शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

पूंछ, राजौरी, उरी, अखनूरमध्ये आता काय चालू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:04 IST

आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत. स्थिरता बंदुका, तोफांमधून नाही, आपुलकीतून निर्माण होते.

अधिक कदम, संस्थापक, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन

१९९७ पासून मी जम्मू-काश्मीरमध्ये राहतो आहे. सीमाभागातील समुदायांमध्ये  एकमेकांप्रतीच्या विश्वासाची पुनर्बांधणी करणं आणि मैत्रीचं बीज रोवणं हे काम मी इथे करत आलो आहे. दुःखातून दिलासा मिळवण्याचा आणि दुरावलेली मनं सांधण्याचा हा प्रवास आहे.

पहलगाममध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला काश्मिरींसाठी अत्यंत धक्कादायक होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त झाला. भारतीयांनी फक्त प्रत्युत्तराचीच नाही तर न्यायाचीही मागणी केली. भारत सरकारने सीमेपलीकडील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी तातडीने पावलं उचलली आणि शत्रूराष्ट्राला ठोस प्रत्युत्तर दिलं. ते देतानाच प्रारंभी भारत सरकारने त्यांच्या लष्करी यंत्रणांना धक्का लावला नाही. मात्र पाकिस्तानने आपल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. 

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागातही पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू झाला. या काळात मी स्वतः पूंछ, राजौरी, उरी, अखनूरसारख्या सीमावर्ती गावांमध्ये होतो. या गावांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार झाला. आमच्या संस्थेतील काही मुली याच परिसरातील आहेत. त्यांची गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. काहींनी नातेवाईक गमावले, काहींची घरं आता नाहीशी झाली आहेत. आजूबाजूला युद्धाचं एवढं गर्द सावट असतानाही आमच्या सर्व बालगृहांतील हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध अशा सर्व जातिधर्माच्या मुली आपापल्या श्रद्धेनुसार एकत्र प्रार्थना करीत होत्या. त्यांना पाहून वाटलं, हीच आपल्या भारतीय असण्याची खरी ओळख आहे. 

भारत हा केवळ एक शक्तिशाली देश नाही. नैतिकता, मानवता आणि सहिष्णुता हा भारताचा श्वास आहे, हे पहलगामनंतर, प्रामुख्याने सीमाभागात तणाव उसळलेला असताना जगाला दाखवून देणं आवश्यक होतं. ते दाखवण्यासाठी भारतभरातून प्रयत्न झाले जे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी काय करायचं? सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनात कडवटपणा नव्हे, तर बंधुत्वाची भावना जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काश्मिरी हे भारताचेच नागरिक आहेत आणि ते आपला अविभाज्य भाग आहेत हे आपण भारतीय म्हणून सदैव लक्षात ठेवायला हवं. घडलेल्या घटनांमुळे आपल्या मनात त्यांच्याबद्दल दोष, रोष किंवा अविश्वास बाळगणं हे आपल्या देशाच्या शांततेला धक्का पोहोचवणारं ठरेल. 

पाकिस्तानसारखे देश आपल्यामध्येच भेदाच्या भिंती उभ्या करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याच उद्देशाने पहलगाम आणि त्यानंतरच्या घटना घडल्या. हे केवळ हल्ले नाहीत तर आपल्यात फूट पाडण्याच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय रणनीतीचा तो एक भाग होता याचा विसर आपल्याला पडून चालणार नाही. भारताला युद्धसदृश परिस्थितीमध्ये खेचून काश्मीरच्या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा हेतू होता. तिसऱ्या देशांची मध्यस्थी होऊन शस्त्रसंधी जाहीर झाली आणि काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय न ठेवता जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाला यश आलं. कलम ३७० रद्द झाल्यानंतर भारत आता पीओकेच्या दिशेने वाटचाल करेल ही भीती पाकिस्तानला आहे. पण, भारताची भूमिका स्पष्ट आणि शांततेची राहिली तर दहशतीचा अंत होईल. विश्वास वाढीला लागेल. 

या काळात आम्ही लेहहून कारगिल, झोजीलापासून गुरेझ, कुपवाऱ्यापासून अनंतनाग, पूंछपासून राजौरी आणि अखनूर ते आर. एस. पुरा असा सतत प्रवास करीत होतो. संघर्षकाळात समाजात भीती नको तर विश्वास असावा असं आम्हाला वाटत होतं. सीमाभाग अशांत होता तेव्हा आम्ही आमच्या देशाच्या अंतःकरणात शांततेचा संवाद रुजवत होतो. 

पहलगाममधील भ्याड हल्ल्याला हेच सर्वांत योग्य उत्तर आहे. घृणेच्या बदल्यात प्रेम आणि दहशतीच्या बदल्यात उदंड मानवता!  आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत.  खरी स्थिरता ही बंदुका आणि तोफांमधून नाही तर आपुलकीतून निर्माण होते.     adhik@borderlessworldfoundation.org

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर