शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

नैतिकता हरवलेल्या समाजाकडून आणखी काय अपेक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:41 IST

‘आम्हाला नैराश्याने ग्रासले होते’, असा कबुलीजबाब आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला. द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याच्या टीमने बॉलशी छेडछाड का केली, असे विचारले असता त्याने वरीलप्रमाणे उत्तर दिले. त्या उत्तरातून कलंक लागलेल्या आॅस्ट्रेलियन कर्णधाराची मानसिकता तसेच आजच्या समाजाचीही मानसिकता दिसून येते. सामना जिंकणे आणि कसेही करून सामना जिंकणे यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न क्रिकेट मैदानावर तसेच मैदानाच्या बाहेरही झाल्याचे दिसून येते.

- राजदीप सरदेसाईज्येष्ठ पत्रकार आणि लेखक‘आम्हाला नैराश्याने ग्रासले होते’, असा कबुलीजबाब आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला. द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याच्या टीमने बॉलशी छेडछाड का केली, असे विचारले असता त्याने वरीलप्रमाणे उत्तर दिले. त्या उत्तरातून कलंक लागलेल्या आॅस्ट्रेलियन कर्णधाराची मानसिकता तसेच आजच्या समाजाचीही मानसिकता दिसून येते. सामना जिंकणे आणि कसेही करून सामना जिंकणे यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न क्रिकेट मैदानावर तसेच मैदानाच्या बाहेरही झाल्याचे दिसून येते.आधुनिक क्रीडा जगतात आजच्या स्पर्धात्मक युगाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. तेथे साधनांपेक्षा साध्य महत्त्वाचे ठरते. आधुनिक आॅलिम्पिकची पायाभरणी करणाऱ्या पिअरे द कोबर्टीनचे म्हणणे होते,‘आॅलिम्पिक खेळात जिंकणे महत्त्वाचे नाही तर सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. तसेच विजयी होणे हे जीवनाचे लक्ष्य नसते तर संघर्ष करणे महत्त्वाचे असते. जिंकण्यापेक्षा चांगली लढत देणे जास्त महत्त्वाचे असते.’ पण आॅलिम्पिकचे हे उद्दिष्ट जुन्या काळापुरते मर्यादित होते, कारण त्यावेळी खेळ हा फावल्या वेळेपुरता मर्यादित होता. क्रिकेट हा संभावितांचा खेळ आहे, असा त्या खेळाविषयीचा गैरसमज होता. कारण त्याकाळी ब्रिटन साम्राज्य हे नियमानुसार खेळ खेळण्यासाठी ओळखले जायचे.एकविसाव्या शतकातील खेळ हे मात्र स्पर्धात्मक राष्टÑीयतेचा भाग बनले आहेत आणि ते दोन राष्टÑांमधील युद्धाप्रमाणे खेळले जात असतात. त्यात विजयी होणं राष्टÑाचा सन्मान ठरतो. कम्युनिस्ट पद्धतीचे श्रेष्ठत्व दर्शविण्यासाठी शीतयुद्धाच्या काळात रशियन राष्टÑांनी डोपिंगचा कार्यक्रम राबविला होता. जागतिक मान्यता मिळावी म्हणून चीनने आॅलिम्पिकमध्ये यशस्वी होण्यासाठी आपली भिंत तोडण्याचेही काम केले.त्याच भावनेतून आॅस्ट्रेलियन चमूही क्रिकेट जगतातील महासत्ता आहे, हे दाखविण्यासाठी स्मिथच्या टीमने फसवणुकीचे कृत्य करून दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न केला.आॅस्ट्रेलिया हा मर्यादित इतिहास असलेला देश असून, भौगोलिक दृष्टीने तो एकटा पडला आहे. त्यामुळे खेळ हीच त्याची एकमेव राष्ट्रीय ओळख असून, त्यात आपले वर्चस्व टिकविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्या देशाला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नाही. पाश्चात्त्य राष्टÑातून आलेल्या स्थलांतरितातून त्याची निर्मिती झालेली आहे. जुन्या आदिवासींसोबत संघर्ष करीत तेथे स्थायिक झालेल्या गुन्हेगारांनी या राष्टÑाची उभारणी केली आहे. विसाव्या शतकातील सर्व श्रेष्ठ आॅस्ट्रेलियन कोण, याविषयी जेव्हा सार्वमत घेण्यात आले तेव्हा आॅस्ट्रेलियन क्रिकेटर डॉन ब्रॅडमनच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली. अन्य कोणत्याही राष्टÑात एखाद्या खेळाडूला असा सन्मान मिळाला नसता. पण हे राष्टÑ खेळासाठी ओळखले जाते. त्यामुळे खेळात विजय संपादन करणे याचीच त्यांना भूक असते!