शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या मजुरांच्या जिवाचे मोल ते काय!

By नंदकिशोर पाटील | Updated: March 3, 2025 19:41 IST

आंदोलनं जातीसाठी होतात. मजुरांना कुठे जात असते ?

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर

जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाढून पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण, संबंधित मजुरांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करावे असे एकाही राजकीय नेत्याला वाटले नाही. मृतांपैकी एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित अथवा नेत्यांच्या नातलगांपैकी कोणी असते तर एव्हाना भेटी देणाऱ्यांची रीघ लागली असती. एखाद्याच्या मृत्यूचे सोयीने कसे राजकारण होते, त्याचे हे ताजे उदाहरण आहे. वास्तविक, एक अपघाती घटना म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण हा अपघात नसून, अवैध वाळू आणि वाळू माफियांनी घेतलेले ते बळी आहेत. पुलाचे कामाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित गुत्तेदाराने जर वैध मार्गाने वाळू आणली असती तर ती दिवसा सूर्यप्रकाशाच्या उजेडात बांधकाम साईटवर उतरवून घेतली असती. परिणामी ती दुर्दैवी घटना कदाचित टळली असती. परंतु, संबंधित गुत्तेदाराने वाळू माफियांशी संधान साधून बेकायदा वाळू आणल्याने ती रात्रीच्या अंधारात उतरवून घ्यावी लागली. दिवसभर काम करून दमून-थकून गाढ झोपेत असलेल्या मजुरांच्या बाजूलाच वाळूचा हायवा खाली करण्यात आला आणि त्या ढिगाऱ्याखाली ते निष्पाप जीव गाढले गेले. या घटनेला जबाबदार कोण ? संबंधित गुत्तेदारावर थातूरमातूर गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपले सोपस्कार उरकले. खरे तर हा सदोष मनुष्यधवाचा गुन्हा आहे आणि तो गुत्तेदारासह वाळू वाहतूक करणारा हायवा चालक, वाळू पुरवठादार आणि अशा प्रकारच्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर दाखल व्हायला हवा.

मराठवाड्यात सध्या वाळूमाफियांनी उच्छाद मांडला आहे. सरकारने वाळू उपाशाचे कंत्राट दिलेले नसताना राजरोसपणे वाळूचे उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे. विशेषत: गोदावरी, पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दूधना या प्रमुख नद्यांची वाळू माफियांनी अक्षरश: चाळण केली आहे. अवैध वाळू उपशामुळे केवळ नैसर्गिक पर्यावरण धोक्यात आले नसून, ग्रामीण भागातील सामाजिक पर्यावरणासदेखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वाळूला असलेला सोन्याचा भाव लक्षात घेता रात्रीतून गर्भश्रीमंत झालेल्या या वाळू माफियांनी ग्रामसेवकापासून तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांपर्यंत आणि पोलिस हवालदारापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळी यंत्रणा विकत घेतली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा सारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी म्हणून किती लाखांची बोली लावली जाते, याची आकडेवारी पाहिली तर या वाळूच्या धंद्यातील वरकमाईचा अंदाज येऊ शकतो. वाळूमाफियांनी प्रशासनातील वरिष्ठांना ‘मॅनेज’ केले असल्याने ते कोणालाच जुमानत नाहीत. गेल्या आठवड्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या जाफराबाद तालुक्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारावर हल्ला करण्यात आला. या वाळू माफियांना स्थानिक पातळीवर राजकीय पाठबळ मिळत असल्याने तहसीलदारांसारख्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

अवैध वाळू उपशा आणि वाहतुकीसाठी कोणाला किती हप्ता द्यायचा याचे दरपत्रक ठरलेले आहे. एका हायवासाठी महिनाकाठी २५ ते ४० हजार, ट्रॅक्टरसाठी १५ ते २० हजार, एलसीबी पथक १५ हजार, नायब तहसीलदार २० हजार, तहसीलदार ४० हजार तसे गौण खनिक अधिकारी, आरटीओ, महामार्ग पोलिस अशा सर्वांचे खिसे गरम केले जातात. अर्थात, यात काही सन्माननीय अपवाद असू शकतात. परंतु, खालपासून वरपर्यंतची यंत्रणा मॅनेज असल्याने या वाळू माफियांचे कोणी काहीच वाकडे करू शकलेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडू शकत नाही. निवडणुकीत हेच वाळू माफिया मतदान केंद्र मॅनेज करण्यात कसे पुढे असतात हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे पाच मजुरांचे बळी घेतले गेले तरी त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी सत्ताधारी असोत की विरोधक. कोणाची पावले तिकडे वळली नसावीत. गरिबांच्या जिवाचे मोल ते काय ? असे कित्येक जीव वाळूखाली चिरडले गेले तरी सध्याच्या काळात कोणाच्या डोळ्यांच्या कडा पाणावतील ही शक्यता तशी कमीच! आंदोलनं जातीसाठी होतात. मजुरांना कुठे जात असते ?

टॅग्स :sandवाळूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJalanaजालना