शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवीचा गुन्हा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:38 IST

वर्धेत परवा कौटुंबिक वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले.

मानवी जीवन अत्यंत अस्थिर,अतर्क्य आणि क्षणभंगुर आहे. कुठल्या क्षणी कुणासोबत काय होईल, सांगता येत नाही. केव्हा फासा पलटेल आणि होत्याचे नव्हते होईल याचा नेम नसतो. नागपुरात गेल्या आठवड्यात घडलेल्या भीषण हत्याकांडातील आरोपी विवेक पालटकरची मुलगी वैष्णवी ही अवघ्या नऊ वर्षांची. चार वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी आईचा घात केला तेव्हा ती फक्त पाच वर्षांची होती. वडील जेलमध्ये. आपल्या लहानग्या भावासोबत मामाकडे राहात होती. कुठेतरी सुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. पण नियतीला हे मान्य नव्हते. कारागृहातून बाहेर आलेल्या बापाने मामाच्या संपूर्ण कुटुंबासह तिच्या भावाचाही बळी घेतला आणि वैष्णवी पुन्हा वाऱ्यावर आली. जीवाच्या भीतीपोटी आता कुणीही नातेवाईक तिचा सांभाळ करायला तयार नसल्याने तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. कदाचित यापुढे तिला अनाथालयात राहावे लागेल. या घटनेत बचावलेली दुसरी मुलगी मितालीचे आईवडील गेलेत. तिची जबाबदारी तिच्या आत्याने घेतली आहे. वर्धेत परवा कौटुंबिक वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले. समाजात अशा घटना आता वारंवार घडू लागल्या आहेत. त्यासुद्धा बरेचदा त्यांच्या मातापित्यांकडूनच. आत्मघात करताना आपल्या मुलांनाही संपविण्याच्या या प्रकाराने या निष्पाप मुलांचा जीवन जगण्याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला जातो, याचेही भान त्यांच्या पालकांना राहात नाही. मोठ्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा लहानांना भोगावी लागतेय. अनेक बालकांना त्यांचा काहीएक गुन्हा नसताना सुधारगृहात, अनाथालयात किंवा कारागृहात जीवन कंठावे लागते. भविष्याच्या कुठल्याही शाश्वतीशिवाय. अखेर ही मुले कुठल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताहेत? काहीही दोष नसताना त्यांच्याच वाट्याला असे आयुष्य का यावे? अशी परिस्थिती का निर्माण व्हावी? माध्यमांमध्ये या घटनेसंदर्भात बातम्या येतील तोवर लोक चर्चा करतील. लहान मुलांबद्दल हळहळतीलही. अन् कालांतराने त्यांना या घटनांचा विसर पडेल. पण या मुलांचे काय? त्यांचे तर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते. वैष्णवी असो मिताली वा यांच्यासारखी इतर दुर्दैवी मुले. त्यांचा विचार करीत असताना सहजच मनात संत ज्ञानेश्वरांची आठवण येते. निष्ठूर समाजाने त्यांच्या आईवडिलांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. पण त्यानंतर या दुष्ट समाजाचे समाधान झाले नाही. ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांना जगणे अक्षरश: कठीण करून टाकण्यात आले. त्यांना कायम अवमान, अवहेलना आणि उपेक्षा सहन करावी लागली होती. आज तरी परिस्थितीत काय बदल झालाय? वडिलांनी केलेल्या कृत्याची फळे निर्दोष वैष्णवीलाच भोगावी लागतील!

टॅग्स :Molestationविनयभंग