शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

केंद्रातल्या मोदी सरकारचं हे सूडसत्र कधी संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 05:29 IST

कनिमोझी, रॉबर्ट वडेरा यांच्याविरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे कशाचे निदर्शक आहेत?

कनिमोझी, रॉबर्ट वडेरा यांच्याविरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे कशाचे निदर्शक आहेत? याच काळात ज्यांची संपत्ती शेकडो पटींनी वाढली व त्या वाढीची सबळ कारणे त्यांना सांगता येत नाहीत अशी माणसे छाप्यांतून कशी सुटली?सूड ही वृत्ती आहे आणि ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणातही उद्भवू शकते. सामान्यपणे जी माणसे दुखावलेली वा अन्यायग्रस्त असतात त्यांच्यात ही भावना सहजपणे येते. मात्र जे सत्तेत असतात आणि सत्तेची सारी आयुधे ज्यांच्या हातात असतात ते जेव्हा सुडाच्या भावनेने पेटतात तेव्हा ते एकाचवेळी अमानुष आणि अनाकलनीय होतात. केंद्रात मोदींचे सरकार गेली पाच वर्षे सत्तेत आहे. प्रशासन, पोलीस, लष्कर व तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत आणि तरीही ऐन निवडणुकीच्या काळात त्या सरकारची सूडभावना प्रगट व सक्रिय होत असेल तर ते केवळ लोकशाहीशीच नव्हे, तर भारतीयांच्या क्षमाशील परंपरेशीही विसंगत ठरणारे आहे. गेल्या महिन्याभरात मोदींच्या सरकारने विरोधी पक्षातील किती नेत्यांच्या घरांवर आर्थिक अन्वेषण विभागाचे छापे घातले? त्यातील किती निरर्थक निघाले आणि त्यातून काही मिळण्यापेक्षा सरकारची सूडवृत्तीच देशाला कशी दिसली हे पाहिले की सूडशाही हाही शासन व्यवस्थेचाच एक प्रकार असावा असे वाटू लागते. तामिळनाडूत ऐन मतदानाच्या वेळी द्रमुकच्या नेत्या कनिमोझी यांच्या घरावरील छापा हा अशाच सूडवृत्तीचा ताजा नमुना आहे. रॉबर्ट वडेरा विरुद्धच्या कारवाया, दिग्विजयसिंगांच्या घरावरचे छापे, काँग्रेसच्या अनेक माजी मंत्र्यांच्या, नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या घरावर घातलेल्या धाडी या कशाच्या निदर्शक आहेत? याच काळात ज्यांची संपत्ती शेकडो पटींनी वाढली व तिच्या वाढीची कोणतीही सबळ कारणे त्यांना सांगता येत नाहीत अशी माणसे अशा छाप्यांतून कशी सुटली वा सोडली गेली? केवळ विरोधक आहेत म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी हे छापे घालायचे आणि आपल्या पंखाखाली असलेल्यांना संरक्षण देत गोंजारत राहायचे हे राजकारण लोकशाहीचे नसून सूडबुद्धीचे आहे. सरकारजवळ स्वत:चे सांगण्यासारखे काही उरले नाही की ते विरोधकांचे उणेपण सांगू लागते. दुसऱ्यांचे दोष दाखवून आपले मोठेपण सिद्ध करण्याचा हा बालिश प्रकार आहे. बरे, तसे सांगून संपले असेल तर? मग त्यांच्या जुन्या पिढ्यांच्या चुका सांगायच्या. मनमोहन सिंगांवर टीका करता येत नसेल तर ती नरसिंहरावांवर करायची. त्यांचे सांगून झाले की राजीव गांधींना हाताशी धरायचे. मग बोफोर्सच्या कित्येक दशके चालू असलेल्या, संपलेल्या व विस्मरणात गेलेल्या प्रकरणावर नवी कमिशने नेमायची. राजीव झाले की इंदिरा गांधींना ओढायचे. त्यांच्यामुळे पंजाबचा प्रदेश भारतात राहिला व त्यासाठी त्यांनी बलिदान दिले हे विसरायचे आणि त्यांनी सुवर्ण मंदिरात केलेल्या लष्करी कारवाईला शिवीगाळ करणारी भाषणे करायची.

त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे विसरायचे आणि त्यांचा पक्ष पाकिस्तानला साथ देतो असे खोटेच सांगायचे; त्याही पलीकडे जाऊन पं. नेहरूंना व गांधीजींनाही दोष द्यायला धरायचे. ही सारी सुडाची परंपरा आहे. आयुष्यात वर्षानुवर्षे वाट्याला आलेल्या पराभवातून ती जन्माला आली आहे. काम करणारी सरकारे काम करणारच. ते करताना काही बरोबर तर काही चूकही होणार. मग त्या चुकांवरच आपल्या राजकारणाची चूल पेटवायची हा प्रकार केवळ भारतीय आहे आणि तो संघ प्रवृत्तीचा आहे. राहुल गांधींवर टीका, करावी असे काही नाही. प्रियांकाला धारेवर धरावे असेही काही नाही. ते दोघेही राजकारणात नवे आहेत. स्वच्छ आहेत. पण त्यांना बदनाम करावयाला त्यांचे पूर्वज शोधायचे, त्यांचे जाती-धर्म विचारायचे आणि त्यांच्यावर तोच तो घराणेशाहीचा ठपका ठेवायचा. त्यांच्याकडे किमान घराणेशाही आहे. आपल्याकडे तर फक्त एकाधिकारशाही आहे व तीही मोदीशाही आहे हे विसरायचे, यातील एकारलेपण उघड आहे.

आपण हाती घेतलेली प्रत्येक योजना, नोटाबंदी ते रोजगारनिर्मिती मातीत गेली; उलट बेरोजगारी वाढली, विमाने जमिनीवर आली आणि शेतकरी शेती करण्याऐवजी आत्महत्या करू लागला. त्या परिस्थितीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. इतरांनीही ते मुद्दे उपस्थित करू नये, यासाठी मग जुनेच मुद्दे उकरून चर्चेत आणायचे. राष्ट्रवादाची आपली संकल्पना राबवायची आणि ती मान्य नसलेल्यांना देशद्रोही ठरवायचे. ही स्थिती मग सूडसत्राला जन्म देते. ते थांबवायचे, तर नागरिकांनीच सतर्क व्हायला हवे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक