शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

‘बॅड बँक’ म्हणजे नक्की काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 04:40 IST

थकीत कर्जे किंवा अनुत्पादित कर्जे ही बँकांची मोठी डोकेदुखी! त्या कचाट्यातून त्यांची मान सोडवण्यासाठीची ही कल्पना तशी जुनीच आहे!

प्रा. नंदकुमार काकिर्डे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

पूर्वार्ध - केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना नजिकच्या काळात ‘बॅड बँके’ची (ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी - एआरसीची ) स्थापना केली जाईल, असे जाहीर करून त्यासाठी वीस हजार कोटी रुपयांचे भांडवल दिले. त्यानंतर देशात या संकल्पनेची चर्चा सुरू झाली. खरं तर ही काही नवीन कल्पना नाही. आपल्याकडे २००२ मध्येच सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड रिएन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटीज इंटरेस्ट ॲक्ट ( सरफेसी ॲक्ट ) हा कायदा करण्यात आला. त्यानुसार अनेक ‘एआरसी’ज् देशात अस्तित्वात आहेत. त्या पार्श्वभूमीवर या ‘बॅड बँके’ची संकल्पना काय, त्याची आवश्यकता आहे किंवा कसे, याचा थोडा धांडोळा घेऊ.

भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून बँकिंग क्षेत्र अस्तित्वात आहे. त्यात खासगी, सहकारी व सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीच्या बँका मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्व बँकांचा एकूण कारभार, व्यवसाय प्रचंड मोठा आहे. कोट्यवधी रुपयांच्या ठेवींबरोबरच उद्योग, व्यापार व अन्य विविध वर्गांना, क्षेत्रांना कोट्यवधी रुपयांची कर्जे या बँका देतात. सर्वसामान्यांनी काबाडकष्ट करून बचत, ठेवींद्वारे या बँकांकडे विश्वासाने पैसा सोपवलेला असतो. केंद्र सरकारच्या मालकीचे कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये असले तरी तो पैसा अखेर जनतेचाच असतो.

या सर्व बँकांचीच एकूण आर्थिक कामगिरी, कार्यक्षमता, नफा-तोटा, कर्जवाटप, त्यांची वसुली व बँकांची थकीत कर्जे किंवा अनुत्पादित कर्जे ( ज्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् - एनपीए म्हणतात), बुडीत कर्जदारांची नावे, यादी, त्यांचे पळून जाणे याची माहिती किंवा आकडेवारी पाहिली किंवा ऐकली तरी सर्वसामान्य माणसाचे डोके गरगरायला लागते. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात देशभरात कोरोनाने थैमान घातले. त्यापोटी लादल्या गेलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्व व्यापार, उद्योग, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले गेले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूलतेचा परिणाम बँकांच्या कामगिरीवर तसेच कार्यक्षमतेवर झाला. सर्व बँकांच्या थकीत कर्जामध्ये प्रचंड वाढ झाली व त्यामुळे अनुत्पादक, थकीत कर्जांचा डोंगर वाढत राहिला.

केंद्र सरकारसमोर ‘एनपीए’ निस्तरण्यासाठी ‘बॅड बँके’ची स्थापना करावी, असा प्रस्ताव विचाराधीन होता. ही ‘बॅड बँक’ म्हणजे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (एआरसी) होय. या ‘बॅड बँके’च्या निर्मितीतून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा ताळेबंद सुधारला जावा, अशी कल्पना आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांची अनुत्पादित, थकीत कर्जे (मालमत्ता) या ‘एआरसी’ला विकायची, त्यांच्याकडे पूर्ण वर्ग करावयाची व त्या बॅड बँकेने थकीत कर्जाच्या मालमत्ता बाजारात विकण्याचे बाळंतपण, कर्ज वसुलीची कार्यवाही कार्यक्षमतेने करावयाची अशी ही कल्पना आहे. दरवर्षी मार्चअखेरीस सर्व बँकांना त्यांच्या थकीत, अनुत्पादक कर्जांसाठीची तरतूद ढोबळ नफ्यातून वजावट करून करावी लागते.

अनेक वेळा ही कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) करावी लागतात; मात्र त्यामुळे कर्जवसुली थांबत नाही. ती कारवाई पुढे सुरू ठेवावी लागते; मात्र थकीत कर्जामुळे बँकांची आर्थिक गाडी बिघडते व कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. ही तोट्याची गाडी थांबवावी म्हणून केंद्र सरकारने सर्व थकीत किंवा अनुत्पादक कर्जे वेगळी काढून ती या ‘बॅड बँके’कडे पुस्तकी किमतीला वर्ग (कमी बाजार मूल्य लक्षात घ्यायचे नाही) करावयाची. म्हणजे या सर्व मालमत्तांची जबाबदारी ‘बॅड बँके’ने घ्यायची व मालमत्ता विक्रीतून कर्जफेड करून घ्यायची, अशी ही कल्पना! बँकांनी जनतेकडून ठेवी घ्याव्यात, योग्य कर्जदारांना कर्जे द्यावीत व अगदी अखेरच्या रुपयापर्यंत त्याची योग्य, वाजवी व्याजदराची, मूळ कर्जाची परतफेड होते किंवा कसे, याकडे लक्ष देऊन कार्यक्षम बँकिंग व्यवसाय करावा. या सर्व बँका बँकिंग नियमन कायद्यानुसार व रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली काम करीत असतात. त्यामुळे कर्जे देणे, त्याची वसुली करून छोट्या मोठ्या व्यापारी, व्यावसायिक यांना आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका बँकांनी सतत ठेवली पाहिजे. बँकांच्या ताळेबंदामधून ही थकीत कर्जे काढून टाकली व त्यांच्या वसुलीची स्वतंत्र, कार्यक्षम यंत्रणा उभारली तर यावर चांगला मार्ग निघू शकेल, अशी ही चांगली कल्पना निश्चित आहे. मात्र या ‘बॅड बँके’चे यश अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. त्याबद्दलची चर्चा उद्या या लेखाच्या उत्तरार्धात करू!nandkumar.kakirde@gmail.com

टॅग्स :bankबँक