शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राकेश टिकैत यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 05:57 IST

Farmer Protest : नेत्याच्या डोळ्यात येणारे पाणी अनुयायांच्या हृदयाला कसा पाझर फोडते, हे दिल्लीत पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे!

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)‘एखाद्या माणसाला मी रडताना पाहतो तेव्हा मला ती त्याची दुर्बलता वाटते.’- २०१५ साली ‘पीपल’ या नियतकालिकाला मुलाखत देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, ‘लहान मुलगा असताना मी शेवटचे रडलो होतो’ अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली. मात्र, ट्रम्प महाशय त्यांनीच निर्माण केलेल्या भ्रामक जगात वावरत आहेत हे नक्की. जगात असे अनेक नेते आहेत ज्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंनी लक्षावधी लोकांना हलवले, संकट काळात त्यांचे मनोधैर्य उंचावले, नैराश्यात आशा पेरली आणि इतिहास बदलला. अब्राहम लिंकन, बराक ओबामा, रशियाचे ब्लादिमीर पुतीन, इंदिरा गांधी अशी कित्येक उदाहरणे यासाठी देता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने त्यात भर पडली आहे. भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना अलीकडेच मोदी यांचे डोळे पाणावले.  ५६ इंची छातीच्या या माणसाला  काही पहिल्यांदाच गलबलून आले नव्हते. २०१४ साली भाजपा संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली तेंव्हाही त्यांच्या डोळ्यात आसवे तरळली होती. २००७ साली आपल्या अवस्थेचे वर्णन करताना भगवे वस्त्रधारी योगी आदित्यनाथ यांनाही रडू कोसळले होते. सभागृहातला तो दिवस त्यांनी जिंकला आणि दहा वर्षांनी लखनौत समाजवादी पक्षाच्या नेत्यांना रडवले. या रडणाऱ्या नेत्यांचे कोणी ऐकले नाही ही गोष्ट वेगळी. अश्रूंची ताकद गाझीपूरमध्ये पुन्हा एकदा समोर आली. २६ जानेवारीच्या हिंसेनंतर शेतकरी आंदोलन आता हळूहळू विझू लागले आहे, असे वातावरण निर्माण झाले होते. मग राकेश टिकैत अचानक अवतीर्ण झाले  आणि शेतकरी बांधवांसाठी प्राण अर्पण करण्याची भाषा करताना त्यांच्या  डोळ्यात पाणी आले. परिणामी केवळ शेतकरी आंदोलनातच पुन्हा नवा जीव भरला असे नव्हे, तर  टिकैत यांच्या निर्विवाद नेतृत्वावरही शिक्कामोर्तब झाले. आता टिकैत हेच शेतकरी आंदोलनाचा मुख्य चेहेरा बनले आहेत!आता दार किलकिले कोण करणार?राकेश टिकैत शेतकऱ्यांचे निर्विवाद नेते झालेले आहेत, हे तर नक्कीच! आंदोलन गाझीपूर, टिकरी आणि शाहजहानपूर खेडा सीमेवर  एकवटले आहे. मात्र, पंजाबचे धरम पाल, एम. एस. पंधेर, राजोवाल किंवा सिरसा कोणतेही पत्रक काढत नाहीत, बोलत नाहीत. पूर्वी ज्यांच्याशी त्यांचे वाजले, अशा नेत्यांच्या गळाभेटी ते घेत आहेत. काँग्रेसच्या एका खासदाराला एकदा मार पडला होता ते दिवसही सरले आहेत. पण या झगमगाटात एक गोष्ट मात्र वेगळी दिसते आहे. आधी हाक मारली की मंत्रीगणातून  कोणीतरी प्रतिसाद द्यायचे. सरकार म्हणते, “ फक्त आम्हाला फोन करा!” - पण कोणीतरी हा फोन केला तर पाहिजे. टिकैत आता मध्यममार्ग अवलंबून शेतकऱ्यांना किमान हमी भाव द्यावा, असे सरकारला  सांगत आहेत. पोलिसांनी दिल्लीत आंदोलकांचा प्रवेश रोखला आहे. प्रमुख नेत्यांना अटक न करता त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले जात आहेत. १९८८ साली राकेश यांचे पिता महैन्द्रसिंग यांनी लाखभर  शेतकरी आणून बोट क्लबला  वेढा घातला होता. राजीव गांधी सरकारकडून त्यांनी ३५ कलमी करार पदरात पाडून घेतला होता. मोदी हुशार आहेत. शेतकऱ्यांना ते दिल्लीत प्रवेश करू देणार नाहीत. “सीमा ओलांडू नका” - हेच मोदींचे सांगणे आहे. आता कोणीतरी बोलले पाहिजे, थोडे पडते घेतले पाहिजे... पण हे करणार कोण?पुढील वर्षी शेतकरी अर्थसंकल्प रेल्वेऐवजी यंदाच शेतकरी अर्थसंकल्प आणण्याची कल्पना मोदी यांच्या मनात घोळत होती. तशी पूर्वतयारीही केली गेली होती. नीती आयोगालाही सांगण्यात आले होते. मोदी यांनी शब्दश: अर्थाने रेल्वे अर्थसंकल्प गाडून टाकला. कोणी त्याची फिकीर केली नाही. कृषी मंत्रालयाचे नाव बदलून त्यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय केले आणि पुढच्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच पट वाढवण्याचे वचनही दिले. शेतकरी धरणे आंदोलनात उतरल्याने मोदी यांनी आपली योजना बासनात नेली. या दडपणाखाली सध्या केवळ मोदी नाहीत. पुढच्या वर्षी  उत्तरप्रदेशात निवडणुका होत आहेत. २०२२ मध्ये शेतकरी अर्थसंकल्प येऊ शकतो.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmerशेतकरीPoliticsराजकारण