शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

वैष्णवीचा गुन्हा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:38 IST

वर्धेत परवा कौटुंबिक वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले.

मानवी जीवन अत्यंत अस्थिर,अतर्क्य आणि क्षणभंगुर आहे. कुठल्या क्षणी कुणासोबत काय होईल, सांगता येत नाही. केव्हा फासा पलटेल आणि होत्याचे नव्हते होईल याचा नेम नसतो. नागपुरात गेल्या आठवड्यात घडलेल्या भीषण हत्याकांडातील आरोपी विवेक पालटकरची मुलगी वैष्णवी ही अवघ्या नऊ वर्षांची. चार वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी आईचा घात केला तेव्हा ती फक्त पाच वर्षांची होती. वडील जेलमध्ये. आपल्या लहानग्या भावासोबत मामाकडे राहात होती. कुठेतरी सुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. पण नियतीला हे मान्य नव्हते. कारागृहातून बाहेर आलेल्या बापाने मामाच्या संपूर्ण कुटुंबासह तिच्या भावाचाही बळी घेतला आणि वैष्णवी पुन्हा वाऱ्यावर आली. जीवाच्या भीतीपोटी आता कुणीही नातेवाईक तिचा सांभाळ करायला तयार नसल्याने तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. कदाचित यापुढे तिला अनाथालयात राहावे लागेल. या घटनेत बचावलेली दुसरी मुलगी मितालीचे आईवडील गेलेत. तिची जबाबदारी तिच्या आत्याने घेतली आहे. वर्धेत परवा कौटुंबिक वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले. समाजात अशा घटना आता वारंवार घडू लागल्या आहेत. त्यासुद्धा बरेचदा त्यांच्या मातापित्यांकडूनच. आत्मघात करताना आपल्या मुलांनाही संपविण्याच्या या प्रकाराने या निष्पाप मुलांचा जीवन जगण्याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला जातो, याचेही भान त्यांच्या पालकांना राहात नाही. मोठ्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा लहानांना भोगावी लागतेय. अनेक बालकांना त्यांचा काहीएक गुन्हा नसताना सुधारगृहात, अनाथालयात किंवा कारागृहात जीवन कंठावे लागते. भविष्याच्या कुठल्याही शाश्वतीशिवाय. अखेर ही मुले कुठल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताहेत? काहीही दोष नसताना त्यांच्याच वाट्याला असे आयुष्य का यावे? अशी परिस्थिती का निर्माण व्हावी? माध्यमांमध्ये या घटनेसंदर्भात बातम्या येतील तोवर लोक चर्चा करतील. लहान मुलांबद्दल हळहळतीलही. अन् कालांतराने त्यांना या घटनांचा विसर पडेल. पण या मुलांचे काय? त्यांचे तर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते. वैष्णवी असो मिताली वा यांच्यासारखी इतर दुर्दैवी मुले. त्यांचा विचार करीत असताना सहजच मनात संत ज्ञानेश्वरांची आठवण येते. निष्ठूर समाजाने त्यांच्या आईवडिलांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. पण त्यानंतर या दुष्ट समाजाचे समाधान झाले नाही. ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांना जगणे अक्षरश: कठीण करून टाकण्यात आले. त्यांना कायम अवमान, अवहेलना आणि उपेक्षा सहन करावी लागली होती. आज तरी परिस्थितीत काय बदल झालाय? वडिलांनी केलेल्या कृत्याची फळे निर्दोष वैष्णवीलाच भोगावी लागतील!

टॅग्स :Molestationविनयभंग