शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

हेचि फल काय...?

By admin | Updated: February 11, 2016 03:52 IST

अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाले त्याला दोन दशकांहून अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आजतागायत सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाला, विविध तपासी यंत्रणांना

अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाले त्याला दोन दशकांहून अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आजतागायत सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाला, विविध तपासी यंत्रणांना वा न्यायसंस्थेला तो विध्वंस नेमका कोणी, कसा आणि कोणाच्या प्रेरणेने घडला वा घडवून आणला गेला याचा थांगपत्ता लागलेला नसताना ते कार्य लालकृष्ण अडवाणी यांनीच केले असे ठामपणे गृहीत धरुन त्यांच्यावर आता एक खासगी संस्था खटला दाखल करणार आहे. परंतु ही संस्था इस्लामशी संबंधित नसून चक्क हिन्दू महासभेनेच तो निर्णय जाहीर केला आहे. यादेखील अखिल भारतीयच असलेल्या संस्थेच्या मते बाबरी मशिदीचे जे घुमट उद्ध्वस्त करण्यात आले त्या घुमटांखाली ‘रामलल्ला’ची मूर्ती होती व मशीद आणि तिचे घुमट जमीनदेस्त करताना त्यात या मूर्तीचीदेखील हानी झाली. हे जारकर्म अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांनी ‘संगनमताने’ केले असा महासभेचा दावा आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांच्या मते मशिदीच्या घुमटाखालील भागास रामाचा आशीर्वाद होता आणि मुस्लीम बांधव जिथे नमाज अदा करीत असत तो भाग घुमटाखाली नव्हता. पण तरीही अडवाणी प्रभृतींनी घुमट उद्ध्वस्त करुन मोठे पापच केले आहे. अडवाणींसारखे ‘ढोंगी राष्ट्रभक्त’ देशातील मुस्लीम तसेच हिन्दूंचेही सारखेच शत्रू असल्याचा घरचा अहेरदेखील स्वामी चक्रपाणी यांनी अडवाणींना बहाल केला आहे. आता आपण आपल्या महासभेच्या माध्यमातून राममंदिराच्या उभारणीचा लढा सुरु करणार आहोत पण हा लढा मुस्लीम बांधवाना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही असे स्पष्ट करुन त्याच परिसरात मुस्लीम बांधवांसाठी स्वतंत्र मशीद आणि रामाचे मंदीर उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील असा इरादाही या स्वामींनी व्यक्त केला आहे. लालकृष्ण अडवाणी भाजपाचे अध्यक्ष असताना त्यांनी रथयात्रा काढून देशात एक उन्मादी वातावरण निर्माण केले होते. रथयात्रेची परिणती बाबरी मशिदीच्या पतनात झाली आणि त्यातूनच हिन्दुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपाला केन्द्रातील सत्तेची चव चाखता आली, हा इतिहास सर्वज्ञातच आहे. आता पुन्हा एकदा राममंदिराचा विषय भाजपाने केन्द्रस्थानी आणला असताना एका हिन्दुत्ववादी संघटनेने सुरुंग लावणे म्हणजे ‘हेचि काय फल मम तपाला’ अशीच स्थिती म्हणायची.