शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

...गटस्थापना केली काय किंवा पक्षांतर केले काय, त्यांचे अस्वस्थपण कायमच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:49 IST

काही माणसे कोणत्याही पक्षात असली तरी अस्वस्थच असतात. पक्षातले व सत्तेतले सर्वोच्च स्थान मिळेपर्यंत त्यांच्या जीवाला चैन नसते. नारायण राणे हे तसे नेते आहेत. ते सेनेत असताना अस्वस्थ होते, काँग्रेसमध्येही स्वस्थ नव्हते आणि उद्या ते भाजपात गेले तरी त्यांची अस्वस्थता त्यांची सोबत करणारच आहे.

काही माणसे कोणत्याही पक्षात असली तरी अस्वस्थच असतात. पक्षातले व सत्तेतले सर्वोच्च स्थान मिळेपर्यंत त्यांच्या जीवाला चैन नसते. नारायण राणे हे तसे नेते आहेत. ते सेनेत असताना अस्वस्थ होते, काँग्रेसमध्येही स्वस्थ नव्हते आणि उद्या ते भाजपात गेले तरी त्यांची अस्वस्थता त्यांची सोबत करणारच आहे. त्यांच्या स्वस्थतेचा एकमेव काळ त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा आहे. सध्या फडणवीस त्यांच्या पदावर ठाम आहेत आणि मोदींसह संघ त्यांच्यामागे ठाम आहे. राण्यांना त्या पक्षात एखादे मंत्रिपद फारतर मिळेल. शिवाय बाहेरून आलेल्यांना संघ परिवार कसा कस्पटासमान वागवतो हेही मग त्यांना कळेल. मी आणि मीच केवळ (फारतर माझी मुले) कर्तबगार आणि बाकीचे सारे वेठबिगार ही वृत्ती ज्यांच्यात असते त्यांना अनुयायी वा सहकारी चालत नाहीत त्यांना नोकरच लागत असतात. राण्यांना ते सेनेत मिळाले नाहीत, काँग्रेसमध्ये मिळाले नाहीत आणि भाजपातही मिळायचे नाहीत. त्यामुळे त्यांनी गटस्थापना केली काय किंवा पक्षांतर केले काय, त्यांचे सध्याचे संतप्त अस्वस्थपण कायमच राहणार आहे. सेनेत त्यांना बाळासाहेब सांभाळत. काँग्रेसमध्ये त्यांना सांभाळणारे कुणी नव्हते. भाजपचे नेते बाहेरच्यांचे फारसे लाड करीत नाहीत. सेनेचे जे मंत्री महाराष्ट्रात किंवा रालोआचे जे भाजपबाह्य मंत्री केंद्रात आहेत त्यांच्याजवळ महत्त्वाची खाती सोडा, पण सांगता येण्याजोगेही काही नाही. एकचालकानुवर्ती म्हणून ओळखल्या जाणा-या संघटनेत दुसरे सारे अनुयायी किंवा आज्ञाधारक असतात. त्या संघटनेला दुसरा आज्ञेकरी चालत नाही आणि राण्यांना आज्ञेखेरीज काही बोलता येत नाही. शिवाय सत्तेत शिरण्यामागे अनेकांचे अनेक हेतू असतात. काहींना त्यांच्या संस्था सांभाळायच्या असतात, काहींना पदे तर काहींना इस्टेटी. त्यातही ज्यांच्या इस्टेटी मोठ्या व सत्तेत आल्यानंतर जमलेल्या असतात त्यांना तसे करणे व्यक्तिगत कारणासाठीही भाग असते. विदर्भातील मेघे आणि देशमुखांपासून मुंबई-पुण्याकडील अनेक काँग्रेसजनांनी भाजपमध्ये शिरण्याची जी घाई एवढ्यात केली तिची कारणे जनतेला कळणारी आहेत. अशा पुढाºयांच्या गर्जनाच तेवढ्या मोठ्या असतात. मात्र त्यांचे पोकळपण त्यांनाही कळले असते. राणे काँग्रेसमधून बाहेर पडले तरी त्या पक्षाच फारसे नुकसान आता व्हायचे नाही आणि ते राहिले तरी त्यांची मदत पक्षाला कधी व्हायची नाही. स्वत:चे व स्वत:साठी राजकारण करणाºया पुढाºयांचा इतरांना फारसा फायदा व्हायचाही नसतो. त्यांच्या भालदार-चोपदारांच्या अंगावर भपकेबाज पोशाख दिसले तरी अखेर ते पुढाºयाचे नुसते अंगरक्षकच असतात. तात्पर्य, राण्यांच्या गटस्थापनेत वा नव्या घटस्थापनेत महत्त्वाचे वाटावे वा दिसावे असे काही असणार नाही. काँग्रेस पक्षाने त्यांचा विचार करून आपले डोके शिणविण्यात त्यामुळे फारसा अर्थ नाही. त्याखेरीज आपले बळ वाढविण्यावर भर द्यावा आणि राण्यांमुळे फडणवीसांची काळजी किती वाढते ते पाहून आपली करमणूकही त्या पक्षाने करून घ्यावी. पक्षांतर हे भारतीय राजकारणाचे गेल्या काही दशकांतले महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. ही पक्षांतरे का होतात आणि कशासाठी ती करवून घेतली जातात हा राजकारणाच्या चांगल्या अध्ययनाचा विषय आहे. काही माणसे विचारांसाठी ते करतात तर बरेच जण कसल्या तरी प्राप्तीसाठी त्याचा अवलंब करतात. त्यातून राण्यांसारखा नेता एकामागोमाग एक पक्ष बदलत असेल आणि सोडलेल्या पक्षावर टीकास्त्र सोडण्याचे काम करीत असेल तर त्याचे पक्षांतर फारसे विचारण्यात घेण्यासारखेदेखील नसते हे येथे नोंदवायचे.