शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

विशेष लेख - जुन्या पुस्तकामध्ये नवी ऊर्जा भरली जाते, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 06:16 IST

महाराष्ट्र साहित्य परिषद गेली ११५ वर्षे मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी कार्यरत आहे. आज परिषदेचा वर्धापनदिन! त्यानिमित्ताने.......

२०१६ मध्ये कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने “साहित्य संस्थांनी कालानुरूप बदलले पाहिजे”, ही भूमिका  समोर ठेवून परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी आपल्या कार्यशैलीत बदल केला.  साहित्य परिषदेतर्फे विभागीय साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, समीक्षा संमेलन  आणि शाखा मेळावा हे महत्त्वाचे उपक्रम सुरू झाले. मसाप तालुका पातळीवर आणि छोट्या गावातही पोहोचली. परिषदेच्या शिवार साहित्य संमेलनांना  ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. साहित्य परिषदेत सारस्वतांचे स्मृतिदिन, व्याख्याने आणि पारितोषिकांचे वितरण एवढेच कार्यक्रम होत असत. त्यात बदल करून  ज्येष्ठ लेखिका वैदेही, डॉ. प्रतिभा राय, सितांशु यशचंद्र या अन्य भाषांतील थोर सारस्वतांना परिषदेच्या वर्धापनदिन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले गेले. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेने लोक चळवळ उभारली, पंतप्रधानांना एक लाख पत्रे, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी पत्रव्यवहार आणि नेत्यांच्या गाठी-भेटी हे सारे करीत असताना राजधानी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही केले. मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी विविध संस्थांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या धरणे आंदोलनात साहित्य परिषदेचा लक्षणीय सहभाग होता या आंदोलनाला यश आले. या कायद्याचे प्रारूप कसे असावे यासाठीच्या लेखक आणि विधिज्ञांच्या महत्त्वपूर्ण बैठका परिषदेतच झाल्या. 

साहित्य संमेलना अध्यक्षपदासाठी निवडणुकांचा पर्याय होता तेव्हा प्रतिभावंत सारस्वतांना मतांसाठी याचना करावी लागत असे.  समाजमनातही त्याविषयी खदखद होतीच. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती व्हावी यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठाम भूमिका घेऊन निवडणुकीऐवजी ‘सन्मानपूर्वक निवड’ या पर्यायाचे समर्थन केले. तसा ठराव मसापच्या कार्यकारी मंडळात प्रथम मंजूर केला आणि महामंडळातही तो मंजूर व्हावा यासाठी पुढाकार घेतला. सर्व संस्थांच्या सहमतीने हा पर्याय स्वीकारला गेला आणि डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे यांच्या रूपाने वाचकांच्या मनातील संमेलनाध्यक्ष संमेलनांना मिळाले. तंत्रस्नेही समाजाला साहित्य परिषदेने संकेतस्थळ, फेसबुक पेज, व्हॉटसॲप ग्रुपच्या साहाय्याने जोडले. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन केले. मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित करणारी मसाप ही भारतातील एकमेव साहित्यसंस्था आहे. हा वाङ्मयाचा इतिहास ई-बुक रूपात आणला.  महापुरात उद्ध्वस्त झालेल्या सांगलीच्या नगर वाचनालयाला अकरा हजार पुस्तके परिषदेने भेट म्हणून दिली. कोरोनाच्या संकटकाळात निवडणुका घेणे शक्य नसल्याने आणि या कठीण काळात निवडणुकीवर होणारा  खर्च वाचविण्यासाठी परिषदेच्या कार्यकारी मंडळाने पाच वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवला.  काळाची गरज ओळखून विद्यमान कार्यकारी मंडळाला सर्वसाधारण सभेने पाच वर्षांची मुदतवाढ दिली. 

आता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील आणि विश्वस्त यशवंतराव गडाख, दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून परिषदेत नूतनीकरण सुरू आहे. साहित्य परिषदेचे ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृह वातानुकूलीत आणि ध्वनिप्रतिबंधित होत आहे.  वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचे नूतनीकरण होत आहे.  परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवीत आज साहित्य परिषदेची वाटचाल सुरू आहे. - अंजली कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद