शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘त्या’ तलाठ्याने असे काय ‘घोडे’ मारले?

By गजानन दिवाण | Updated: January 1, 2018 00:41 IST

अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे कसे होणार? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला स्वत:चा घोडा दिला, तर बिघडले कुठे? मुळात औरंगाबाद जिल्ह्यातील आंचलगावात हेही घडले नाही.

भारत हा आज दुचाकी-चारचाकींचा देश झाला आहे. कधी काळी तो अश्वराष्ट्र म्हणून ओळखला जायचा. प्रत्येकाच्या घरी घोडा असायचा. घरातील वाहक म्हणून त्याचाच वापर होत असे. घरात घोडा असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. पाटलांची पाटीलकी आणि जहागीरदारांची जहागिरी या घोड्यावरूनच चालत असे. एवढेच काय १९व्या शतकापर्यंत मुंबईतील प्रवासी वाहतूकही छकडा, टांगा आणि पालखीतूनच व्हायची. पुढे मुंबईचा पसारा वाढत गेला तशी घोड्यांची जागा टॅक्सीने आणि आपल्या घरातील जागा दुचाकी-चारचाकीने घेतली. एकूणच काय तर आम्हा माणसांना घोड्यांचा वापर नवा नाही. मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून अगदी प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांचा एवढा मोठा इतिहास आपल्या पाठीशी असताना औरंगाबाद जिल्ह्यातील आंचलगाव येथे तलाठी आणि कृषी सहायकाने घोड्यावर बसून कापसाचा पंचनामा केल्याचे वृत्त सर्वत्र चवीने चघळले गेले.राज्यात जवळपास ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस हे पीक आहे. मराठवाडा आणि विदर्भात बोंडअळीने सगळेच्या सगळे कापसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्राचे पंचनामे कसे करायचे यावरून तलाठ्यांच्या स्तरावर मोठा गोंधळ उडाला. पूर्वी तलाठी सज्जावरच पंचनामे झाल्याच्या नोंदी करण्याची पद्धत सर्रासपणे चालायची. आता त्यासाठीचे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठ्याला त्या शेतात जाणे अपरिहार्य झाले. पूर्वी खेडोपाडी शेतकरी तलाठ्याला गाठायचे. यंदा पहिल्यांदाच पंचनाम्यासाठी तलाठी बाहेर पडले. कधी नव्हे ते शेतीच्या बांधावर दिसले. अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. बºयाच ठिकाणी रस्ते नाहीत. आहेत त्या रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे होणार कसे? पंचनामे नाही झाले, तर नुकसान कोणाचे? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला पंचनामे करण्यासाठी स्वत:चा घोडा दिला, तर बिघडले कुठे?पूर्वी कार्यालयात बसून कागदीघोडे नाचवून पंचनामे केले जायचे. त्यामुळे काय व्हायचे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळात औरंगाबाद जिल्ह्यातील अंचलगावात हेही घडले नाही. ज्या शेतकºयाच्या शेतात हे पंचनामे झाले त्या शेतकºयाने अलीकडेच हा घोडा खरेदी केला होता. आपल्या घोड्यावर बसून ‘साहेब’ खूश झाले, तर पंचनाम्यात फायदाच होईल, हाही त्यामागचा स्वार्थ. पंचनाम्यासाठी आलेल्या दोन्ही साहेबांना या घोड्यावर बसविले. त्यांचे फोटो काढले. दुसºया दिवशीची सकाळ उजाडेपर्यंत दोघेही खूश. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल काय झाले आणि साहेबांची घोडेस्वारी मुंबईपर्यंत पोहोचली. शेतकºयाने आपला मोबाईल स्वीच आॅफ करून टाकला. इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिवसभर ब्रेकिंग लावून धरल्याने उपविभागीय अधिकाºयांनी नोटीस बजावली. तिकडे कृषिमंत्र्यांनीही चौकशी समिती नेमण्याची घोषणा करून बातम्यांमध्ये जागा मिळविली. नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांना हेलिकॉप्टर-विमान चालते, मग तलाठ्यांना घोडा का नाही... इथपासून ते शेतकºयांच्या जखमांवर अधिकाºयांनी घोड्यावर बसून मीठ चोळले... इथपर्यंत चर्चा झडल्या. प्रत्यक्ष वास्तव कोणीच समजून घेतले नाही. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार