शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

‘शंभर पायऱ्यांच्या शिडी’वर तुम्ही कुठे उभे आहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 08:52 IST

आपण मध्यमवर्गीयांना गरीब आणि अगदी वरच्या पातळीवर असलेल्यांना मध्यमवर्गीय म्हणत आहोत. या गैरसमजातून आपले सरकार कधी मुक्त होईल?

- योगेंद्र यादव(राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया)

शिक्षक असताना माझ्या विद्यार्थ्यांसमवेत मी बऱ्याचदा एक प्रश्नरूप खेळ खेळायचो. मी त्यांना शंभर पायऱ्या असलेल्या एका उंच शिडीची कल्पना करायला सांगायचो. ‘देशातील सर्वांत गरीब व्यक्ती पहिल्या आणि सर्वांत श्रीमंत व्यक्ती शंभराव्या पायरीवर असेल तर तुमचे कुटुंब कोणत्या बरे पायरीवर असेल?’- असा प्रश्न मी त्यांना विचारायचो. त्यांची उत्तरे आली की, मी त्यांना देशभरातील प्रत्यक्ष आकडे दाखवत असे. ते पाहून बहुधा माझे विद्यार्थी चक्रावून जात. यातूनच त्या विद्यार्थ्यांचा ‘भारताचा शोध’ चालू व्हायचा.

२०२३-२४ सालातील ग्रामीण आणि शहरी भारतातील कौटुंबिक उत्पन्नाचे आकडे भारत सरकारने नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. याला ‘हाउसहोल्ड कंजप्शन एक्सपेंडिचर सर्व्हे’ असे म्हणतात. म्हणजे घरगुती उपभोग्य वस्तूंवरील खर्चाची पाहणी. देशातील सर्वाधिक विश्वसनीय स्रोतांत या सर्वेक्षणाचा समावेश होतो आणि सरकारची बहुतांश धोरणे त्यावरच आधारलेली असतात. 

चला तर मग, याच आकड्यांच्या साहाय्याने ‘भारताचा शोध’ हा खेळ खेळूया. कृष्णन साहेबांच्या घरापासूनच सुरुवात करू. सरकारी बँकेत बढती मिळून नुकतेच ते शाखाधिकारी झालेत. त्यांचे मासिक उत्पन्न सव्वा लाख आहे. त्यांच्या पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना दरमहा ३५ हजार पगार मिळतो. दोन मुले आहेत. या कुटुंबाने पाचेक वर्षांपूर्वी स्वत:चा फ्लॅट घेतला. एक छोटी कार आहे. मुलाकडे मोटारसायकल आहे. बेडरूममध्ये एसी आहे. त्यांच्याकडे घरकामासाठी येणारी कांता दरमहा ८ हजार कमावते.

कांताचा नवरा सुरेश ड्रायव्हर आहे. त्याला महिना १५ हजार पगार आहे. हे दोघे आपल्या तीन मुलांसह एका भाड्याच्या घरात राहून एव्हढ्या पैशात सगळे भागवत असतात. यंदा स्कूटर घेणार आहेत. हे एक कष्टकरी कुटुंब आहे. कृष्णन साहेबांच्या बँकेत खन्ना साहेबांचे खाते आहे. खन्नांची एक छोटीशी फॅक्टरी आहे. दरमहा अडीच-तीन लाख रुपये कमावतात. घरी पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई असते. मोठे घर, दोन गाड्या आहेत. खाऊन-पिऊन सुखी परिवार आहे; पण ते खानदानी श्रीमंत मात्र नाहीत.

प्रचलित भाषेत कृष्णन यांना मध्यमवर्गीय, खन्ना यांना उच्च मध्यमवर्गीय आणि कांताला गरीब म्हटले जाईल. शंभर पायऱ्यांच्या शिडीवर त्यांची जागा कुठे असेल? बहुधा आपण कांताला २० व्या पायरीवर ठेवू, कृष्णन यांना ५० ते ६० च्या दरम्यान कुठेतरी आणि खन्ना साहेबांना ८०-९० व्या पायरी दरम्यान. परंतु मित्रहो, सत्य परिस्थितीत हा अंदाज सपशेल चुकत आहे.

ताज्या आकड्यानुसार, शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांचा (मध्यमवर्ग म्हणजे ४० ते ६० या दरम्यानच्या पायरीवरचा वर्ग) व्यक्तीगणिक सरासरी मासिक खर्च ४००० रुपयांहून कमी आहे. याचा अर्थ वीस-पंचवीस हजारांत चार-पाच लोकांचे कुटुंब चालवणारे कांता-सुरेश हेच शहरातील खरे मध्यमवर्गीय आहेत. प्रत्येक व्यक्तीमागे जे दरमहा ३००० रुपयेही खर्च करू शकत नाहीत, ते शहरी भागात २० व्या पायरीवर आहेत.

गेल्या वर्षीच्या आकड्यांनुसार प्रत्येक व्यक्तीमागे २०,००० रुपयांहून अधिक खर्च करू शकणारे लोक शहरी लोकसंख्येच्या सर्वांत वरच्या ५ टक्क्यात मोडतात. व्यक्तिगणिक ३० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करणाऱ्या कुटुंबांचा समावेश सर्वांत संपन्न एक टक्क्यात होतो. म्हणजे प्रत्यक्ष आकड्यानुसार, कृष्णन साहेब ९५ व्या पायरीवर आणि खन्ना तर चक्क सर्वांत वरच्या म्हणजे शंभराव्या पायरीवर उभे आहेत! 

ग्रामीण भागात तर परिस्थिती याहून बिकट असणार. प्रत्येक व्यक्तीमागे ७ हजार रुपये खर्च करण्याची ऐपत असलेल्या (पाच जणांच्या कुटुंबाचे ३५,००० हून अधिक उत्पन्न असलेल्या) पूर्णतः ग्रामीण कुटुंबाचा समावेश देशातील सर्वोच्च १०% संपन्न कुटुंबात होतो. ग्रामीण भागात पाच लोकांचे एखादे कुटुंब फक्त वीसेक हजारांत गुजराण करीत असले तरी ते मध्यमवर्गीय म्हणवले जाईल. भारतातील सर्वांत गरीब कुटुंबे सहा माणसांची गुजराण आजही दरमहा केवळ १० हजारांत करतात. शिवाय ही सगळ्या देशाची एकत्रितपणे काढलेली सरासरी आहे.

राज्यांचा स्वतंत्रपणे विचार केला तर छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, आसाम आणि पूर्व उत्तर प्रदेशातील परिस्थिती अधिकच शोचनीय आहे. या भागात तर अर्धीसुद्धा कुटुंबे दरमहा १५ हजारांहून अधिक खर्च करू शकत नसतील.‘भारताचा शोध’ नावाचा हा खेळ मी असंख्य वेळा खेळलोय. तुलनात्मकदृष्ट्या संपन्न अशा बुडबुड्यात राहणाऱ्या शहरी भारतीयाला एक साधारण भारतीय माणूस कोणत्या परिस्थितीत आपले जीवन ढकलत आहे याची मुळीच कल्पना नाही. खरोखरचा गरीब माणूस दिसेनासाच झालाय. आपण मध्यमवर्गीयांना गरीब समजत आहोत आणि अगदी वरच्या पातळीवर असलेल्यांना मध्यमवर्गीय म्हणत आहोत. या गोड गैरसमजातून आपला शासक वर्ग कधी बरे मुक्त होईल? 

    yyopinion@gmail.com

टॅग्स :Indiaभारत