शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

यंत्रांचा घोळ की झोल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:42 IST

देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर व गोंदिया, भंडारा या दोन लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदानही वादग्रस्त ठरले.

देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर व गोंदिया, भंडारा या दोन लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदानही वादग्रस्त ठरले. एक हजाराहून अधिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्यामुळे मतदानाचा टक्का घटला. त्याने राजकीय पक्ष खवळून उठले व पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. १९९८ पासून ही मतदान यंत्रे वापरात आहेत. परंतु याआधी इतक्या मोठ्या प्रमाणावर ती बंद पडण्याची घटना घडली नाही. तर व्हीव्हीपॅट ही यंत्रे याच निवडणुकीत वापरली गेली. मतदान यंत्रांच्या वापराला काही राजकीय पक्षांनी कर्नाटक हायकोर्टात आव्हान दिले असता, ती उत्तम असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला होता. या पार्श्वभूमीवर सारा दोष यंत्रांना देणे योग्य ठरणार नाही. पालघरच्या जिल्हाधिकाºयांनी ऊन व धूळ याचा परिणाम यंत्रांवर झाल्याचा खुलासा केला. परंतु त्याने समाधान होण्याऐवजी नवे प्रश्न निर्माण झाले. जी यंत्रे १९९८ पासून वापरात आहेत त्या मतदान यंत्रांना याच वेळी उन्हाचा त्रास कसा झाला? ती एवढ्या प्रचंड प्रमाणात बंद कशी पडली, याचे उत्तर कुणाकडे नाही. ज्या भारतात हिमाचल, उत्तरांचल व काश्मीर यासारखी प्रचंड शीतल राज्ये आहेत व राजस्थान, केरळ, तामिळनाडूसारखी प्रचंड उष्णतामान असणारी राज्येदेखील आहेत; तेथे जी यंत्रे वापरायची ती एवढी संवेदनशील असणार नाहीत याची काळजी उत्पादक कंपनीला घेण्यास का सांगितले गेले नाही? मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्रे ही स्पेशालिटी प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे ती त्यांच्या वापरदारांच्या गरजा व निकष पूर्ण करतील अशाच रीतीने उत्पादित व्हायला हवी. अशी दक्षता निवडणूक आयोगाने का घेतली नाही? याही प्रश्नांची उत्तरे कुणाकडे नाहीत. या यंत्रांचा वापर ५ वर्षांतून ४ ते ५ वेळा होतो. एरवी ती पडूनच असतात. त्यामुळे ती वापरावयास देताना त्यांची तपासणी करणे व ती सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणे ही दक्षता निवडणूक यंत्रणेने घेतली होती का, याही प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. पर्यायी यंत्रे होती तसेच तंत्रज्ञही उपलब्ध होते, असा दावा पालघरच्या जिल्हाधिकाºयांनी केला. परंतु यंत्र बंद पडल्यानंतर ते सुरू होण्यासाठी किती वेळ जाईल? इतक्या वेळात मतदार परत जातील याचा विचार निवडणूक यंत्रणेने केला आहे असे वाटत नाही. यामुळे आताचा अनुभव पाहता निवडणूक आयोगाने या यंत्रांची तपासणी आताच सुरू करावी. पुढील वर्षी अनेक राज्यांच्या विधानसभा व लोकसभेची निवडणूक आहे. विरोधी पक्षांनीही निकोप लोकशाहीसाठी हा प्रश्न धसास लावणे गरजेचे आहे़ प्रश्न तांत्रिक चुकीचा नसून लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा आहे़