शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तलाठ्याने असे काय ‘घोडे’ मारले?

By गजानन दिवाण | Updated: January 1, 2018 00:41 IST

अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे कसे होणार? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला स्वत:चा घोडा दिला, तर बिघडले कुठे? मुळात औरंगाबाद जिल्ह्यातील आंचलगावात हेही घडले नाही.

भारत हा आज दुचाकी-चारचाकींचा देश झाला आहे. कधी काळी तो अश्वराष्ट्र म्हणून ओळखला जायचा. प्रत्येकाच्या घरी घोडा असायचा. घरातील वाहक म्हणून त्याचाच वापर होत असे. घरात घोडा असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. पाटलांची पाटीलकी आणि जहागीरदारांची जहागिरी या घोड्यावरूनच चालत असे. एवढेच काय १९व्या शतकापर्यंत मुंबईतील प्रवासी वाहतूकही छकडा, टांगा आणि पालखीतूनच व्हायची. पुढे मुंबईचा पसारा वाढत गेला तशी घोड्यांची जागा टॅक्सीने आणि आपल्या घरातील जागा दुचाकी-चारचाकीने घेतली. एकूणच काय तर आम्हा माणसांना घोड्यांचा वापर नवा नाही. मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून अगदी प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांचा एवढा मोठा इतिहास आपल्या पाठीशी असताना औरंगाबाद जिल्ह्यातील आंचलगाव येथे तलाठी आणि कृषी सहायकाने घोड्यावर बसून कापसाचा पंचनामा केल्याचे वृत्त सर्वत्र चवीने चघळले गेले.राज्यात जवळपास ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस हे पीक आहे. मराठवाडा आणि विदर्भात बोंडअळीने सगळेच्या सगळे कापसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्राचे पंचनामे कसे करायचे यावरून तलाठ्यांच्या स्तरावर मोठा गोंधळ उडाला. पूर्वी तलाठी सज्जावरच पंचनामे झाल्याच्या नोंदी करण्याची पद्धत सर्रासपणे चालायची. आता त्यासाठीचे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठ्याला त्या शेतात जाणे अपरिहार्य झाले. पूर्वी खेडोपाडी शेतकरी तलाठ्याला गाठायचे. यंदा पहिल्यांदाच पंचनाम्यासाठी तलाठी बाहेर पडले. कधी नव्हे ते शेतीच्या बांधावर दिसले. अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. बºयाच ठिकाणी रस्ते नाहीत. आहेत त्या रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे होणार कसे? पंचनामे नाही झाले, तर नुकसान कोणाचे? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला पंचनामे करण्यासाठी स्वत:चा घोडा दिला, तर बिघडले कुठे?पूर्वी कार्यालयात बसून कागदीघोडे नाचवून पंचनामे केले जायचे. त्यामुळे काय व्हायचे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळात औरंगाबाद जिल्ह्यातील अंचलगावात हेही घडले नाही. ज्या शेतकºयाच्या शेतात हे पंचनामे झाले त्या शेतकºयाने अलीकडेच हा घोडा खरेदी केला होता. आपल्या घोड्यावर बसून ‘साहेब’ खूश झाले, तर पंचनाम्यात फायदाच होईल, हाही त्यामागचा स्वार्थ. पंचनाम्यासाठी आलेल्या दोन्ही साहेबांना या घोड्यावर बसविले. त्यांचे फोटो काढले. दुसºया दिवशीची सकाळ उजाडेपर्यंत दोघेही खूश. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल काय झाले आणि साहेबांची घोडेस्वारी मुंबईपर्यंत पोहोचली. शेतकºयाने आपला मोबाईल स्वीच आॅफ करून टाकला. इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिवसभर ब्रेकिंग लावून धरल्याने उपविभागीय अधिकाºयांनी नोटीस बजावली. तिकडे कृषिमंत्र्यांनीही चौकशी समिती नेमण्याची घोषणा करून बातम्यांमध्ये जागा मिळविली. नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांना हेलिकॉप्टर-विमान चालते, मग तलाठ्यांना घोडा का नाही... इथपासून ते शेतकºयांच्या जखमांवर अधिकाºयांनी घोड्यावर बसून मीठ चोळले... इथपर्यंत चर्चा झडल्या. प्रत्यक्ष वास्तव कोणीच समजून घेतले नाही. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार