शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

कोणता झेंडा घेऊ हाती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 16:34 IST

अल्पावधीत पक्षांतर, उमेदवारी आणि विजय

मिलिंद कुलकर्णीयंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली. त्यातील एक वैशिष्टय म्हणजे अल्पावधीत पक्षांतर, उमेदवारी आणि विजय असे काही ठिकाणी दिसून आले. डॉ.सुजय विखे, डॉ.अमोल कोल्हे ही काही ठळक उदाहरणे आहेत. पालघरचा पॅटर्न तर अनोखा म्हणावा लागेल. अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत एकमेकांविरुध्द लढलेल्या भाजप-सेनेने सार्वत्रिक निवडणुकीत मावळत्या भाजप खासदाराला शिवसेनेची उमेदवारी निवडून आणले. पक्ष, चिन्ह, निष्ठा, कामगिरी या तत्त्व आणि गुणांना निवडणुकांमध्ये काही महत्त्व आहे की नाही, असे वाटावे, अशा या घटना आहेत. सामान्य मतदारांसोबतच राजकीय नेते, अभ्यासक, तज्ज्ञ हे सारे यामुळे चक्रावले आहेत.लोकसभा निवडणुकीतील या साऱ्या प्रकाराचा मोठा प्रभाव आणि परिणाम आॅक्टोबरमधील विधानसभा निवडणुकीत पडण्याची दाट शक्यता आहे. राजकीय मंडळींना हवेचा अंदाज खूप लवकर येतो, असे म्हणतात. त्यादृष्टीने राजकीय पातळीवर हालचालींना वेग येत आहे. नंदुरबारातील विक्रमी खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का आहे. गावीत-नाईक म्हणजे नंदुरबारची काँग्रेस असे समीकरण असताना या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर माणिकराव गावीत नाराज झाले होते. मुंबईत जाऊन त्यांनी प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातील उमेदवारीवरुन धुसफूस सुरु आहे. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक किंवा त्यांचे सुपूत्र साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक हे उमेदवारीचे दावेदार आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच गावीत यांनी भाजपची वाट चोखाळली. भरत गावीत हे काँग्रेसमधील घराणेशाहीचे प्रतीक आहेत. हे वादळ आता राज्यभर अनेक काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांच्या घरांमध्ये घोंगावत आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची लाट असताना विरोधी पक्षात कशासाठी थांबायचे हा नव्या पिढीचा सवाल आहे. या प्रश्नामुळे साठीच्या घरातील दोन्ही काँग्रेसचे नेते त्रस्त आहेत. वाडवडिलांनी उभारलेल्या शैक्षणिक, सहकारी संस्था चालवित असताना अनेक अडचणींचे डोंगर समोर आहेत. भाजप-शिवसेनेचे सरकार केंद्र व राज्यात असताना जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा अनुभव आहे. पक्षाने आतापर्यंत सगळे दिले असताना कठीण काळात पक्षाची साथ सोडायची इच्छा या नेत्यांची नाही. आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करु, एवढा संयम त्यांच्याकडे आहे. परंतु, नव्या पिढीकडे हा संयम नाही. डॉ.सुजय, डॉ.हीना, डॉ.सुभाष भामरे यांच्यासारखे यश त्यांना खुणावते आहे.भारतीय राजकारणात अशी स्थित्यंतराची वेळ अनेकदा आली. काँग्रेसची अनेकदा शकले उडाली. समाजवादी किंवा जनता पक्षाची तीच गत झाली. आयाराम-गयाराम ही संस्कृती बनली. डावे, उजवे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव या विचारसरणीशी बांधील नेते आणि कार्यकर्तेदेखील दुर्मिळ झाले आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारी संस्कृती वेगाने वाढत असल्याने विचार, तत्त्व गुंडाळून ठेवत ‘सत्ताधारी’ व्हायची सगळ्यांना घाई झाली आहे. समयसूचकता, हजरजबाबीपणा, व्यवहार ज्ञान ज्याच्याकडे उत्तम आहे, तो आताच्या राजकारणात यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे झेंडा कोणता हाती घेतला तर फायदा होईल, याचे जो तो समीकरण बनवून आडाखे बांधत असतो. ज्यांना हे जमत नाही, ते उगाच निष्ठा, तत्त्वाचा आग्रह अशा सबबी सांगत कुढत बसतात. कारण राजकारण इतके दूषित झाले आहे की, तेथे सज्जन, सुशील माणसे टिकून राहणे अवघड नव्हे तर अशक्य झालेले आहे. काळाचा महिमा असेच याचे वर्णन करावे लागेल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव