शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

यांचं करणार काय?

By admin | Updated: August 13, 2016 05:38 IST

अवघ्या वर्षभरात परिस्थितीत किती अमूलाग्र बदल झाला. गेल्या वर्षी याच काळात संपूर्ण देशात कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. किरकोळ बाजारात त्याने ऐंशी ते शंभर

अवघ्या वर्षभरात परिस्थितीत किती अमूलाग्र बदल झाला. गेल्या वर्षी याच काळात संपूर्ण देशात कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. किरकोळ बाजारात त्याने ऐंशी ते शंभर रुपयांची मजल गाठली. केन्द्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय घेतला आणि देशी कांदा देशातच राहावा म्हणून त्याचा निर्र्यात दर साडेचारशे डॉलर्सवरुन थेट सातशे डॉलर्स केला. खरे तर असे चक्र दर वर्षी सुरुच असते. मार्च-एप्रिलात काढणी झालेला कांदा दिवाळीपर्यंत पुरवायचा असतो. पण गेल्या वर्षी पावसाने स्वत:चे वेळापत्रक कोलमडवून घेताना इतरांचेही कोलमडवले. त्याचा परिणाम अल्प प्रमाणात उपलब्ध कांद्याच्या दरात भरमसाठ वाढ होण्यात झाला. कदाचित त्यामुळेच कांद्यासारखे सोने नाही असा काही तरी समज शेतकऱ्यांच्या मनात उत्पन्न झाला आणि यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच राज्य सरकारने बाजार समिती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही पूर्वतयारी न करता एक गोंधळ घालून ठेवला. शेतकरी आणि व्यापारी दोघे नाडले जाऊ लागले. गेल्या वर्षी जेवढ्या पैशात किलोभर कांदा मिळत होता तेवढ्याच पैशात आता दहा ते बारा किलो कांदा मिळू लागला. भावातील या घसरणीमुळे शेतकरी त्रस्त आणि संतप्त झाले आणि अखेर शेवटी त्यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून केन्द्र आणि राज्य या दोन्ही सरकारांनी नाफेड व पणन महासंघामार्फत बाजारभावाने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घोषित करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. घोषणेप्रमाणे उभय सरकारे कांद्याची खरेदी करतीलही कदाचित पण खरेदी केलेल्या या कांद्याचं सरकार करणार काय याचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. गेले काही दिवस व्यापाऱ्यांनी लिलावावर जो बहिष्कार टाकला होता, त्याच्या परिणामी बाजारात आणलेला कांदा तिथेच सडू लागला होता. कारण खरेदी करणे एक वेळ सोपे पण त्याची विल्हेवाट लावणे तितकेच अवघड. सरकार हे कसे करणार आहे? दशकभरापूर्वी राज्य सरकारने सात-बारावरील उतारे पाहून शेतकऱ्यांना सरळ पैसे देऊन टाकले होते. त्यात ज्या पुढाऱ्यांचे सात-बारा कोरे, तिथेही अचानक कांदा उगवला. म्हणून यंदा थेट खरेदी. निर्णय चांगला. पण पुढे काय? मुळात आज जी स्थिती उत्पन्न झाली आहे तिला व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा वगैरे काहीही जबाबदार नाही. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन एकट्या नाशिक जिल्ह्यात कांद्याखालील क्षेत्रात ४०हजाराहून थेट ७० हजार म्हणजे तीस हजार हेक्टर्सची वाढ झाली. यातून साधारण चौदा लाख टन कांद्याचे उत्पादन निघाले व त्यातील जवळजवळ निम्मा कांदा आजही शिल्लक आहे. आता तोच बहुदा सरकार खरेदी करील आणि सडवेल?