शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘अदृश्य’ झालेल्या मुलांच्या शोधात स्त्रिया जेव्हा वणवण भटकतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:58 IST

हुकूमशाही किंवा टोकाच्या राजकीय अस्थिर देशांमधल्या सरकारी यंत्रणाच माणसांना ‘गायब’ करतात. कुटुंबाला उलट विचारतात, ‘तो घरी आला नाही?’

डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद -

जगाच्या पाठीवर राजकीय सिद्धांत आणि सत्तासंघर्षाचे खेळ सुरू असताना, या संघर्षाच्या पडद्यामागे एक अशी भीषण शोकांतिका घडत असते, ज्याची नोंद इतिहासाच्या पानांवर क्वचितच होते. जागतिक स्तरावर शांततेचे समर्थन करणारे अनेक गट आहेत. यात प्रामुख्याने अशा छोट्या देशांचा समावेश असतो, ज्यांच्यावर मोठ्या राष्ट्रांनी आक्रमण केले आहे किंवा जिथे देशांतर्गत फुटीरतावाद आणि यादवी सुरू आहे. परंतु, या सर्व राजकीय उलथापालथीत सर्वाधिक होरपळली जाते ती म्हणजे ‘स्त्री’. 

नुकत्याच एका जागतिक व्यासपीठावर मला काही अशा महिला भेटल्या, ज्यांच्या डोळ्यांतील अश्रू आता आटले होते; पण त्यांच्या मनातील आक्रोश आजही तितकाच जिवंत होता. त्या व्यासपीठावर ‘मदर्स ऑफ डिसअपिअर्ड’  या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मातांची एक मानवी साखळी उभी होती. ही केवळ एक साखळी नव्हती, तर ती एक ‘निशब्द’ आंदोलनाची गाथा होती.

या मातांच्या कहाण्या ऐकल्या की अंगावर काटा येतो. एखाद्या दिवशी घरातील तरुण मुलगा, पती किंवा भाऊ कामासाठी किंवा सैन्यातील कर्तव्यासाठी बाहेर पडतो. त्याला पोलिस किंवा सरकारी यंत्रणेद्वारे चौकशीसाठी बोलावले जाते. तो जातो; पण पुन्हा कधीच परत येत नाही. लोकशाही देशांमध्ये एखादी व्यक्ती बेपत्ता झाली तर ‘मिसिंग’ची तक्रार घेतली जाते, तपास होतो आणि बहुतांश वेळा त्या व्यक्तीचा थांगपत्ता लागतो. दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर तसे तरी कळते. परंतु, हुकूमशाही किंवा टोकाच्या राजकीय अस्थिरतेच्या देशांमध्ये चित्र वेगळे आहे. तिथे सरकारी यंत्रणाच माणसांना ‘गायब’ करतात. कुटुंबाने विचारणा केली तर यंत्रणा उलट विचारतात, ‘तो घरी परत आला नाही का?’ १५-२० वर्षे उलटतात, मुले मोठी होतात; पण त्या माणसाचे स्टेटस ‘अदृश्य’ हेच राहते. तो जिवंत आहे की मृत, तो कोणत्या तुरुंगात आहे की त्याला संपवण्यात आले आहे, याचे उत्तर ना सरकार देते, ना कायदा.

आज अफगाणिस्तान, पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये गुप्तहेर यंत्रणांच्या संघर्षात सामान्य नागरिक भरडला जात आहे. विकासाच्या संधी न मिळाल्यामुळे आंदोलने उग्र बनतात, तेव्हा तिथेही अशा प्रकारच्या अदृश्य होण्याच्या घटनांच्या चर्चा कानावर येतात.  रशिया, युक्रेन किंवा अफगाणिस्तान, आफ्रिकेतील काही देशांमधील यादवीत अशा ‘गायब’ झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. 

या छळाला कंटाळून अनेक स्त्रिया दुसऱ्या देशात आश्रय घेतात. परदेशात राहून त्या आपल्या मायदेशातील लोकांशी संपर्क साधून पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे  आंदोलन ‘निशब्द’ असते, कारण जगाच्या भिंती ओलांडून त्यांचा आवाज त्यांच्या स्वदेशातील सत्ताधीशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर असते.

भारतामध्ये लोकशाहीची पाळेमुळे घट्ट असल्याने अशा घटनांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, ही जमेची बाजू. परंतु, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जेव्हा एखादी माता आपल्या मुलाची वाट पाहत ‘अदृश्य’ भिंतींशी संवाद साधते, तेव्हा तो केवळ एका कुटुंबाचा प्रश्न राहत नाही, तर तो मानवी सभ्यतेपुढील प्रश्न ठरतो. राजकीय राजवटी येतात आणि जातात; पण या मातांच्या डोळ्यांतील ‘नि:शब्द कहाणी’ कायमची कोरली जाते.neeilamgorhe@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Mothers relentlessly search for their 'disappeared' children amid global conflicts.

Web Summary : Women worldwide seek disappeared loved ones amidst conflict. Political instability leads to forced disappearances, leaving families in agony. While India fares better, such tragedies are a global humanitarian crisis, etching silent stories of loss.
टॅग्स :Womenमहिला