शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूंच्या ‘मित्रांचे’ काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:20 IST

हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील १४ भोंदू बाबांच्या नावांची यादी तयार केली आहे. आता या १४ महाठगांची ही यादी राज्य सरकारे आणि केंद्राकडे सोपवून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी आखाडा परिषद करणार आहे. हे उशिराने सुचलेले शहाणपण म्हटले तरी या निमित्ताने एक चांगली सुरुवात झाली असे त्याचे वर्णन करता येईल.

हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील १४ भोंदू बाबांच्या नावांची यादी तयार केली आहे. आता या १४ महाठगांची ही यादी राज्य सरकारे आणि केंद्राकडे सोपवून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी आखाडा परिषद करणार आहे. हे उशिराने सुचलेले शहाणपण म्हटले तरी या निमित्ताने एक चांगली सुरुवात झाली असे त्याचे वर्णन करता येईल. मात्र आखाडा परिषदेला संपूर्ण देशातून अवघी १४ नावेच सापडावी याबद्दल आश्चर्य वाटते. आज दगड उचलाल तेथे भोंदू साधू सापडतो, अशी स्थिती असताना केवळ १४ जणांवर कारवाई करून परिस्थिती सुधारणार आहे का? आज शहरी भागांच्या तुलनेत देशाच्या ग्रामीण भागात अज्ञान, निरक्षरता आणि अंधश्रद्धा यांचा मोठा पगडा आहे आणि त्याचा फायदा उचलण्यासाठी गावोगावी असे भोंदू बाबा तयार होत असतात. त्यांची यादी कोण तयार करणार? केवळ एक दोन सामाजिक संस्था पुढे आल्याने या भोंदू बाबांचे अमाप पीक उद्ध्वस्त केले जाऊ शकत नाही. प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा नसते कारण असे बाबा आधीच राजकीय कवच प्राप्त करून घेत असतात. राजकीय पक्षांचे अशा भोंदूंना पाठबळ असते. राम रहीमविरुद्धची बलात्काराची तक्रार १५ वर्षे धूळ खात पडून होती. या नराधमाचे वाढते अत्याचार, दिवसागणिक वाढत जाणारा त्याच्या संपत्तीचा डोंगर हा काय सरकारला वा प्रशासनाला दिसत नव्हता! पण पोलीस, मोठे अधिकारी एवढेच काय मंत्री, मुख्यमंत्रीसुद्धा अशा बाबांच्या नादी लागत असतील आणि त्यांच्या दरबारात हजेरी लावून लोटांगण घालत असतील तर या भोंदूंवर कारवाईची अपेक्षा तरी करता येईल का? अशिक्षित, अंधश्रद्ध गरीब जनता अशा भोंदूच्या जाळ्यात अडकते हे समजू शकते. पण उच्चशिक्षित अधिकारी, राजकीय नेते अशा बाबांच्या मागेपुढे करतात तेव्हा तो अंधश्रद्धेचा भाग मानता येणार नाही. यामागे या लोकांचा निश्चितच स्वार्थ असतो. हे बाबा आपल्या भक्तांची पिळवणूक करून गडगंज संपत्ती जमवितात. त्यातला काही भाग प्रशासनातील अनेक अधिकाºयांच्या खिशात जातो ही लपून राहिलेली बाब नाही. राजकीय नेत्यांनाही निवडणुकीच्या काळात अशा बाबांचे ‘आशीर्वाद’ हवेच असतात. तेव्हा केवळ अशा बाबांना गजाआड करून भागणार नाही तर त्यांना पोसणाºया, पाठबळ देणाºया व त्यांच्या दुष्कृत्याकडे डोळेझाक करणाºया या मंडळींनाही तुरुंगाची वाट दाखविली पाहिजे. सरकार वा राजकीय पक्षांकडून हे होणे नाही, न्यायालयानेच ही वेसण घातली पाहिजे.

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमIndiaभारत