शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

गुजरातमध्ये मारली गेलेली दोन हजार अल्पसंख्य माणसे खरोखरीच मारली गेली की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:02 IST

२००२ मध्ये गुजरातेत झालेले गोधरा कांड व त्यानंतरची तेथील दोन हजार मुसलमानांची कत्तल या घटना घडल्याच नाहीत. त्यात सामूहिक बलात्कार झालेच नाहीत. ते थांबविण्यात अपयश आलेल्या तेव्हाच्या मोदी सरकारला वाजपेयींनी, राजधर्म शिकविलाच नाही.

२००२ मध्ये गुजरातेत झालेले गोधरा कांड व त्यानंतरची तेथील दोन हजार मुसलमानांची कत्तल या घटना घडल्याच नाहीत. त्यात सामूहिक बलात्कार झालेच नाहीत. ते थांबविण्यात अपयश आलेल्या तेव्हाच्या मोदी सरकारला वाजपेयींनी, राजधर्म शिकविलाच नाही. गुजरातचे राज्य तेव्हा, नंतर व आताही शांत आणि निर्मळच राहिले आहे. ते रक्तपात व बलात्कार यासारख्या गुन्ह्यांपासून मुक्त आहे. त्या अपराधांसाठी पोलिसांनी व तपासयंत्रणांनी ज्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले ते अपराध प्रत्यक्षात झालेच नाहीत. त्या तपास यंत्रणांचे अहवाल ज्या साक्षीदारांच्या बयानांवरून तयार झाले ते साक्षीदार खोटे तर होतेच शिवाय ते अस्तित्वातही नव्हते.

तात्पर्य, न झालेल्या हत्याकांडासाठी त्या गरीब बिचा-या राज्याला आणि त्याच्या तेव्हाच्या संत प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांना वाजपेयींपासून सा-या देशाने कालपर्यंत दिलेला दोष अकारण होता व त्या राज्यातील धार्मिक सलोख्यावर अन्याय करणारा होता... असा निष्कर्ष त्या दंगलींविषयी न्यायालयांचे आता जाहीर होऊ लागलेले निकाल पाहता कुणाच्याही लक्षात यावे. देशाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्र यांनी आपली न्यायालये स्वच्छ असल्याचे, ती पक्षपाती नसल्याचे आणि प्रसंगी सरकारचीही गय करणारी नसल्याचे प्रमाणपत्र त्यांना नुकतेच तसेही दिले आहे. तात्पर्य, गुजरातमधील संघ-भाजपच्या ज्या पुढाºयांना तेथील दंगली, हत्याकांड व बलात्कार यासाठी देशाने आजवर दोष दिला तो निंद्यच नव्हे तर पश्चात्ताप करावा असा आहे. अहमदाबाद शहरातील गुलबर्ग वसाहतीत तेव्हाचे काँग्रेसचे खासदार अहसान जाफरी यांची इतर ६८ जणांसोबत जाळून हत्या करण्यात आली होती.

तो एका व्यापक धर्मविरोधी राजकीय षड्यंत्राचा भाग होता, असा तपास तेथील यंत्रणा आजवर करीत होत्या. त्या घटनेचा संबंध थेट मोदींपर्यंत पोहचणारा आहे असेही त्या म्हणत होत्या. मात्र आता गुजरातच्या उच्च न्यायालयाने त्या हत्याकांडातील मोदींसोबतच्या सगळ्या ६०ही आरोपींना दोषमुक्त घोषित केले आहे. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सोनिया गोकानी यांच्या निर्देशानुसार त्याने दिला आहे. मुळात न्या. गोकानींचा निकालच अहमदाबाद मेट्रो पोलिटन कोर्टाच्या निकालपत्राच्या आधारावर दिला गेला होता. या सा-याविरुद्ध उच्च न्यायालयात गेलेल्या श्रीमती जाफरी यांची याचिका त्या कोर्टाने फेटाळून लावताना सारेच आरोपी कसे स्वच्छ व निरपराध आहेत हे सांगितले आहे.

असे निकाल पाहिले की मनात येणारा प्रश्न ते खासदार जाफरी आणि त्यांचे ६८ सहकारी जाळले गेले की त्यांनीच स्वत:ला जाळून घेतले? एवढी माणसे जाळली जात असताना तो प्रकार प्रत्यक्ष पाहणारे सगळे साक्षीदार खरे होते की बनावट? गुजरातमध्ये मारली गेलेली दोन हजार अल्पसंख्य माणसे मग खरोखरीच मारली गेली की नाही? त्याविषयीच्या बहुतेक सगळ्याच खटल्यातील आरोपी निर्दोष म्हणून मोकळे सुटत असतील तर ते प्रश्न स्वाभाविकपणेच कुणाच्याही मनात यावे. मालेगाव किंवा समझोता एक्स्प्रेसमधील आरोपी जसे सन्मानपूर्वक सुटले तसाच हाही आपल्या न्यायपद्धतीच्या पक्षपाताचा पुरावा आहे. आरोपी अल्पसंख्य समाजाचे असतील तर त्यांना शिक्षा सुनवायची आणि बहुसंख्य व हिंदुत्ववादी वर्गाचे असतील तर त्यांना निर्दोष सोडायचे ही अलीकडच्या निकालांची तºहा पाहिली की आपल्या न्यायमूर्तींनी घटनेची शपथ घेतली आहे की धर्माची असाच प्रश्न आपल्याला पडावा. हा प्रकार नुसता अन्यायाचा नाही, तर न्यायमूर्तीच न्यायासनाची प्रतिष्ठा घालवीत असल्याचे सांगणारा आहे. अशा निकालांची शहानिशा आता एखाद्या आयोगाद्वारे केली जाणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाGujarat Riots 2002गुजरात दंगल 2002GujaratगुजरातCourtन्यायालय