शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

भोंदूंच्या ‘मित्रांचे’ काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:20 IST

हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील १४ भोंदू बाबांच्या नावांची यादी तयार केली आहे. आता या १४ महाठगांची ही यादी राज्य सरकारे आणि केंद्राकडे सोपवून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी आखाडा परिषद करणार आहे. हे उशिराने सुचलेले शहाणपण म्हटले तरी या निमित्ताने एक चांगली सुरुवात झाली असे त्याचे वर्णन करता येईल.

हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील १४ भोंदू बाबांच्या नावांची यादी तयार केली आहे. आता या १४ महाठगांची ही यादी राज्य सरकारे आणि केंद्राकडे सोपवून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी आखाडा परिषद करणार आहे. हे उशिराने सुचलेले शहाणपण म्हटले तरी या निमित्ताने एक चांगली सुरुवात झाली असे त्याचे वर्णन करता येईल. मात्र आखाडा परिषदेला संपूर्ण देशातून अवघी १४ नावेच सापडावी याबद्दल आश्चर्य वाटते. आज दगड उचलाल तेथे भोंदू साधू सापडतो, अशी स्थिती असताना केवळ १४ जणांवर कारवाई करून परिस्थिती सुधारणार आहे का? आज शहरी भागांच्या तुलनेत देशाच्या ग्रामीण भागात अज्ञान, निरक्षरता आणि अंधश्रद्धा यांचा मोठा पगडा आहे आणि त्याचा फायदा उचलण्यासाठी गावोगावी असे भोंदू बाबा तयार होत असतात. त्यांची यादी कोण तयार करणार? केवळ एक दोन सामाजिक संस्था पुढे आल्याने या भोंदू बाबांचे अमाप पीक उद्ध्वस्त केले जाऊ शकत नाही. प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा नसते कारण असे बाबा आधीच राजकीय कवच प्राप्त करून घेत असतात. राजकीय पक्षांचे अशा भोंदूंना पाठबळ असते. राम रहीमविरुद्धची बलात्काराची तक्रार १५ वर्षे धूळ खात पडून होती. या नराधमाचे वाढते अत्याचार, दिवसागणिक वाढत जाणारा त्याच्या संपत्तीचा डोंगर हा काय सरकारला वा प्रशासनाला दिसत नव्हता! पण पोलीस, मोठे अधिकारी एवढेच काय मंत्री, मुख्यमंत्रीसुद्धा अशा बाबांच्या नादी लागत असतील आणि त्यांच्या दरबारात हजेरी लावून लोटांगण घालत असतील तर या भोंदूंवर कारवाईची अपेक्षा तरी करता येईल का? अशिक्षित, अंधश्रद्ध गरीब जनता अशा भोंदूच्या जाळ्यात अडकते हे समजू शकते. पण उच्चशिक्षित अधिकारी, राजकीय नेते अशा बाबांच्या मागेपुढे करतात तेव्हा तो अंधश्रद्धेचा भाग मानता येणार नाही. यामागे या लोकांचा निश्चितच स्वार्थ असतो. हे बाबा आपल्या भक्तांची पिळवणूक करून गडगंज संपत्ती जमवितात. त्यातला काही भाग प्रशासनातील अनेक अधिकाºयांच्या खिशात जातो ही लपून राहिलेली बाब नाही. राजकीय नेत्यांनाही निवडणुकीच्या काळात अशा बाबांचे ‘आशीर्वाद’ हवेच असतात. तेव्हा केवळ अशा बाबांना गजाआड करून भागणार नाही तर त्यांना पोसणाºया, पाठबळ देणाºया व त्यांच्या दुष्कृत्याकडे डोळेझाक करणाºया या मंडळींनाही तुरुंगाची वाट दाखविली पाहिजे. सरकार वा राजकीय पक्षांकडून हे होणे नाही, न्यायालयानेच ही वेसण घातली पाहिजे.

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमIndiaभारत