शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
3
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
4
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
7
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
8
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
9
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
10
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
11
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
12
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
13
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
14
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

पूंछ, राजौरी, उरी, अखनूरमध्ये आता काय चालू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:04 IST

आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत. स्थिरता बंदुका, तोफांमधून नाही, आपुलकीतून निर्माण होते.

अधिक कदम, संस्थापक, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन

१९९७ पासून मी जम्मू-काश्मीरमध्ये राहतो आहे. सीमाभागातील समुदायांमध्ये  एकमेकांप्रतीच्या विश्वासाची पुनर्बांधणी करणं आणि मैत्रीचं बीज रोवणं हे काम मी इथे करत आलो आहे. दुःखातून दिलासा मिळवण्याचा आणि दुरावलेली मनं सांधण्याचा हा प्रवास आहे.

पहलगाममध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला काश्मिरींसाठी अत्यंत धक्कादायक होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त झाला. भारतीयांनी फक्त प्रत्युत्तराचीच नाही तर न्यायाचीही मागणी केली. भारत सरकारने सीमेपलीकडील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी तातडीने पावलं उचलली आणि शत्रूराष्ट्राला ठोस प्रत्युत्तर दिलं. ते देतानाच प्रारंभी भारत सरकारने त्यांच्या लष्करी यंत्रणांना धक्का लावला नाही. मात्र पाकिस्तानने आपल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. 

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागातही पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू झाला. या काळात मी स्वतः पूंछ, राजौरी, उरी, अखनूरसारख्या सीमावर्ती गावांमध्ये होतो. या गावांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार झाला. आमच्या संस्थेतील काही मुली याच परिसरातील आहेत. त्यांची गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. काहींनी नातेवाईक गमावले, काहींची घरं आता नाहीशी झाली आहेत. आजूबाजूला युद्धाचं एवढं गर्द सावट असतानाही आमच्या सर्व बालगृहांतील हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध अशा सर्व जातिधर्माच्या मुली आपापल्या श्रद्धेनुसार एकत्र प्रार्थना करीत होत्या. त्यांना पाहून वाटलं, हीच आपल्या भारतीय असण्याची खरी ओळख आहे. 

भारत हा केवळ एक शक्तिशाली देश नाही. नैतिकता, मानवता आणि सहिष्णुता हा भारताचा श्वास आहे, हे पहलगामनंतर, प्रामुख्याने सीमाभागात तणाव उसळलेला असताना जगाला दाखवून देणं आवश्यक होतं. ते दाखवण्यासाठी भारतभरातून प्रयत्न झाले जे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी काय करायचं? सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनात कडवटपणा नव्हे, तर बंधुत्वाची भावना जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काश्मिरी हे भारताचेच नागरिक आहेत आणि ते आपला अविभाज्य भाग आहेत हे आपण भारतीय म्हणून सदैव लक्षात ठेवायला हवं. घडलेल्या घटनांमुळे आपल्या मनात त्यांच्याबद्दल दोष, रोष किंवा अविश्वास बाळगणं हे आपल्या देशाच्या शांततेला धक्का पोहोचवणारं ठरेल. 

पाकिस्तानसारखे देश आपल्यामध्येच भेदाच्या भिंती उभ्या करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याच उद्देशाने पहलगाम आणि त्यानंतरच्या घटना घडल्या. हे केवळ हल्ले नाहीत तर आपल्यात फूट पाडण्याच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय रणनीतीचा तो एक भाग होता याचा विसर आपल्याला पडून चालणार नाही. भारताला युद्धसदृश परिस्थितीमध्ये खेचून काश्मीरच्या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा हेतू होता. तिसऱ्या देशांची मध्यस्थी होऊन शस्त्रसंधी जाहीर झाली आणि काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय न ठेवता जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाला यश आलं. कलम ३७० रद्द झाल्यानंतर भारत आता पीओकेच्या दिशेने वाटचाल करेल ही भीती पाकिस्तानला आहे. पण, भारताची भूमिका स्पष्ट आणि शांततेची राहिली तर दहशतीचा अंत होईल. विश्वास वाढीला लागेल. 

या काळात आम्ही लेहहून कारगिल, झोजीलापासून गुरेझ, कुपवाऱ्यापासून अनंतनाग, पूंछपासून राजौरी आणि अखनूर ते आर. एस. पुरा असा सतत प्रवास करीत होतो. संघर्षकाळात समाजात भीती नको तर विश्वास असावा असं आम्हाला वाटत होतं. सीमाभाग अशांत होता तेव्हा आम्ही आमच्या देशाच्या अंतःकरणात शांततेचा संवाद रुजवत होतो. 

पहलगाममधील भ्याड हल्ल्याला हेच सर्वांत योग्य उत्तर आहे. घृणेच्या बदल्यात प्रेम आणि दहशतीच्या बदल्यात उदंड मानवता!  आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत.  खरी स्थिरता ही बंदुका आणि तोफांमधून नाही तर आपुलकीतून निर्माण होते.     adhik@borderlessworldfoundation.org

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर