शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री नगरला काय देणार?

By admin | Updated: July 2, 2016 05:40 IST

महापालिका, सहा आमदार, दोन खासदार अशी भरभक्कम गोळाबेरीज असतानाही नगर जिल्ह्याची या सत्तेत एका राज्यमंत्रिपदावर बोळवण झाली

महापालिका, सहा आमदार, दोन खासदार अशी भरभक्कम गोळाबेरीज असतानाही नगर जिल्ह्याची या सत्तेत एका राज्यमंत्रिपदावर बोळवण झाली. जिल्हा विभाजन, तसेच शिर्डी संस्थानच्या नियुक्त्यांचा विषयही मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित ठेवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडवणीस यांनी अहमदनगर शहरातील माळीवाडा येथे विशाल गणपतीसमोर सभा घेतली होती. ‘मी जेथे जातो तेथे भाजपा जिंकते’, असा दावा त्यांनी या सभेत केला होता. त्यांचा दावा नगर शहरात खोटा ठरला; मात्र जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक पाच आमदार निवडून आले. अखंड कॉंग्रेसनंतर सर्वाधिक आमदार निवडून आणणारा भाजपा हा जिल्ह्यातील दुसरा पक्ष ठरला आहे. साखर सम्राटांचे भरभक्कम जाळे असतानाही पवारांच्या राष्ट्रवादीलाही जिल्ह्यात एवढे यश गाठता आले नाही. चार आमदारांच्या पुढे ते सरकले नाहीत. जिल्ह्यातील दोन्ही खासदार सेना-भाजपा युतीचेच आहेत. सेनेचा एक आमदार आहे. नुकतीच नगर महापालिकाही सेना-भाजपा युतीने ताब्यात घेत तेथेही भगवा फडकला.भाजपा-सेनेची ताकद जिल्ह्यात वाढली, पण त्या बदल्यात जिल्ह्याला युतीने काय दिले, या प्रश्नाची चर्चा आता सुरु झाली आहे. युतीच्या कार्यकर्त्यांनाच अद्याप याचे उत्तर मिळालेले नाही. कॉंग्रेस आघाडीच्या काळात या जिल्ह्याकडे बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे व बबनराव पाचपुते असे तीन कॅबिनेट मंत्री होते. भाजपाने प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून एका राज्यमंत्रिपदावर आत्तापर्यंत भागविले. शिंदे यांना बढती देऊन आणखी एक मंत्रिपद जिल्ह्याला दिले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, जिल्ह्याला महत्त्वाचे खाते मिळणार की तोंडी लावण्यापुरता समावेश होणार यावर जिल्ह्याचे राजकीय वजन ठरेल. भाजपाची साथ करा; नगरचा चेहरामोहरा बदलवू; येथे उद्योग आणू, असे फडणवीस नगरमध्ये म्हणाले होते. जिल्ह्याने त्यांना साथ दिली. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस नगर जिल्ह्यात आजवर केवळ दोनदा आले. एकदा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्या लोणी गावात व दुसऱ्यांदा दुष्काळाच्या धावत्या पाहाणीसाठी. त्यांच्या या दौऱ्यात नगर जिल्ह्याला विशेष काही मिळाले नाही. नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न हा गेल्या तीस वर्षांपासून सरकार दरबारी भिजत पडला आहे. कॉंग्रेस आघाडीने त्यांच्या राजकीय सोयीसाठी या निर्णयास टाळाटाळ केली. भाजपाही तोच कित्ता गिरवतेय. योग्य वेळी जिल्हा विभाजन करु, असे मंत्री शिंदे वारंवार सांगतात. मात्र, ही योग्य वेळ कोणती, याचा उलगडा होत नाही. शिर्डी संस्थान हे राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या देवस्थानावरील विश्वस्त मंडळ तातडीने नियुक्त करा, असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला दिला आहे. मात्र, तरीही सरकार हे विश्वस्त मंडळ नियुक्त करायला तयार नाही. गत चार वर्षांपासून या देवस्थानवर विश्वस्त मंडळ नसल्याने अनेक निर्णय अडून पडले आहेत. साईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष आले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणेच साईबाबांनाही श्रद्धा-सबुरीचा सल्ला दिलाय. उत्तर नगर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचा प्रश्नही भिजत पडला आहे. १९७० पासून या धरणाचा प्रवास सुरु आहे. १९८४ साली शरद पवारांच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन झाले, पुढे युतीच्या काळात १९९४ ला पायाभरणी झाली. आता धरण पूर्ण होत आले, पण कालवे अडले आहेत. कालव्यांसाठी चौदाशे कोटी रुपयांची गरज असताना फडणवीस सरकारने यावर्षी केवळ तीन कोटी रुपये दिले. या मार्गाने कालवे पूर्ण व्हायला आणखी दहा वर्षे तरी लागतील. जिल्ह्यातील आठ नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आहे. निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी सरकारकडून जिल्ह्याला ताकद मिळावी अशी युतीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. भाजपाकडे निदान राज्यमंत्रिपद आहे. सेनेकडे तेवढेही नाही. महापालिकेत सत्ता मिळाली खरी, पण भाजपाचे नेते वरुन पालिकेला निधी पाठवतील का, याबाबत सेना संभ्रमात आहे. - सुधीर लंके