शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

हेचि फल काय...?

By admin | Updated: February 11, 2016 03:52 IST

अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाले त्याला दोन दशकांहून अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आजतागायत सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाला, विविध तपासी यंत्रणांना

अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाले त्याला दोन दशकांहून अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आजतागायत सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाला, विविध तपासी यंत्रणांना वा न्यायसंस्थेला तो विध्वंस नेमका कोणी, कसा आणि कोणाच्या प्रेरणेने घडला वा घडवून आणला गेला याचा थांगपत्ता लागलेला नसताना ते कार्य लालकृष्ण अडवाणी यांनीच केले असे ठामपणे गृहीत धरुन त्यांच्यावर आता एक खासगी संस्था खटला दाखल करणार आहे. परंतु ही संस्था इस्लामशी संबंधित नसून चक्क हिन्दू महासभेनेच तो निर्णय जाहीर केला आहे. यादेखील अखिल भारतीयच असलेल्या संस्थेच्या मते बाबरी मशिदीचे जे घुमट उद्ध्वस्त करण्यात आले त्या घुमटांखाली ‘रामलल्ला’ची मूर्ती होती व मशीद आणि तिचे घुमट जमीनदेस्त करताना त्यात या मूर्तीचीदेखील हानी झाली. हे जारकर्म अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांनी ‘संगनमताने’ केले असा महासभेचा दावा आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांच्या मते मशिदीच्या घुमटाखालील भागास रामाचा आशीर्वाद होता आणि मुस्लीम बांधव जिथे नमाज अदा करीत असत तो भाग घुमटाखाली नव्हता. पण तरीही अडवाणी प्रभृतींनी घुमट उद्ध्वस्त करुन मोठे पापच केले आहे. अडवाणींसारखे ‘ढोंगी राष्ट्रभक्त’ देशातील मुस्लीम तसेच हिन्दूंचेही सारखेच शत्रू असल्याचा घरचा अहेरदेखील स्वामी चक्रपाणी यांनी अडवाणींना बहाल केला आहे. आता आपण आपल्या महासभेच्या माध्यमातून राममंदिराच्या उभारणीचा लढा सुरु करणार आहोत पण हा लढा मुस्लीम बांधवाना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही असे स्पष्ट करुन त्याच परिसरात मुस्लीम बांधवांसाठी स्वतंत्र मशीद आणि रामाचे मंदीर उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील असा इरादाही या स्वामींनी व्यक्त केला आहे. लालकृष्ण अडवाणी भाजपाचे अध्यक्ष असताना त्यांनी रथयात्रा काढून देशात एक उन्मादी वातावरण निर्माण केले होते. रथयात्रेची परिणती बाबरी मशिदीच्या पतनात झाली आणि त्यातूनच हिन्दुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपाला केन्द्रातील सत्तेची चव चाखता आली, हा इतिहास सर्वज्ञातच आहे. आता पुन्हा एकदा राममंदिराचा विषय भाजपाने केन्द्रस्थानी आणला असताना एका हिन्दुत्ववादी संघटनेने सुरुंग लावणे म्हणजे ‘हेचि काय फल मम तपाला’ अशीच स्थिती म्हणायची.