शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

बंद दाराआड दोन भेटींत काय ठरलं?- अधिवेशनात कळेल!

By यदू जोशी | Updated: June 11, 2021 09:15 IST

सध्या फक्त तर्कवितर्क लढविले जात आहेत. मोदी-ठाकरे भेटीने दोघांमधील कटुता आणि केंद्र सरकारची राज्याला मिळणारी सापत्नपणाची वागणूक कमी व्हावी अशी अपेक्षा आहे.

- यदु जोशी(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख असलेले मंत्री अशोक चव्हाण भेटले त्यापेक्षा जास्त चर्चा मोदी-ठाकरे यांच्यातील ‘वन टू वन’ बैठकीची झाली. दोघांच्या पाऊण तासाच्या बंदद्वार बैठकीत काय ठरलं हे लगेच बाहेर येण्याची शक्यता नाही. सध्या फक्त तर्कवितर्क लढविले जात आहेत. मोदी-ठाकरे भेटीने दोघांमधील कटुता आणि केंद्र सरकारची राज्याला मिळणारी सापत्नपणाची वागणूक कमी व्हावी अशी अपेक्षा आहे. राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत केंद्राच्या भरीव मदतीशिवाय पर्याय नाही हे ठाकरे यांना चांगलेच ठावूक आहे आणि राज्य हिताच्या दृष्टीनं त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला असणार. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेले होते. मोदी-ठाकरे आणि पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय ठरलं हे राज्यात आगामी काळात काही राजकीय घडामोडी घडल्या तर त्यावरूनच कळेल. अशा भेटींमध्ये काय घडलं हे सांगितलं जात नसतं, त्यावर थेट कृतीच होते. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून मुंबईत सुरू होतंय. वरील दोन भेटींचे काही राजकीय पडसाद उमटायचेच असतील तर ते या अधिवेशनात उमटतील. अधिवेशनात कळीचा मुद्दा असेल तो विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा. काँग्रेसचे नाना पटोेले यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त असून, राष्ट्रवादीचे असलेले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारभार पाहताहेत. अध्यक्षांची निवड लवकर करा यासाठी काँग्रेस आग्रही आहे. हात वर करून, आवाजी मतदानानं की गुप्त मतदानानं ही निवडणूक होईल? याबाबत उत्सुकता आहे. गुप्त मतदान झालं तर गडबडीला संधी असेल. काँग्रेसचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हा फॅक्टर महत्त्वाचा राहील. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदासह मंत्रिपदही द्यायचं असं काँग्रेसनं ठरवलं तर एका विद्यमान मंत्र्यास अध्यक्षपदी बसवलं जाईल. - बंद दाराआडच्या दोन भेटींमध्ये सत्ताकारण बदलायची चर्चा झाली असेल तर अध्यक्षपदाची निवडणूक हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. नाहीतर महाविकास आघाडी सरकार १७०च्या बहुमतासह भक्कम आहेच.  तिघेही मजबुतीनं एकत्र राहिले तर गुप्त मतदानाचा विषयही येणार नाही. संभाव्य गडबडींचा विषय नकोच म्हणून अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात घेतलीच नाही तर तो काँग्रेसला मोठा धक्का असेल. विधानसभागृह राष्ट्रवादीच्या हाती राहील.

भाजप खेळणार ओबीसी कार्डमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या मराठा नेत्यांची फौज राज्यभर पाठवून जनसंपर्क करण्यात आला. आम्ही रान पेटवल्यानं खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आंदोलनाची घोषणा करावी लागली असा दावा भाजपचे एक बडे नेते परवा करत होते. मराठा आंदोलनाला पाठिंब्याचा निर्णय पक्षानं आधीच घेतला आहे.  आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार कसं जबाबदार आहे हा मुद्दा घेऊन भाजपच्या नेत्यांची फौज राज्यभरात उतरवली जाणार आहे. पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. संजय कुटे, योगेश टिळेकर अशा दहाबारा नेत्यांना मैदानात उतरवलं जाईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत हक्काची ओबीसी व्होटबँक भाजपपासून विशेषत: विदर्भात दुरावली व त्याचा फटका बसला होता. आता आरक्षणाच्या निमित्तानं ती आपल्याकडे वळविण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. इतर पक्षांतील लहानमोठे नेते भाजपमध्ये आणण्यासाठीही रणनीती आखली जात आहे. जुलैपासून त्याची सुरुवात होईल. मतदारसंघातील बडा मासा गळाला लावण्याऐवजी पाच ते दहा हजार मतांची ताकद असलेल्यांना ओढण्याचे प्रयत्न असतील. सत्ता गेल्यानंतर बंद पडलेलं इनकमिंग पुन्हा सुरू होणार तर !!

निवडणूक आयोगाचं ‘गो स्लो’ओबीसींचं (व्हीजेएनटी, एसबीसीसह) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं संपुष्टात आलं असलं तरी तसा आदेश राज्य निवडणूक आयोगानं अद्याप काढलेला नाही. हजारो ओबीसींचं लोकप्रतिनिधीत्व संपुष्टात आलं तर असंतोष पसरेल; राज्य सरकारला तो नकोच असणार. त्यामुळे आयोगाला या आदेशावर ‘ग्लो स्लो’च्या सूचना गेल्यात असं म्हणतात. ओबीसींचा इम्पिरिकल डाटा लवकरात लवकर तयार करायचा आणि त्या आधारे ओबीसींना पुन्हा आरक्षण बहाल करायचं हे शक्य झालं तर राज्य शासनाला तो मोठा दिलासा असेल. त्यासाठीचीच कसरत चाललेली दिसते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे