शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

केंद्रातल्या मोदी सरकारचं हे सूडसत्र कधी संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 05:29 IST

कनिमोझी, रॉबर्ट वडेरा यांच्याविरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे कशाचे निदर्शक आहेत?

कनिमोझी, रॉबर्ट वडेरा यांच्याविरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे कशाचे निदर्शक आहेत? याच काळात ज्यांची संपत्ती शेकडो पटींनी वाढली व त्या वाढीची सबळ कारणे त्यांना सांगता येत नाहीत अशी माणसे छाप्यांतून कशी सुटली?सूड ही वृत्ती आहे आणि ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणातही उद्भवू शकते. सामान्यपणे जी माणसे दुखावलेली वा अन्यायग्रस्त असतात त्यांच्यात ही भावना सहजपणे येते. मात्र जे सत्तेत असतात आणि सत्तेची सारी आयुधे ज्यांच्या हातात असतात ते जेव्हा सुडाच्या भावनेने पेटतात तेव्हा ते एकाचवेळी अमानुष आणि अनाकलनीय होतात. केंद्रात मोदींचे सरकार गेली पाच वर्षे सत्तेत आहे. प्रशासन, पोलीस, लष्कर व तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत आणि तरीही ऐन निवडणुकीच्या काळात त्या सरकारची सूडभावना प्रगट व सक्रिय होत असेल तर ते केवळ लोकशाहीशीच नव्हे, तर भारतीयांच्या क्षमाशील परंपरेशीही विसंगत ठरणारे आहे. गेल्या महिन्याभरात मोदींच्या सरकारने विरोधी पक्षातील किती नेत्यांच्या घरांवर आर्थिक अन्वेषण विभागाचे छापे घातले? त्यातील किती निरर्थक निघाले आणि त्यातून काही मिळण्यापेक्षा सरकारची सूडवृत्तीच देशाला कशी दिसली हे पाहिले की सूडशाही हाही शासन व्यवस्थेचाच एक प्रकार असावा असे वाटू लागते. तामिळनाडूत ऐन मतदानाच्या वेळी द्रमुकच्या नेत्या कनिमोझी यांच्या घरावरील छापा हा अशाच सूडवृत्तीचा ताजा नमुना आहे. रॉबर्ट वडेरा विरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे, काँग्रेसच्या अनेक माजी मंत्र्यांच्या, नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या घरावर घातलेल्या धाडी या कशाच्या निदर्शक आहेत? याच काळात ज्यांची संपत्ती शेकडो पटींनी वाढली व तिच्या वाढीची कोणतीही सबळ कारणे त्यांना सांगता येत नाहीत अशी माणसे अशा छाप्यांतून कशी सुटली वा सोडली गेली? केवळ विरोधक आहेत म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी हे छापे घालायचे आणि आपल्या पंखाखाली असलेल्यांना संरक्षण देत गोंजारत राहायचे हे राजकारण लोकशाहीचे नसून सूडबुद्धीचे आहे. सरकारजवळ स्वत:चे सांगण्यासारखे काही उरले नाही की ते विरोधकांचे उणेपण सांगू लागते. दुसऱ्यांचे दोष दाखवून आपले मोठेपण सिद्ध करण्याचा हा बालिश प्रकार आहे. बरे, तसे सांगून संपले असेल तर? मग त्यांच्या जुन्या पिढ्यांच्या चुका सांगायच्या. मनमोहन सिंगांवर टीका करता येत नसेल तर ती नरसिंहरावांवर करायची. त्यांचे सांगून झाले की राजीव गांधींना हाताशी धरायचे. मग बोफोर्सच्या कित्येक दशके चालू असलेल्या, संपलेल्या व विस्मरणात गेलेल्या प्रकरणावर नवी कमिशने नेमायची. राजीव झाले की इंदिरा गांधींना ओढायचे. त्यांच्यामुळे पंजाबचा प्रदेश भारतात राहिला व त्यासाठी त्यांनी बलिदान दिले हे विसरायचे आणि त्यांनी सुवर्ण मंदिरात केलेल्या लष्करी कारवाईला शिवीगाळ करणारी भाषणे करायची.

त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे विसरायचे आणि त्यांचा पक्ष पाकिस्तानला साथ देतो असे खोटेच सांगायचे; त्याही पलीकडे जाऊन पं. नेहरूंना व गांधीजींनाही दोष द्यायला धरायचे. ही सारी सुडाची परंपरा आहे. आयुष्यात वर्षानुवर्षे वाट्याला आलेल्या पराभवातून ती जन्माला आली आहे. काम करणारी सरकारे काम करणारच. ते करताना काही बरोबर तर काही चूकही होणार. मग त्या चुकांवरच आपल्या राजकारणाची चूल पेटवायची हा प्रकार केवळ भारतीय आहे आणि तो संघ प्रवृत्तीचा आहे. राहुल गांधींवर टीका, करावी असे काही नाही. प्रियांकाला धारेवर धरावे असेही काही नाही. ते दोघेही राजकारणात नवे आहेत. स्वच्छ आहेत. पण त्यांना बदनाम करावयाला त्यांचे पूर्वज शोधायचे, त्यांचे जाती-धर्म विचारायचे आणि त्यांच्यावर तोच तो घराणेशाहीचा ठपका ठेवायचा. त्यांच्याकडे किमान घराणेशाही आहे. आपल्याकडे तर फक्त एकाधिकारशाही आहे व तीही मोदीशाही आहे हे विसरायचे, यातील एकारलेपण उघड आहे.

आपण हाती घेतलेली प्रत्येक योजना, नोटाबंदी ते रोजगारनिर्मिती मातीत गेली; उलट बेरोजगारी वाढली, विमाने जमिनीवर आली आणि शेतकरी शेती करण्याऐवजी आत्महत्या करू लागला. त्या परिस्थितीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. इतरांनीही ते मुद्दे उपस्थित करू नये, यासाठी मग जुनेच मुद्दे उकरून चर्चेत आणायचे. राष्ट्रवादाची आपली संकल्पना राबवायची आणि ती मान्य नसलेल्यांना देशद्रोही ठरवायचे. ही स्थिती मग सूडसत्राला जन्म देते. ते थांबवायचे, तर नागरिकांनीच सतर्क व्हायला हवे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक