शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डासमुक्तीचे ‘भारुड’ रंगते तेव्हा...

By राजा माने | Updated: August 1, 2018 03:38 IST

डिजिटलच्या जमान्यात केवळ ग्रामपंचायत ‘पेपरलेस’ करून समाधान मानणे चुकीचे ठरेल. गटारमुक्त व डासमुक्त गाव ही प्रत्येक खेड्याची गरज आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात डासमुक्तीचे ‘भारुड’ चांगलेच रंगात आले आहे...

डिजिटलच्या जमान्यात केवळ ग्रामपंचायत ‘पेपरलेस’ करून समाधान मानणे चुकीचे ठरेल. गटारमुक्त व डासमुक्त गाव ही प्रत्येक खेड्याची गरज आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात डासमुक्तीचे ‘भारुड’ चांगलेच रंगात आले आहे...एखादा कामाने झपाटलेला अधिकारी लोकप्रतिनिधींची साथ लाभल्यास किती चांगले काम करू शकतो याचा अनुभव सध्या सोलापूर जिल्हा घेतोय ! कार्यालयीन स्वच्छतेपासून सुरू होणारा प्रवास पेपरलेस ग्रामपंचायतीमार्गे डासमुक्तीच्या गतिमान चळवळीपर्यंत कसा पोहोचू शकतो, याचे उदाहरण म्हणून सोलापूर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कामाकडे पहायला हवे.ग्रामविकास आणि खेड्यांवर प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी खूप मोठा संदेश दिला. विचाराला कृतीची जोड देणारे राष्टÑसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘माझा देव साधनारूपाने देवळात व वनात असला, अनुभव रूपाने तो मनात व चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे, हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे.’ तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेली पूजा ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत बांधली जावी, याच उद्देशाने महाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची मुहूर्तमेढ राज्यात रोवली. त्याच संस्थांमधील महत्त्वाचे केंद्र म्हणून आपण जिल्हा परिषदांकडे पाहतो. संत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेली पूजा बांधण्याचे काम जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी व अधिकारी करू शकतात. त्याच अपेक्षांच्या पूर्तीच्या दिशेने डॉ.राजेंद्र भारुड आणि त्यांची टीम आपली पावले टाकत असताना दिसतात. जि.प.चे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या मदतीने त्यांनी जिल्ह्यात अनेक उपक्रमामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग मिळविला. त्यामुळे स्वच्छता मोहिमांपासून डिजिटल शाळांपर्यंतचे अनेक उपक्रम साकार झाले. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीतील ‘मोबाईल हँडवॉश स्टेशन’सारख्या उपक्रमाचे कौतुक झाले. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालख्यांच्या मार्गावर स्वच्छतागृहांच्याजवळ एक हजार लिटर पाणी क्षमता असलेले मोबाईल हँडवॉश स्टेशन कार्यरत राहिले. आरोग्य व स्वच्छतेच्यादृष्टीने या उपक्रमाचा फायदा वारकºयांना झाला.शुद्ध व स्वच्छ पाण्याबरोबरच आरोग्यासाठी सांडपाण्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे डॉ.भारुड यांनी जाणले. त्याला कृतीची जोड देताना जिल्ह्यातील १०२९ ग्रामपंचायतीचा सांडपाणी व डासमुक्ती नियोजनाचा आराखडा तयार केला. कोणत्याही गावातील गटारे ही डास निर्मितीची प्रमुख ठिकाणे असतात. गावातील सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जिरविल्यास त्या गावातील भू-गर्भांतर्गत पाणीपातळीदेखील वाढू शकते. याचा विचार करून त्यांनी जिल्ह्यात ७४ हजार ६०१ शोषखड्डे घेण्याचा निर्णय घेतला. त्यात जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार ४३१ कुटुंबांचा सहभागही मिळविला. त्याला ११ तालुक्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४३० आरोग्य उपकेंद्र आणि ४ हजार २१४ अंगणवाड्याच्या नियोजनाची जोड दिली. एक मॉडेल म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावात ९५० शोषखड्डे घेऊन ते गाव डासमुक्त केले. आज जिल्ह्यातील ५९ गावे गटारमुक्त झालेली दिसतात. आजच्या डिजिटल जमान्यात ११८ ग्रामपंचायती ‘पेपरलेस’ करणाºया डॉ. राजेंद्र भारुड यांचे डासमुक्तीचे ‘भारुड’ सध्या जिल्ह्यात चांगलेच रंगात आले आहे. ते जिल्ह्यातील प्रत्येक गावाची चळवळ बनल्यास आश्चर्य वाटू नये.- राजा माने

टॅग्स :Solapurसोलापूर