शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यंत्रांचा घोळ की झोल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:42 IST

देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर व गोंदिया, भंडारा या दोन लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदानही वादग्रस्त ठरले.

देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर व गोंदिया, भंडारा या दोन लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदानही वादग्रस्त ठरले. एक हजाराहून अधिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्यामुळे मतदानाचा टक्का घटला. त्याने राजकीय पक्ष खवळून उठले व पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. १९९८ पासून ही मतदान यंत्रे वापरात आहेत. परंतु याआधी इतक्या मोठ्या प्रमाणावर ती बंद पडण्याची घटना घडली नाही. तर व्हीव्हीपॅट ही यंत्रे याच निवडणुकीत वापरली गेली. मतदान यंत्रांच्या वापराला काही राजकीय पक्षांनी कर्नाटक हायकोर्टात आव्हान दिले असता, ती उत्तम असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला होता. या पार्श्वभूमीवर सारा दोष यंत्रांना देणे योग्य ठरणार नाही. पालघरच्या जिल्हाधिकाºयांनी ऊन व धूळ याचा परिणाम यंत्रांवर झाल्याचा खुलासा केला. परंतु त्याने समाधान होण्याऐवजी नवे प्रश्न निर्माण झाले. जी यंत्रे १९९८ पासून वापरात आहेत त्या मतदान यंत्रांना याच वेळी उन्हाचा त्रास कसा झाला? ती एवढ्या प्रचंड प्रमाणात बंद कशी पडली, याचे उत्तर कुणाकडे नाही. ज्या भारतात हिमाचल, उत्तरांचल व काश्मीर यासारखी प्रचंड शीतल राज्ये आहेत व राजस्थान, केरळ, तामिळनाडूसारखी प्रचंड उष्णतामान असणारी राज्येदेखील आहेत; तेथे जी यंत्रे वापरायची ती एवढी संवेदनशील असणार नाहीत याची काळजी उत्पादक कंपनीला घेण्यास का सांगितले गेले नाही? मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्रे ही स्पेशालिटी प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे ती त्यांच्या वापरदारांच्या गरजा व निकष पूर्ण करतील अशाच रीतीने उत्पादित व्हायला हवी. अशी दक्षता निवडणूक आयोगाने का घेतली नाही? याही प्रश्नांची उत्तरे कुणाकडे नाहीत. या यंत्रांचा वापर ५ वर्षांतून ४ ते ५ वेळा होतो. एरवी ती पडूनच असतात. त्यामुळे ती वापरावयास देताना त्यांची तपासणी करणे व ती सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणे ही दक्षता निवडणूक यंत्रणेने घेतली होती का, याही प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. पर्यायी यंत्रे होती तसेच तंत्रज्ञही उपलब्ध होते, असा दावा पालघरच्या जिल्हाधिकाºयांनी केला. परंतु यंत्र बंद पडल्यानंतर ते सुरू होण्यासाठी किती वेळ जाईल? इतक्या वेळात मतदार परत जातील याचा विचार निवडणूक यंत्रणेने केला आहे असे वाटत नाही. यामुळे आताचा अनुभव पाहता निवडणूक आयोगाने या यंत्रांची तपासणी आताच सुरू करावी. पुढील वर्षी अनेक राज्यांच्या विधानसभा व लोकसभेची निवडणूक आहे. विरोधी पक्षांनीही निकोप लोकशाहीसाठी हा प्रश्न धसास लावणे गरजेचे आहे़ प्रश्न तांत्रिक चुकीचा नसून लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा आहे़