शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

अमृतपाल सिंग कुठे आहे? याचा छडा काही दिवसांत लागेलच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 08:49 IST

इतर काही साथीदार पंजाबमध्ये अटकेत आहेत. त्यांच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शस्त्रांच्या परवान्याची तपासणी केली जात आहे.

पंजाबमध्ये फुटीरवाद्यांनी घडविलेल्या हिंसाचाराची आठवण करून देणारा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग व त्याच्या साथीदारांविरुद्ध केंद्र व राज्याच्या पाेलिसांनी उघडलेल्या मोहिमेचे मनापासून स्वागत करायला हवे. गेले चार दिवस पंजाबमधील इंटरनेट व मोबाइल सेवा बंद करून अमृतपालच्या ‘वारिस पंजाब दे’ संघटनेची कंबर तोडण्याची ही कारवाई अजून पूर्ण झालेली नाही. अमृतपाल सिंगला अटक झाली की नाही, याबद्दल बराच संभ्रम आहे. शनिवारी त्याला नाट्यमय पाठलाग करून अटक करण्यात आल्याचे आधी सांगण्यात आले आणि नंतर रात्री उशिरा तो पोलिसांच्या तावडीतून सुटून फरार झाल्याचे स्पष्टीकरण दिले गेले. त्याच्या चार प्रमुख साथीदारांना मात्र अटक करून आसाममध्ये हलविण्यात आले आहे. इतर काही साथीदार पंजाबमध्ये अटकेत आहेत. त्यांच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शस्त्रांच्या परवान्याची तपासणी केली जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे, अमृतपाल सिंगला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयची फूस असावी असा संशय असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा आता या प्रकरणात उतरणार आहे. राज्य सरकारला सोबत घेऊन केंद्र सरकारने उचललेल्या या पावलांची प्रतीक्षा होती. या विषयावर देशभर व देशाबाहेरही खूप चर्चा झाली. गेल्या फेब्रुवारीच्या शेवटी अमृतसर जिल्ह्यात पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अजनाला पोलिस ठाण्यावर अपहरणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीची सुटका करण्यासाठी शस्त्रधारी हजारोंचा जमाव चालून गेला होता. पंजाब पोलिसांची यंत्रणा त्या जमावाच्या दांडगाईपुढे झुकली व त्या आरोपीची दुसऱ्या दिवशी सुटका झाली. त्या जमावात अमृतपाल सिंगच्या ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचे लोक होते. ही संघटना खलिस्तानची मागणी करते आणि आताच्या कारवाईनंतर संशय आहे, की भारताबद्दल आकस असलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयसह अन्य काही आंतरराष्ट्रीय संघटनांची अमृतपाल सिंग व त्याच्या कारवायांना फूस असावी.

आयएसआयने फुटीरवाद्यांना पंजाबमध्ये अशी फूस देण्याचे हे काही पहिले प्रकरण नाही. तसाही पंजाब प्रांत आपल्या धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी ओळखला जातो. एका प्रमाणाबाहेर दिल्लीचा हस्तक्षेप पंजाबी लोकांना आवडत नाही. त्याचा गैरफायदा अमृतपाल सिंग यांच्यासारखे फुटीर नेते व आयएसआय घेत असतात. तो सक्रिय झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये ड्राेनद्वारे ड्रग टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर उजेडात आले आहेत. अमृतपालची संघटना मादक द्रव्याच्या तस्करीत गुंतलेल्यांच्या माध्यमातूनच विस्तार करीत असल्याचेही दिसून आले आहे. तसे नसते तर दुबईमध्ये चुलत्याचा वाहतूक व्यवसाय सांभाळणाऱ्या एका तरुणाला अचानक धर्माची आठवण आली नसती आणि तो कट्टर धार्मिक विचारधारा पुढे नेण्यासाठी हाती शस्त्र घेऊन तयार झाला नसता. थेट पोलिसांवर चालून जाण्याची हिंमत त्याने दाखवली नसती. तो जर्नेलसिंग भिंद्रनवाले याची दुसरी आवृत्ती असल्याचा प्रचारही याच आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असावा. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने अमृतपाल सिंग प्रकरण अधिक गंभीरपणे हाताळण्याचे ठरवलेले दिसते.

अमृतपाल सिंगला अटक झाली असावी आणि त्याचे पडसाद उमटू नयेत यासाठी त्याला अज्ञात स्थळी हलविण्यात आले असावे, असे मानणारा मोठा वर्ग आहे. तथापि, अशा विषयांची जाहीर चर्चा करता येत नाही. सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले व योग्य ती पावले उचलण्यात आली, एवढेच सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे. पंजाबमध्ये फुटीरवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू होताच ब्रिटन तसेच अमेरिकेत भारतीय दुतावासासमोर निषेध नोंदविण्यात आला. ब्रिटनमध्ये तिरंगा ध्वजाला हात लावला गेला, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही घटना घडताच राजधानी दिल्लीत भारत सरकारने ब्रिटन दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून कडक शब्दात जाब विचारला हे बरे झाले. दहशतवादी हल्ले, विमान अपहरण, ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या, देशभर शीखविरोधी दंगली अशाप्रकारे पंजाबने दिलेल्या जखमांचे व्रण आजही स्मरणात आहेत. त्या प्रकारांची पुनरावृत्ती घडवू शकेल अशा छोट्यामोठ्या हालचालीदेखील गंभीरपणे घेण्याची आणि या विषवल्ली फोफावण्याआधीच उपटून काढण्याची आवश्यकता आहे. अमृतपाल सिंग कुठे आहे, याचा छडा काही दिवसांत लागेलच. तथापि, पंजाबमधील अटकसत्राच्या रूपाने सरकारने सुरुवात केली, हे महत्त्वाचे.

टॅग्स :Punjabपंजाब