दुसरे असे की, व्यावसायिक खेळ हा व्यक्तिगत श्रेष्ठत्वासाठी असतोच तसेच बलिष्ठांनी टिकून राहण्यासाठी केलेला संघर्ष, असेही त्या खेळाचे स्वरूप असते. त्यातून प्रसिद्धी आणि पैसा दोहोंचाही लाभ होत असतो. या भावनेतून टेनिसची चॅम्पियन मारिया शारापोव्हा ही देखील मार्गभ्रष्ट झाली होती. क्रिकेट खेळात मॅच फिक्सिंगची प्रकरणे घडली तर बेन जॉन्सन हा उत्तेजक द्रव्य घेऊ लागला. खेळाची काळी बाजू सेलिब्रिटीमुळे मिळणाºया चकाकीखाली दबून राहत होती. आयपीएलच्या तमाशात खेळाडूंना रोबोटप्रमाणे कामगिरी दाखवावी लागते. पण या खेळाडूंभोवतीचे वलय दूर सारले की त्यांचे पायही मातीचेच असल्याचे दिसून येते. उच्चप्रतीच्या अ‍ॅथ्लिटस्ना असुरक्षिततेला तोंड द्यावे लागते.वास्तविक स्मिथ आणि या घटनेचा शिल्पकार डेव्हिड वॉर्नर यांना पैशाची आवश्यकता नव्हती. कारण ते श्रीमंत क्रिकेटपटू म्हणूनच ओळखले जातात. त्यांना प्रसिद्धीची आणि मान्यतेचीदेखील आवश्यकता नाही. धावा काढण्याच्या बाबतीत स्मिथची तुलना डॉन ब्रॅडमनशी करण्यात येत असते. पण त्यांच्याशी तुल्यबळ असलेल्या दक्षिण आफ्रिकेसोबत खेळताना दमछाक झाल्याने त्यांचा इगो दुखावला गेला होता. आत्यंतिक महत्त्वाकांक्षेने आॅस्ट्रेलियन नेतृत्वाला गिळंकृत केले आणि आपण केलेल्या कृत्यातून निसटून जाऊ हा फाजील आत्मविश्वास त्यांना नडला. पण आजच्या काळात डझनभर कॅमेरे तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात, याचा त्यांना विसर पडला. यश मिळविण्यासाठी धडपड करीत असताना आपण अजिंक्य आहोत, ही भावना वरचढ ठरली. त्यामुळे आपल्या खेळकौशल्यावर विसंबून राहण्याऐवजी नियमांचे उल्लंघन करून यशस्वी होण्याचा सोपा मार्ग त्यांनी पत्करला.त्यांच्या या कृत्याविरोधात आॅस्ट्रेलियन जनतेत संतापाची भावना उसळली. आपल्या हिरोंनी आपल्याला फसवले, असे लोकांना वाटू लागले. भारतात मॅच फिक्सिंग झाले तेव्हा भारतीयांमध्येही हीच भावना प्रबळ ठरली होती. आपल्या आदर्श पुरुषांनी नियमांचे उल्लंघन करणे कुणालाच आवडत नाही. खेळात स्वच्छता हवी अशी भावना घेऊनच लाखो लोक खेळ मैदानावर येत असतात. लोकांची स्वप्ने तेथे प्रत्यक्षात येणार असतात. जग हे सुखदायी आहे, हीच भावना खेळाच्या मैदानावर व्यक्त होत असते. पण तेच जग जर उलटेपालटे झाले तर लोकात संतापाची लाट उसळते आणि त्यातून खेळाडूंविषयीचा तिटकारा प्रकट होतो.तरीदेखील या कृत्याविषयी प्रकट झालेल्या काही प्रतिक्रिया अतिरेकी स्वरूपाच्या होत्या. निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करण्यास सिद्ध असलेले राजकारणी, आपल्या बॅलन्सशीटमध्ये फेरफार करणारे व्यापारी, परीक्षेत कॉपी करणारे विद्यार्थी, आपल्या व्यवसायात नैतिकतेचे पालन न करणारे वकील आणि डॉक्टर, बनावट बातम्या खपविणारे पत्रकार यांना या खेळाडूंवर दोषारोपण करण्याचा अधिकार कसा पोहचतो? की आपण खेळाडूंकडून नैतिकतेची आणि शुद्धतेचीच अपेक्षा करीत असतो? स्मिथ आणि त्याच्या टीममधील खेळाडूंनी क्रिकेट शौकिनांचा अपेक्षाभंग केला असला तरी समाजातील नैतिकता कशी हरवली आहे, याचा आरसाच त्यांनी समाजासमोर धरला आहे!जाता जाता : १९७० मध्ये भारताचा कर्णधार असलेल्या बिशनसिंग बेदीने चेंडूला व्हॅसलिन लावून चेंडू खराब करण्याचा आरोप इंग्लंडचा गोलंदाज जॉन लिव्हर यांचेवर केला तेव्हा इंग्लिश कौन्टीने बिशनसिंग बेदीची हकालपट्टी करताना ‘इंग्लिश खेळाडू कधीच बनवाबनवी करीत नाहीत’ असा खुलासा केला होता. पण ते सुद्धा बनवाबनवी करतात हे २०१८ साली दिसून आले आहे!

टॅग्स :Steven Smithस्टीव्हन स्मिथAustraliaआॅस्ट्रेलियाBall Tamperingचेंडूशी छेडछाड