शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पराजयाचा धडा कोणता?

By admin | Updated: June 25, 2014 10:46 IST

महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या संयुक्त आघाडीला एकाच वेळी आत्महत्येचे डोहाळे लागले असावेत, असे या दोन्ही पक्षांचे सध्याचे वर्तन आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या संयुक्त आघाडीला एकाच वेळी आत्महत्येचे डोहाळे लागले असावेत, असे या दोन्ही पक्षांचे सध्याचे वर्तन आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही त्यांना त्यांचे मार्ग, कार्यपद्धती व रूपडे बदलावेसे वाटले नाही. उलट, ते जास्तीत जास्त कलहग्रस्त, कुटील आणि कुरूप बनविण्याचाच त्या दोघांनी चंग बांधला आहे. लोक अपयशातून शिकतात. पराजय शहाणपणा शिकवतो. पण, आम्ही कशातूनही काहीही शिकणार नाही, अशी प्रतिज्ञा केलेले हे अहंमन्य लोक आहेत. लोकसभेच्या ४८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या ४, तर काँग्रेसला केवळ २ जागा कमालीच्या अल्पमताने जिंकता आल्या. आम्ही २५ ते २८ जागा मिळवू, ही त्यांची शेखी त्या निवडणुकीत जिरली. ऑक्टोबरात होणार्‍या राज्य विधानसभेच्या निवडणुकीतही याच पराजयाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता मोठी आहे. तो टाळायचा, तर या दोन्ही पक्षांना भक्कम एकजूट दाखविणे भाग आहे. सध्या त्यांच्यात संवाद नाही, चर्चा नाही, एकोपा तर नाहीच नाही. राष्ट्रवादीवाल्यांनी मुख्यमंत्री हटाव, अशी मागणी अशा वेळी करायची. शरद पवारांनी त्या मागणीसोबत आपण नसलो, तरी आपल्याला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झालेले आवडतील, असे म्हणायचे आणि त्यांच्याच पक्षातल्या तिसर्‍या एकाने पवार असे काही म्हणालेच नाहीत, असे सांगून मोकळे व्हायचे. हे राजकारण नव्हे, हा पोरखेळ आहे. तिकडे दिल्लीकरांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तातडीने बोलावून घ्यायचे. त्या भेटीत त्यांना काय सांगितले, याचा पत्ता कुणाला लागू द्यायचा नाही आणि नारायण राण्यांपासून पतंगराव कदमांपर्यंतच्या इच्छुकांनी ‘आता आमचा शपथविधीच तेवढा व्हायचा राहिला,’ असा आव आणायचा, हाही प्रकार तेवढाच बालिश आणि काँग्रेस या सव्वाशे वर्षांच्या पोक्त व परिपक्व पक्षाचे पोरपण उघड करणारा आहे. काँग्रेस पक्षात सोनिया गांधींचा शब्द प्रमाण आहे. तसा तिकडे शरद पवारांचा आदेशही सार्‍यांना शिरसावंद्य आहे. या स्थितीत दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून आपल्या अनुयायांना ‘एकत्र राहा आणि एकजुटीने लढा,’ हे सांगायला हवे. मात्र, तसे न करता स्वत:च्या भूमिकांविषयी संभ्रम निर्माण होऊ देणे आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ आपल्या अनुयायांना काढू देणे, हा त्या दोघांचा खेळ पक्षाला खोल गर्तेत नेणारा व त्यांच्या विरोधकांचा उत्साह वाढविणारा आहे. विरोधी पक्षाने महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या असल्या, तरी त्याचीही दुबळी स्थाने उघड आहेत. गोपीनाथ मुंडे राहिले नाहीत, नितीन गडकरी राज्यात यायचे नाहीत आणि उद्धव ठाकरे भाजपाला चालत नाहीत, ही स्थिती विरोधकांचे नेतृत्वहीन असणे दाखविणारी आहे. विधानसभेच्या बहुसंख्य क्षेत्रात भाजपाला जास्तीची मते मिळाल्यामुळे तो पक्ष मुख्यमंत्रिपदावर आतापासूनच दावा सांगू लागला आहे. शिवसेनेला हा प्रकार केवळ अमान्य होणाराच नाही, तर तो त्याच्या उघड्या जखमांवर मीठ चोळणारा आहे. ही स्थिती त्या दोन पक्षांना एकमेकांवर कुरघोडी करायला लावणारी आहे. केंद्रात मोदींचे सरकार निवडून आल्यानंतर त्याने स्वत:विषयीच्या अपेक्षा वाढविल्या तर नाहीतच, उलट त्यावर पाणी फिरविण्याचेच काम अधिक केले आहे. कधी नव्हे एवढी जीवघेणी दरवाढ त्याने रेल्वे क्षेत्रात केली आहे आणि येत्या काही दिवसांत पेट्रोलियम पदार्थांच्या (पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराचा गॅस) किमती तेवढय़ाच जोरात वाढविण्याची त्याची तयारी पूर्ण आहे. अमेरिकेशी केलेल्या अणुकराराच्या प्रश्नावर पूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारला धारेवर धरणारा भाजपा आता त्या कराराच्या विस्तारित अंमलबजावणीचा आग्रह धरू लागला आहे. ज्या गोष्टी जुन्या सरकारने केल्या आणि त्यासाठी त्याला भाजपाने नको तशी शिवीगाळ केली, नेमक्या त्याच गोष्टी आता नरेंद्र मोदींचे दिल्ली सरकार करीत आहे. त्या सरकारचे सर्मथन करताना त्याच्या प्रवक्त्यांच्या होणार्‍या कसरती जेवढय़ा विनोदी, तेवढय़ाच त्या सरकारचे पितळ उघडे पाडणार्‍या आहेत. या वास्तवाचा नीट धांडोळा घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणे हे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या समोरचे आव्हान आहे. ज्या पुढार्‍यांना ते पेलता येत नाही, त्यांनी अशा वेळी शांतपणे गप्प राहणे आणि जे ते करू शकतात, त्यांना बळ देणे हे त्यांचेही कर्तव्य आहे. नेमकी ही गोष्ट सोडून जे पुढारी आणि कार्यकर्ते आपापसांत भांडण्यात वेळ आणि सार्मथ्य दवडतात, त्यांच्या राजकीय मूर्खपणाला काय म्हणावे? अशा पुढार्‍यांपासून  पक्षालाच नव्हे, तर जनतेलाही वाचवावे, अशीच प्रार्थना मग नाइलाजाने करावी लागते.