शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हनुमान जन्मस्थळावरून आत्ता भांडून काय होणार आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 07:47 IST

देवाच्या नावानं भांडणारी धर्मपीठे, संघटना जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी काय करतात, हा प्रश्न एकदा या आखाडाधारी महंतांना खडसावून विचारला पाहिजे!

अनेक दशके वादग्रस्त राहिलेला आणि जनमानस ढवळून काढलेला राममंदिर - बाबरी मशीद मुद्दा न्यायालयीन निर्णयाने मिटतो तोच देशात ‘मथुरा, काशी बाकी हैं’चा नारा निनादू लागला. जोडीला तुमचा लाऊडस्पीकर तर आमची हनुमान चालीसा, ज्ञानव्यापी मशीद की शिवलिंग आदी धार्मिक कट्टरतावादाची चढती कमान दिसू लागली. काल-परवापर्यंत या कलहामागे आंतरधर्मीय अस्मितांची किनार होती. पण, आज धार्मिक अस्मितांची प्रतीके भक्कम करण्याचा हा खेळ इतका विकोपाला गेला आहे की हनुमान जन्मस्थळावरून हिंदू धर्मपीठांतच वाद सुरू झाला आहे. 

वाल्मीकी रामायणाच्या आधारे जगद्गुरू शंकराचार्यांनी मान्यता दिल्यानुसार हनुमानाचे जन्मस्थळ कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधा ट्रस्टने केला. याला नाशिकजवळच्या अंजनेरीचे ग्रामस्थ आणि इतर आखाड्यातील साधू - संत - महंतांनी आक्षेप घेतला. त्यामुळे अंजनेरी हनुमान जन्मस्थळाचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित कथित धर्मसभेत जमलेल्या संत - महंतांतील पुढारी  हमरीतुमरी - हातघाईवर आल्याचे सर्वांनी पाहिले.  हे कमी म्हणून की काय हनुमान जन्मस्थळावरून बोलाविलेली चर्चा भरकटून ती ‘काॅंग्रेसवाले - भाजपवाले’ या राजकीय पातळीवर पोहोचली.

भारतात धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालत असतात, याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली. पण, धर्ममार्तंडांआडून राजकारण करणाऱ्यांना शेवटी धर्ममार्तंडच अडचणीत आणत असतात हे वास्तवदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. एका बाजूला जगाला मन:शांतीचे उपदेशामृत पाजत अध्यात्माची महती गायची आणि स्वतः मात्र अशांतीचा मार्ग अवलंबायचा! यावरून या तथाकथित धर्मगुरूंना आपलाच ‘डोलारा’ सांभाळता येत नाही, हेच अधोरेखित होते. या सर्व घडामोडी, दावे - प्रतिदावे, धर्मपीठांवरील वर्चस्वाच्या लढाईचे वर्णन देव झाले उदंड आणि भक्तांना चढला भक्तीचा गंड,  देव देव्हाऱ्यात आणि भक्त उन्मादात, असेच करावे लागेल.

श्रद्धाळू भक्त मनातल्या आस्थेपायी देवस्थानात येतो, काही काळ थांबतो, मनोभावे प्रार्थना करतो, यथाशक्ती देणगी देतो आणि सुखा-समाधानाच्या आशेने घरी परततो. मात्र, त्यांच्या या स्वाभाविक आणि आस्थेच्या छोट्या कृतीतून देवस्थान नावाचा भला थोरला  डोलारा उभा राहिला. दुसरीकडे देवतांबरोबरच धार्मिक गुरू - बाबा - आचार्य यांचीही संख्या व प्रस्थ झपाट्याने वाढून बलाढ्य आणि धनाढ्य धार्मिक संस्थाने निर्माण झाली. खेदाची बाब म्हणजे या धार्मिक संस्थानांना जनाधार आणि राजाश्रयदेखील मिळत आहे. नेतृत्वाने जनतेला वळण लावणे गरजेचे आहे. पण, आज नेतृत्वच जनतेच्या वळणाने जाण्यात धन्यता मानत आहे. 

आज देशापुढे अगणित समस्या आहेत. त्या नजरेआड करून धर्मज्वर जागता ठेवण्यात आपण वेळ दडवतो आहोत. सामाजिक विज्ञानाचा एक सिद्धान्त आहे की, जसजसा एखादा समाज शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगत होत जातो तसतशी तेथील जनता आधुनिक विचारांची होत जाते. पण, आपला समाज या विज्ञानाला अपवाद ठरतो आहे. देवाच्या नावानं भांडणारी धर्मपीठे, संघटना जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी काय करीत असतात? म्हणूनच कदाचित एका द्रष्ट्या विचारवंताने असा रोखठोक सवाल उपस्थित केला होता की, ‘कुठे असतात ही धर्मपीठे? आणि एरवी हे धर्मगुरू काय करीत असतात?’ - आज हा प्रश्न कधी नव्हे इतका महत्त्वाचा ठरतो आहे! - बाळकृष्ण शिंदे, पुणे