शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

कधी घेणार आम्ही धडे ?

By रवी ताले | Updated: February 27, 2018 00:37 IST

एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या.

अकोला शहरातील मातानगर झोपडपट्टीत गत गुरुवारी भीषण अग्नितांडव घडले. एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या. सुदैवाने जीवित हानी झाली नाही; पण मोठ्या संख्येने कुटुंबे उघड्यावर आली, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच!गंभीर बाब म्हणजे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबांमध्ये पाणी भरण्यासाठीचा ‘हायड्रंट’च बंद पडलेला होता. त्यामुळे बंब रिकामे झाल्यावर पुन्हा पाणी भरून आणण्यासाठी खूप धावपळ उडाली आणि अमूल्य वेळ वाया गेला. ही अत्यंत अक्षम्य स्वरूपाची हलगर्जी म्हणावी लागेल; पण हा मजकूर लिहित असताना तरी त्यासाठीची जबाबदारी निश्चित झालेली नव्हती!अलीकडे लहान-मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांना आगी लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी होत असते. पुढचे काही दिवस त्यावर चर्चा होते, उपाययोजनांसंदर्भात गप्पा झडतात आणि काही दिवसांतच त्या घटनेचा विसर पडतो!गत काही वर्षांपासून जगभर लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये केंद्रीकरण होऊ लागले आहे. रोजगारासाठी लोक शहरांमध्ये येतात आणि नाईलाजास्तव झोपडपट्ट्यांचा आसरा घेतात. तेथील झोपड्या अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या असतात. साहजिकच आग लागल्यास ती फार झपाट्याने पसरते आणि रस्त्यांच्या अभावामुळे अग्निशमन विभागाचे काम कठीण होऊन बसते.अपघात पूर्णत: टाळणे कधीच शक्य नसते; पण किमान त्यांची वारंवारिता कमी करणे आणि अपघात झालाच, तर हानीचे प्रमाण किमान पातळीवर राखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य असते. त्यासाठी उदाहरणांवरून धडे घेण्याची आणि त्या अनुषंगाने भविष्यासाठी तयारी करण्याची गरज असते. नेमके इथेच आपण कमी पडतो.अकोल्याच्या आगीचेच उदाहरण घ्या! शहरातील एकमेव ‘हायड्रंट’ शहराच्या मध्यभागी वर्दळीच्या ठिकाणी आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ‘हायड्रंट’ असल्यास अग्निशामक बंब जास्त खेपा करू शकतात. शिवाय एक ‘हायड्रंट’ बंद असला, तरी दुसºया ‘हायड्रंट’चा वापर केला जाऊ शकतो. झोपडपट्ट्यांमध्ये आग लागण्याचे प्रमाण मोठे आहे, हे लक्षात घेऊन झोपडपट्ट्यांनजीक ‘हायड्रंट’ची निर्मिती झाल्यास, आग लवकर आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकते.याशिवाय झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांमध्ये आगीची संभाव्य कारणे, त्यापासून बचाव, स्वयंपाकाच्या सुरक्षित पद्धती इत्यादी मुद्यांच्या अनुषंगाने जनजागृतीपर मोहीम राबविण्याचाही लाभ होऊ शकतो. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेण्याची गरज आहे. झोपडपट्ट्यांमधील आगीच्या घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्वंकष धोरण आखण्याची आत्यंतिक निकड आहे. राज्य सरकारकडून तशा पुढाकाराची अपेक्षा करावी का?- रवी टाले(ravi.tale@lokmat.com)

टॅग्स :fireआग