शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

कोणता झेंडा घेऊ हाती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 16:34 IST

अल्पावधीत पक्षांतर, उमेदवारी आणि विजय

मिलिंद कुलकर्णीयंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली. त्यातील एक वैशिष्टय म्हणजे अल्पावधीत पक्षांतर, उमेदवारी आणि विजय असे काही ठिकाणी दिसून आले. डॉ.सुजय विखे, डॉ.अमोल कोल्हे ही काही ठळक उदाहरणे आहेत. पालघरचा पॅटर्न तर अनोखा म्हणावा लागेल. अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत एकमेकांविरुध्द लढलेल्या भाजप-सेनेने सार्वत्रिक निवडणुकीत मावळत्या भाजप खासदाराला शिवसेनेची उमेदवारी निवडून आणले. पक्ष, चिन्ह, निष्ठा, कामगिरी या तत्त्व आणि गुणांना निवडणुकांमध्ये काही महत्त्व आहे की नाही, असे वाटावे, अशा या घटना आहेत. सामान्य मतदारांसोबतच राजकीय नेते, अभ्यासक, तज्ज्ञ हे सारे यामुळे चक्रावले आहेत.लोकसभा निवडणुकीतील या साऱ्या प्रकाराचा मोठा प्रभाव आणि परिणाम आॅक्टोबरमधील विधानसभा निवडणुकीत पडण्याची दाट शक्यता आहे. राजकीय मंडळींना हवेचा अंदाज खूप लवकर येतो, असे म्हणतात. त्यादृष्टीने राजकीय पातळीवर हालचालींना वेग येत आहे. नंदुरबारातील विक्रमी खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का आहे. गावीत-नाईक म्हणजे नंदुरबारची काँग्रेस असे समीकरण असताना या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर माणिकराव गावीत नाराज झाले होते. मुंबईत जाऊन त्यांनी प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातील उमेदवारीवरुन धुसफूस सुरु आहे. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक किंवा त्यांचे सुपूत्र साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक हे उमेदवारीचे दावेदार आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच गावीत यांनी भाजपची वाट चोखाळली. भरत गावीत हे काँग्रेसमधील घराणेशाहीचे प्रतीक आहेत. हे वादळ आता राज्यभर अनेक काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांच्या घरांमध्ये घोंगावत आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची लाट असताना विरोधी पक्षात कशासाठी थांबायचे हा नव्या पिढीचा सवाल आहे. या प्रश्नामुळे साठीच्या घरातील दोन्ही काँग्रेसचे नेते त्रस्त आहेत. वाडवडिलांनी उभारलेल्या शैक्षणिक, सहकारी संस्था चालवित असताना अनेक अडचणींचे डोंगर समोर आहेत. भाजप-शिवसेनेचे सरकार केंद्र व राज्यात असताना जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा अनुभव आहे. पक्षाने आतापर्यंत सगळे दिले असताना कठीण काळात पक्षाची साथ सोडायची इच्छा या नेत्यांची नाही. आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करु, एवढा संयम त्यांच्याकडे आहे. परंतु, नव्या पिढीकडे हा संयम नाही. डॉ.सुजय, डॉ.हीना, डॉ.सुभाष भामरे यांच्यासारखे यश त्यांना खुणावते आहे.भारतीय राजकारणात अशी स्थित्यंतराची वेळ अनेकदा आली. काँग्रेसची अनेकदा शकले उडाली. समाजवादी किंवा जनता पक्षाची तीच गत झाली. आयाराम-गयाराम ही संस्कृती बनली. डावे, उजवे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव या विचारसरणीशी बांधील नेते आणि कार्यकर्तेदेखील दुर्मिळ झाले आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारी संस्कृती वेगाने वाढत असल्याने विचार, तत्त्व गुंडाळून ठेवत ‘सत्ताधारी’ व्हायची सगळ्यांना घाई झाली आहे. समयसूचकता, हजरजबाबीपणा, व्यवहार ज्ञान ज्याच्याकडे उत्तम आहे, तो आताच्या राजकारणात यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे झेंडा कोणता हाती घेतला तर फायदा होईल, याचे जो तो समीकरण बनवून आडाखे बांधत असतो. ज्यांना हे जमत नाही, ते उगाच निष्ठा, तत्त्वाचा आग्रह अशा सबबी सांगत कुढत बसतात. कारण राजकारण इतके दूषित झाले आहे की, तेथे सज्जन, सुशील माणसे टिकून राहणे अवघड नव्हे तर अशक्य झालेले आहे. काळाचा महिमा असेच याचे वर्णन करावे लागेल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव