शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या रस्त्यालगतची झाडं, त्यावरची पाखरं कुठे उठून गेली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:59 IST

उड्डाणपुलं बांधून आणि गावांचा स्पर्श टाळून लोकांना या शहराहून त्या शहराकडे जायची घाई झालीय. त्या धांदलीत काय काय हरवतंय गावातलं ?

-बालाजी सुतार (कवी-कथाकार)एका ओळखीच्या माणसाचं सडकेवर चहा-नाश्त्याचं दुकान होतं. काही वर्षाआधी ते छान चालायचं. गावालगत सडकेवरल्या चौकाची मोक्याची जागा. कितीतरी वाहनं इथल्या शेडवजा हॉटेलसमोर थांबायची. चहासाठी किंवा पोहे-भजी अशा किरकोळ नाश्त्यासाठी.

शेजारी पान-सिग्रेटची काही दुकानं, उन्हाळ्यात उसाच्या रसाची दुकानं. थांबलेल्या गाड्यांतली माणसं काहीबाही घ्यायची-खायची आणि पुढे आपल्या रस्त्याने निघून जायची. एकदोन दुकानं गाड्यांच्या चाकांत हवा भरण्याची आणि पंक्चर काढण्याची. ही सगळीच दुकानं बऱ्यापैकी चालायची तो काळ तीन-चार वर्षांआधीचा. मग एकेदिवशी गावाजवळच्या या फाट्यावर उड्डाणपुलाचं काम चालू झालं. 

जेसीबीसारखी अवाढव्य यंत्रं आली, धुराळ्याचे प्रचंड लोट उठायला लागले. आपसूकच वाहनं तात्पुरत्या काढून दिलेल्या वळणरस्त्याने जायला लागली. फाट्यावरच्या चौकातल्या धंद्यावर निर्वाह असणाऱ्या या दुकानांचे धंदे इतके थंडावले की इथली माणसं मनातल्या मनात भयाने गारठली. आता निदान वर्ष-दोन वर्ष तरी इथे धंदे चालणार नाहीत, हे कळून आलेल्या माणसांची त्यांच्या दुकानांसकट सैरभैर पांगापांग झाली.

हे सडकेलगतच्या कैक गावांच्या फाट्यांवर घडत राहतं. सडकेलगतच्या हॉटेल दुकानांची एक 'ईको-सिस्टम' असते, ती तिथल्या वाहत्या रहदारीच्या जिवांवर जिवंत असते. उड्डाणपुलं बांधून आणि दरम्यानच्या गावांचा स्पर्श अजिबात टाळून लोकांना वेगाने या शहराहून त्या शहराकडे जायला लावण्याने वर्षानुवर्षांची ही ईको-सिस्टम खलास होते. आणि हे खलास होणं फक्त धंद्या-दुकानांबद्दलच घडत नाही.

माझ्या गावापासून दोनतीन किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये दहाबारा बारीकशी गावं आहेत. एका रस्त्यावर माझ्याच वयाचं एक चिंचेचं झाड होतं. तशी खूप झाडं होती खरं तर रस्तोरस्ती. पण चिंचेचं झाड माझ्या लक्षात राहायचं कारण म्हणजे ते ज्या वाटेवर होतं, तिकडच्या एका गावाला वडिलांच्या कामासाठी मला खूप वेळा जावं लागायचं. वडिलांची एक भली मजबूत आणि उंचच उंच सायकल चालवत मी तिकडे जायचो. जाताना त्या चिंचेजवळ थांबून मी तिची कोवळी पानं खायचो.

सायकल चालवून दमून जाताना कोरडा पडलेला घसा ओला करण्याचा हा एक अतोनात आवडता प्रकार होता. हळूहळू त्या झाडावर माझा जीव जडत गेला. पुढे पुढे त्या रस्त्यावरून मोटारीने जायची सोय झाली, तेव्हा तिथून जाताना एसटीतूनही खिडकीबाहेरून मागे चाललेल्या त्या चिंचेकडे मी प्रेमाने बघत राहायचो.

आत्ता वर्षभरामागे, त्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम निघालं, आणि सबंध रस्त्याकडेच्या झाडांची सर्रास कत्तल केली गेली. त्यात ते माझं चिंचेचं झाडही शहीद झाल्याचं दिसलं, तेव्हा काही दिवस मी अतिशय हळहळलो. ही हळहळ त्या एकट्या झाडासाठी अर्थातच नव्हती. 

बारीकमोठ्या रोपा-झुडपांपासून थेट चार माणसांच्या कवळ्यात मावणार नाहीत असले बुंधे असलेली, कित्येक पिढ्यांच्या मुलामाणसांवर जीव लावून असलेली कित्येक झाडं असल्या कारवायांमध्ये निघृणपणे संपवली जातात, तेव्हा त्या झाडांच्या बुंध्या फांद्यावर असलेली किड्या-मुंग्यांची, पाखरा-पक्ष्यांचीही नैसर्गिक ईको-सिस्टम संपवली जाते. यातलं क्रौर्य आपल्या लक्षात येत नाही.

रस्त्यालगतची दुकानं उठलेली पटकन डोळ्यात भरतं. रस्त्यालगतची झाडं आणि त्यावरची पाखरं कुठे उठून गेली याची चिंता ना सरकार करतं, ना रस्त्यावरून भरधाव जाणारी माणसं करतात..majhegaane@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Where did roadside trees and birds disappear to?

Web Summary : Roadside businesses and ecosystems vanish due to development. Flyovers bypass villages, impacting local economies and nature. Trees felled for roads destroy habitats, unnoticed by authorities or passersby.
टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यNatureनिसर्ग