शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

एखादी भाषा मरते, तेव्हा नेमके काय होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:59 IST

जेव्हा एखादी भाषा मृत होते, तेव्हा जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोनच आपण गमावून बसतो, याचे भान आपल्याला असले पाहिजे!

प्रमोद मुनघाटे 

डायनीयल एब्राम हा अमेरिकन गणितज्ञ म्हणतो, एखाद्या भाषिक समूहातील व्यक्तीला  तो समाज व्यवसाय देऊ शकत नसेल तर ती व्यक्ती तो भाषिक समाज सोडून देण्याचा प्रयत्न करते.  सध्या जगात सुमारे सहा हजार भाषा अस्तित्वात आहेत आणि एब्रामच्या गणिती सूत्रानुसार एकविसाव्या शतकाच्या अखेरीस संपूर्ण जगात सुमारे ३०० भाषाच जिवंत राहतील. सुमारे ६० अशा भाषा आहेत की त्या भाषेतील अखेरची व्यक्ती जिवंत आहे. जगातील  अनेक भाषा आज मरणासन्न आहेत. 

 भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीसारख्या शेकडो  प्रादेशिक भाषा आणि आदिवासींच्या भाषा नष्ट झाल्या तर काय फरक पडतो? जागतिकीकरणाने  १९९२ ते २००० हे दशकच मानवी इतिहासात भाषिक क्रांतीचे ठरले. त्यातून इंग्रजी ही जागतिक भाषा जगाला मिळाली, जगातील अर्ध्याअधिक भाषा मृत्युपंथावर आहेत हे प्रथमच जगाला, अभ्यासकांना कळले; आणि  या दशकात इंटरनेट हे नवे संज्ञापनमाध्यम जगाला मिळाले. लिहिणे व बोलणे एवढेच माहीत असलेल्या माणसाच्या हाती इंटरनेट, ई-मेल व चॅटरूम या गोष्टी आल्या. त्यामुळे  मानवी नातेसंबंधात व देशांच्या आंतरराष्ट्रीय संबंधात आमूलाग्र बदल झाले.  

इंग्रजी ही जागतिक भाषा होण्याची करणे कोणती?- डॉ. क्रिस्टल यांच्या मते इंग्रजी भाषेची ताकद चार प्रकारची आहे. एक, ब्रिटिश साम्राज्यामुळे मिळालेली राजकीय ताकद; दुसरी ज्ञानाची ताकद. (जगातील ऐंशी  टक्के वैज्ञानिक शोधांची भाषा इंग्रजी असते) तिसरी आर्थिक ताकद (जगातील बहुसंख्य बँकिंग संस्थांचा व्यवहार इंग्रजीत चालतो) आणि चौथी सांस्कृतिक ताकद! विसाव्या शतकातील सर्व नव्या सांस्कृतिक बाबी इंग्रजी भाषिक देशांत सुरू झाल्या. नभोवाणी, चित्रवाणी, चित्रपट, जाहिरात, वृत्तसंस्था, विमान प्रवासाचे नियंत्रण, इंटरनेट. जगातील पंचाऐंशी टक्के चित्रपटांची भाषा इंग्रजी असते. भाषांच्या अस्ताबाबत केवळ भाषाशास्रज्ञच नव्हे तर जीवशास्रज्ञही चिंताग्रस्त आहेत. कारण प्रत्येक भाषा ही एक प्रकारे स्वतंत्र ज्ञानशाखा असते. जेव्हा एखादी भाषा मृत होते, तेव्हा जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोनच आपण गमावून बसतो.

भारतातील भाषांचे सर्वप्रथम सर्वेक्षण जॉर्ज अब्राहम ग्रीअर्सन यांनी दीडशे वर्षांपूर्वी केले होते. त्यानुसार १७९ भाषा आणि ५४४ बोलींची नोंद होती. स्वातंत्र्यानंतर जनगणना सुरू झाली. जनगणनेत प्रत्येक व्यक्तीच्या मातृभाषेची नोंद होते. सन १९६१च्या जनगणनेत भारतातील मातृभाषांची संख्या १६५२ होती. यापैकी ३०० मातृभाषा आदिवासींच्या होत्या. दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या आधारावर भाषांचा विचार केल्यामुळे फक्त १०८ भाषांनाच मातृभाषेचा दर्जा देण्यात आला. आणि उर्वरित सर्व भाषांना १०९ व्या क्रमांकात ढकलून दिले गेले, ज्यात बहुसंख्य आदिवासी बोली आहेत. या बोलींना आपण लोकभाषा म्हणू.  जनगणनेनुसार भारतातील लोकभाषांना कोणताही दर्जा नाही. भाषा काही हवेत निर्माण होत नाहीत. लोकांच्या सामाजिक व्यवहाराची जिवंत संस्था म्हणजे भाषा होय. त्या लोकांच्या सुखदुःखाची, प्राचीन परंपरांची, त्यांच्या वंशपरंपरागत ज्ञानाची अभिव्यक्ती त्यांच्या भाषेतूनच लोक करीत असतात. त्यांच्या भाषेचे अस्तित्व नाकारणे म्हणजे एकप्रकारे त्यांचेच अस्तित्व नाकारणे होय.

१९९१च्या जनगणनेनुसार गोंडी भाषा बोलणाऱ्यांची  संख्या सुमारे वीस लाख आहे. माडिया भाषा एक लाख लोक बोलतात. कोरकू आणि मुंडा भाषा बोलणारे साडेचार लाख आदिवासी आहेत. मुंडारी, संथाली, पावरा, कुई, तुलू, मणीपुरी, त्रिपुरी आणि सावरा या आदिवासी बोली एक लाख ते आठ लाख संख्येच्या दरम्यान आहेत. - या भाषांना लिपी नाही म्हणून त्या अधिकृत नाही का?  हा त्या त्या भाषिक समूहाचे लोकशाहीचे हक्क नाकारण्याचा मुद्दा आहे. कोणत्याही भाषेचे जिवंतपण त्या भाषेच्या पोटभाषांच्या व्यवहारात असते. भारतीय समाजात आजही अशा असंख्य पोटभाषा तग धरून आहेत आणि गेल्या तीन हजार वर्षात अखंडितपणे भारतीय संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवण्याचे महान कार्य या भाषांनी केले आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मातृभाषाच हवी.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र