शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवीचा गुन्हा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:38 IST

वर्धेत परवा कौटुंबिक वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले.

मानवी जीवन अत्यंत अस्थिर,अतर्क्य आणि क्षणभंगुर आहे. कुठल्या क्षणी कुणासोबत काय होईल, सांगता येत नाही. केव्हा फासा पलटेल आणि होत्याचे नव्हते होईल याचा नेम नसतो. नागपुरात गेल्या आठवड्यात घडलेल्या भीषण हत्याकांडातील आरोपी विवेक पालटकरची मुलगी वैष्णवी ही अवघ्या नऊ वर्षांची. चार वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी आईचा घात केला तेव्हा ती फक्त पाच वर्षांची होती. वडील जेलमध्ये. आपल्या लहानग्या भावासोबत मामाकडे राहात होती. कुठेतरी सुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. पण नियतीला हे मान्य नव्हते. कारागृहातून बाहेर आलेल्या बापाने मामाच्या संपूर्ण कुटुंबासह तिच्या भावाचाही बळी घेतला आणि वैष्णवी पुन्हा वाऱ्यावर आली. जीवाच्या भीतीपोटी आता कुणीही नातेवाईक तिचा सांभाळ करायला तयार नसल्याने तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. कदाचित यापुढे तिला अनाथालयात राहावे लागेल. या घटनेत बचावलेली दुसरी मुलगी मितालीचे आईवडील गेलेत. तिची जबाबदारी तिच्या आत्याने घेतली आहे. वर्धेत परवा कौटुंबिक वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले. समाजात अशा घटना आता वारंवार घडू लागल्या आहेत. त्यासुद्धा बरेचदा त्यांच्या मातापित्यांकडूनच. आत्मघात करताना आपल्या मुलांनाही संपविण्याच्या या प्रकाराने या निष्पाप मुलांचा जीवन जगण्याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला जातो, याचेही भान त्यांच्या पालकांना राहात नाही. मोठ्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा लहानांना भोगावी लागतेय. अनेक बालकांना त्यांचा काहीएक गुन्हा नसताना सुधारगृहात, अनाथालयात किंवा कारागृहात जीवन कंठावे लागते. भविष्याच्या कुठल्याही शाश्वतीशिवाय. अखेर ही मुले कुठल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताहेत? काहीही दोष नसताना त्यांच्याच वाट्याला असे आयुष्य का यावे? अशी परिस्थिती का निर्माण व्हावी? माध्यमांमध्ये या घटनेसंदर्भात बातम्या येतील तोवर लोक चर्चा करतील. लहान मुलांबद्दल हळहळतीलही. अन् कालांतराने त्यांना या घटनांचा विसर पडेल. पण या मुलांचे काय? त्यांचे तर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते. वैष्णवी असो मिताली वा यांच्यासारखी इतर दुर्दैवी मुले. त्यांचा विचार करीत असताना सहजच मनात संत ज्ञानेश्वरांची आठवण येते. निष्ठूर समाजाने त्यांच्या आईवडिलांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. पण त्यानंतर या दुष्ट समाजाचे समाधान झाले नाही. ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांना जगणे अक्षरश: कठीण करून टाकण्यात आले. त्यांना कायम अवमान, अवहेलना आणि उपेक्षा सहन करावी लागली होती. आज तरी परिस्थितीत काय बदल झालाय? वडिलांनी केलेल्या कृत्याची फळे निर्दोष वैष्णवीलाच भोगावी लागतील!

टॅग्स :Molestationविनयभंग