शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणाविरोधी कायद्याबाबतचा संभ्रम कधी दूर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 10:49 IST

जादूटोणाविरोधी कायदा धर्मनिरपेक्ष आहे, तो हिंदुविरोधी नाही. या कायद्यान्वये दाखल झालेल्या पहिल्या शंभरपैकी वीस गुन्हे इतर धर्मीयांविरुद्ध दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. समाजातील अनिष्ट चालीरिती, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी अनेक संत, समाजसुधारकांनी अटोकाट प्रयत्न केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही जादूटोणाविरोधी कायदा व्हावा, यासाठी सलग अठरा वर्षे प्रयत्न केले. २०१३मध्ये महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला. या कायद्याला नऊ वर्षे पूर्ण झाली असून, दीड हजारांहून अधिक गुन्हे या कायद्यांतर्गत दाखल झाले आहेत. हा कायदा केवळ हिंदू धर्मीयांसाठी वापरला जातो, असा काही जणांचा आरोप आहे, पण हा कायदा सर्वांना लागू आहे. सर्वांत पहिला गुन्हाच एका इतर धर्मीय भोंदूबाबाच्या विरोधात नांदेड येथे दाखल झालेला आहे. पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी  वीस घटनांमध्ये इतर समाजाच्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.दोष सिद्ध झाल्यास सहा महिने ते सात वर्षे तुरुंगवास, शिवाय पाच ते पन्नास हजार रुपयांच्या शिक्षेचीही यात तरतूद आहे. नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा अथवा भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या हेतूने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकीण समजून त्रास देणे, पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे इत्यादि अमानुष कारणांमुळे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.महाराष्ट्राने देशाला अनेक कायदे दिले आहेत, तसाच हा कायदाही देशासाठी पथदर्शक आहे. अनेक राज्यांतून अशा कायद्याची मागणी होत आहे, परंतु त्याआधी राज्यातच त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. विविध कारणांमुळे अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. बदनामी होईल, अशा भीतीमुळे बरेच पीडित तक्रार करण्याचे टाळतात. पोलिसांकडूनही काही वेळा योग्य ती मदत मिळत नाही. कारण त्यांच्यातही या कायद्याबाबत संभ्रम आहे. यासाठी पोलिस ते पोलिस पाटील आणि नागरिकांचेही नियमित प्रशिक्षण शिबिर होणे आवश्यक आहे. हे प्रबोधन  ज्याप्रमाणे शाळा-महाविद्यालयांतून होऊ शकते, त्याचप्रमाणे, भाषणे, कीर्तन, प्रवचन, मनोरंजनाची साधने यातूनही होऊ शकतं. कायद्याबाबतचे गैरसमज दूर होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार, प्रसार करत आहे. मात्र, मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहेत. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमच करीत आली आहे. नागरिकांनीही त्याला बळ दिले पाहिजे. - कृष्णा चांदगुडे राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र