शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पूंछ, राजौरी, उरी, अखनूरमध्ये आता काय चालू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:04 IST

आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत. स्थिरता बंदुका, तोफांमधून नाही, आपुलकीतून निर्माण होते.

अधिक कदम, संस्थापक, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन

१९९७ पासून मी जम्मू-काश्मीरमध्ये राहतो आहे. सीमाभागातील समुदायांमध्ये  एकमेकांप्रतीच्या विश्वासाची पुनर्बांधणी करणं आणि मैत्रीचं बीज रोवणं हे काम मी इथे करत आलो आहे. दुःखातून दिलासा मिळवण्याचा आणि दुरावलेली मनं सांधण्याचा हा प्रवास आहे.

पहलगाममध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला काश्मिरींसाठी अत्यंत धक्कादायक होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त झाला. भारतीयांनी फक्त प्रत्युत्तराचीच नाही तर न्यायाचीही मागणी केली. भारत सरकारने सीमेपलीकडील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी तातडीने पावलं उचलली आणि शत्रूराष्ट्राला ठोस प्रत्युत्तर दिलं. ते देतानाच प्रारंभी भारत सरकारने त्यांच्या लष्करी यंत्रणांना धक्का लावला नाही. मात्र पाकिस्तानने आपल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. 

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागातही पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू झाला. या काळात मी स्वतः पूंछ, राजौरी, उरी, अखनूरसारख्या सीमावर्ती गावांमध्ये होतो. या गावांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार झाला. आमच्या संस्थेतील काही मुली याच परिसरातील आहेत. त्यांची गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. काहींनी नातेवाईक गमावले, काहींची घरं आता नाहीशी झाली आहेत. आजूबाजूला युद्धाचं एवढं गर्द सावट असतानाही आमच्या सर्व बालगृहांतील हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध अशा सर्व जातिधर्माच्या मुली आपापल्या श्रद्धेनुसार एकत्र प्रार्थना करीत होत्या. त्यांना पाहून वाटलं, हीच आपल्या भारतीय असण्याची खरी ओळख आहे. 

भारत हा केवळ एक शक्तिशाली देश नाही. नैतिकता, मानवता आणि सहिष्णुता हा भारताचा श्वास आहे, हे पहलगामनंतर, प्रामुख्याने सीमाभागात तणाव उसळलेला असताना जगाला दाखवून देणं आवश्यक होतं. ते दाखवण्यासाठी भारतभरातून प्रयत्न झाले जे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी काय करायचं? सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनात कडवटपणा नव्हे, तर बंधुत्वाची भावना जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काश्मिरी हे भारताचेच नागरिक आहेत आणि ते आपला अविभाज्य भाग आहेत हे आपण भारतीय म्हणून सदैव लक्षात ठेवायला हवं. घडलेल्या घटनांमुळे आपल्या मनात त्यांच्याबद्दल दोष, रोष किंवा अविश्वास बाळगणं हे आपल्या देशाच्या शांततेला धक्का पोहोचवणारं ठरेल. 

पाकिस्तानसारखे देश आपल्यामध्येच भेदाच्या भिंती उभ्या करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याच उद्देशाने पहलगाम आणि त्यानंतरच्या घटना घडल्या. हे केवळ हल्ले नाहीत तर आपल्यात फूट पाडण्याच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय रणनीतीचा तो एक भाग होता याचा विसर आपल्याला पडून चालणार नाही. भारताला युद्धसदृश परिस्थितीमध्ये खेचून काश्मीरच्या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा हेतू होता. तिसऱ्या देशांची मध्यस्थी होऊन शस्त्रसंधी जाहीर झाली आणि काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय न ठेवता जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाला यश आलं. कलम ३७० रद्द झाल्यानंतर भारत आता पीओकेच्या दिशेने वाटचाल करेल ही भीती पाकिस्तानला आहे. पण, भारताची भूमिका स्पष्ट आणि शांततेची राहिली तर दहशतीचा अंत होईल. विश्वास वाढीला लागेल. 

या काळात आम्ही लेहहून कारगिल, झोजीलापासून गुरेझ, कुपवाऱ्यापासून अनंतनाग, पूंछपासून राजौरी आणि अखनूर ते आर. एस. पुरा असा सतत प्रवास करीत होतो. संघर्षकाळात समाजात भीती नको तर विश्वास असावा असं आम्हाला वाटत होतं. सीमाभाग अशांत होता तेव्हा आम्ही आमच्या देशाच्या अंतःकरणात शांततेचा संवाद रुजवत होतो. 

पहलगाममधील भ्याड हल्ल्याला हेच सर्वांत योग्य उत्तर आहे. घृणेच्या बदल्यात प्रेम आणि दहशतीच्या बदल्यात उदंड मानवता!  आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत.  खरी स्थिरता ही बंदुका आणि तोफांमधून नाही तर आपुलकीतून निर्माण होते.     adhik@borderlessworldfoundation.org

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर