शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

गुजरातमध्ये मारली गेलेली दोन हजार अल्पसंख्य माणसे खरोखरीच मारली गेली की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:02 IST

२००२ मध्ये गुजरातेत झालेले गोधरा कांड व त्यानंतरची तेथील दोन हजार मुसलमानांची कत्तल या घटना घडल्याच नाहीत. त्यात सामूहिक बलात्कार झालेच नाहीत. ते थांबविण्यात अपयश आलेल्या तेव्हाच्या मोदी सरकारला वाजपेयींनी, राजधर्म शिकविलाच नाही.

२००२ मध्ये गुजरातेत झालेले गोधरा कांड व त्यानंतरची तेथील दोन हजार मुसलमानांची कत्तल या घटना घडल्याच नाहीत. त्यात सामूहिक बलात्कार झालेच नाहीत. ते थांबविण्यात अपयश आलेल्या तेव्हाच्या मोदी सरकारला वाजपेयींनी, राजधर्म शिकविलाच नाही. गुजरातचे राज्य तेव्हा, नंतर व आताही शांत आणि निर्मळच राहिले आहे. ते रक्तपात व बलात्कार यासारख्या गुन्ह्यांपासून मुक्त आहे. त्या अपराधांसाठी पोलिसांनी व तपासयंत्रणांनी ज्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले ते अपराध प्रत्यक्षात झालेच नाहीत. त्या तपास यंत्रणांचे अहवाल ज्या साक्षीदारांच्या बयानांवरून तयार झाले ते साक्षीदार खोटे तर होतेच शिवाय ते अस्तित्वातही नव्हते.

तात्पर्य, न झालेल्या हत्याकांडासाठी त्या गरीब बिचा-या राज्याला आणि त्याच्या तेव्हाच्या संत प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांना वाजपेयींपासून सा-या देशाने कालपर्यंत दिलेला दोष अकारण होता व त्या राज्यातील धार्मिक सलोख्यावर अन्याय करणारा होता... असा निष्कर्ष त्या दंगलींविषयी न्यायालयांचे आता जाहीर होऊ लागलेले निकाल पाहता कुणाच्याही लक्षात यावे. देशाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्र यांनी आपली न्यायालये स्वच्छ असल्याचे, ती पक्षपाती नसल्याचे आणि प्रसंगी सरकारचीही गय करणारी नसल्याचे प्रमाणपत्र त्यांना नुकतेच तसेही दिले आहे. तात्पर्य, गुजरातमधील संघ-भाजपच्या ज्या पुढाºयांना तेथील दंगली, हत्याकांड व बलात्कार यासाठी देशाने आजवर दोष दिला तो निंद्यच नव्हे तर पश्चात्ताप करावा असा आहे. अहमदाबाद शहरातील गुलबर्ग वसाहतीत तेव्हाचे काँग्रेसचे खासदार अहसान जाफरी यांची इतर ६८ जणांसोबत जाळून हत्या करण्यात आली होती.

तो एका व्यापक धर्मविरोधी राजकीय षड्यंत्राचा भाग होता, असा तपास तेथील यंत्रणा आजवर करीत होत्या. त्या घटनेचा संबंध थेट मोदींपर्यंत पोहचणारा आहे असेही त्या म्हणत होत्या. मात्र आता गुजरातच्या उच्च न्यायालयाने त्या हत्याकांडातील मोदींसोबतच्या सगळ्या ६०ही आरोपींना दोषमुक्त घोषित केले आहे. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सोनिया गोकानी यांच्या निर्देशानुसार त्याने दिला आहे. मुळात न्या. गोकानींचा निकालच अहमदाबाद मेट्रो पोलिटन कोर्टाच्या निकालपत्राच्या आधारावर दिला गेला होता. या सा-याविरुद्ध उच्च न्यायालयात गेलेल्या श्रीमती जाफरी यांची याचिका त्या कोर्टाने फेटाळून लावताना सारेच आरोपी कसे स्वच्छ व निरपराध आहेत हे सांगितले आहे.

असे निकाल पाहिले की मनात येणारा प्रश्न ते खासदार जाफरी आणि त्यांचे ६८ सहकारी जाळले गेले की त्यांनीच स्वत:ला जाळून घेतले? एवढी माणसे जाळली जात असताना तो प्रकार प्रत्यक्ष पाहणारे सगळे साक्षीदार खरे होते की बनावट? गुजरातमध्ये मारली गेलेली दोन हजार अल्पसंख्य माणसे मग खरोखरीच मारली गेली की नाही? त्याविषयीच्या बहुतेक सगळ्याच खटल्यातील आरोपी निर्दोष म्हणून मोकळे सुटत असतील तर ते प्रश्न स्वाभाविकपणेच कुणाच्याही मनात यावे. मालेगाव किंवा समझोता एक्स्प्रेसमधील आरोपी जसे सन्मानपूर्वक सुटले तसाच हाही आपल्या न्यायपद्धतीच्या पक्षपाताचा पुरावा आहे. आरोपी अल्पसंख्य समाजाचे असतील तर त्यांना शिक्षा सुनवायची आणि बहुसंख्य व हिंदुत्ववादी वर्गाचे असतील तर त्यांना निर्दोष सोडायचे ही अलीकडच्या निकालांची तºहा पाहिली की आपल्या न्यायमूर्तींनी घटनेची शपथ घेतली आहे की धर्माची असाच प्रश्न आपल्याला पडावा. हा प्रकार नुसता अन्यायाचा नाही, तर न्यायमूर्तीच न्यायासनाची प्रतिष्ठा घालवीत असल्याचे सांगणारा आहे. अशा निकालांची शहानिशा आता एखाद्या आयोगाद्वारे केली जाणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाGujarat Riots 2002गुजरात दंगल 2002GujaratगुजरातCourtन्यायालय