलकर्णीयंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली. त्यातील एक वैशिष्टय म्हणजे अल्पावधीत पक्षांतर, उमेदवारी आणि विजय असे काही ठिकाणी दिसून आले. डॉ.सुजय विखे, डॉ.अमोल कोल्हे ही काही ठळक उदाहरणे आहेत. पालघरचा पॅटर्न तर अनोखा म्हणावा लागेल. अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत एकमेकांविरुध्द लढलेल्या भाजप-सेनेने सार्वत्रिक निवडणुकीत मावळत्या भाजप खासदाराला शिवसेनेची उमेदवारी निवडून आणले. पक्ष, चिन्ह, निष्ठा, कामगिरी या तत्त्व आणि गुणांना निवडणुकांमध्ये काही महत्त्व आहे की नाही, असे वाटावे, अशा या घटना आहेत. सामान्य मतदारांसोबतच राजकीय नेते, अभ्यासक, तज्ज्ञ हे सारे यामुळे चक्रावले आहेत.लोकसभा निवडणुकीतील या साऱ्या प्रकाराचा मोठा प्रभाव आणि परिणाम आॅक्टोबरमधील विधानसभा निवडणुकीत पडण्याची दाट शक्यता आहे. राजकीय मंडळींना हवेचा अंदाज खूप लवकर येतो, असे म्हणतात. त्यादृष्टीने राजकीय पातळीवर हालचालींना वेग येत आहे. नंदुरबारातील विक्रमी खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का आहे. गावीत-नाईक म्हणजे नंदुरबारची काँग्रेस असे समीकरण असताना या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर माणिकराव गावीत नाराज झाले होते. मुंबईत जाऊन त्यांनी प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातील उमेदवारीवरुन धुसफूस सुरु आहे. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक किंवा त्यांचे सुपूत्र साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक हे उमेदवारीचे दावेदार आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच गावीत यांनी भाजपची वाट चोखाळली. भरत गावीत हे काँग्रेसमधील घराणेशाहीचे प्रतीक आहेत. हे वादळ आता राज्यभर अनेक काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांच्या घरांमध्ये घोंगावत आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची लाट असताना विरोधी पक्षात कशासाठी थांबायचे हा नव्या पिढीचा सवाल आहे. या प्रश्नामुळे साठीच्या घरातील दोन्ही काँग्रेसचे नेते त्रस्त आहेत. वाडवडिलांनी उभारलेल्या शैक्षणिक, सहकारी संस्था चालवित असताना अनेक अडचणींचे डोंगर समोर आहेत. भाजप-शिवसेनेचे सरकार केंद्र व राज्यात असताना जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा अनुभव आहे. पक्षाने आतापर्यंत सगळे दिले असताना कठीण काळात पक्षाची साथ सोडायची इच्छा या नेत्यांची नाही. आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करु, एवढा संयम त्यांच्याकडे आहे. परंतु, नव्या पिढीकडे हा संयम नाही. डॉ.सुजय, डॉ.हीना, डॉ.सुभाष भामरे यांच्यासारखे यश त्यांना खुणावते आहे.भारतीय राजकारणात अशी स्थित्यंतराची वेळ अनेकदा आली. काँग्रेसची अनेकदा शकले उडाली. समाजवादी किंवा जनता पक्षाची तीच गत झाली. आयाराम-गयाराम ही संस्कृती बनली. डावे, उजवे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव या विचारसरणीशी बांधील नेते आणि कार्यकर्तेदेखील दुर्मिळ झाले आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारी संस्कृती वेगाने वाढत असल्याने विचार, तत्त्व गुंडाळून ठेवत ‘सत्ताधारी’ व्हायची सगळ्यांना घाई झाली आहे. समयसूचकता, हजरजबाबीपणा, व्यवहार ज्ञान ज्याच्याकडे उत्तम आहे, तो आताच्या राजकारणात यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे झेंडा कोणता हाती घेतला तर फायदा होईल, याचे जो तो समीकरण बनवून आडाखे बांधत असतो. ज्यांना हे जमत नाही, ते उगाच निष्ठा, तत्त्वाचा आग्रह अशा सबबी सांगत कुढत बसतात. कारण राजकारण इतके दूषित झाले आहे की, तेथे सज्जन, सुशील माणसे टिकून राहणे अवघड नव्हे तर अशक्य झालेले आहे. काळाचा महिमा असेच याचे वर्णन करावे लागेल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव