शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

आपुले मरण पाहिले...

By संदीप प्रधान | Updated: March 9, 2018 00:11 IST

मुंबईतील एका बड्या कॉफी शॉपचा मॅनेजर मुख्य प्रवेशद्वार बंद करून बाहेर पडल्यावर काही लोकोत्तर पुरुषांचे पुतळे त्या कॉफी शॉपमध्ये प्रकट झाले...

मुंबईतील एका बड्या कॉफी शॉपचा मॅनेजर मुख्य प्रवेशद्वार बंद करून बाहेर पडल्यावर काही लोकोत्तर पुरुषांचे पुतळे त्या कॉफी शॉपमध्ये प्रकट झाले...लोकमान्य : मिस्टर लेनीन, आपल्याला फार वेदना होतायत का? गो-या रँडने पुण्यात प्लेगची लागण झाल्यावर केले नसतील तेवढे अत्याचार झाल्येत तुमच्यावर (हातातील गीतारहस्य ग्रंथ टेबलवर ठेवतात)लेनीन : लोकशाहीत निवडणुकीत माझ्या विचारधारेचा पक्ष पराभूत केल्यानंतर मला वेगळी शिक्षा देण्याची गरज नव्हती. असो.नेहरू : माझं दु:ख कुणाला सांगू? देशातील सेक्युलर विचारधारेकरिता मी कायम संघर्ष केला. मात्र, गेल्या काही दिवसांत मलाच भारताच्या फाळणीकरिता जबाबदार धरले गेले. मी मुस्लिमधार्जिणा असल्याची, सरदार पटेल यांच्या पंतप्रधानपदामधील अडसर ठरल्याची विनाकारण झोड उठवली गेली. आपण थोडीथोडी कॉफी घेऊ या का? बापू तुम्ही घ्याल का कॉफी?गांधी : (चरख्यावर सूतकताई करीत असताना) माझे उपोषण सुरू आहे. देशातील बँकांमधील पैसा हडप करून विदेशात पळालेल्या नीरव मोदी, विजय मल्ल्या वगैरेंना पश्चात्ताप होऊन ते पुन्हा तो पैसा परत करीत नाहीत, तोपर्यंत माझा सत्याग्रह सुरू राहणार.डॉ. आंबेडकर : या देशाला स्थिर सरकार प्राप्त व्हावे, या हेतूने एक सक्षम संविधान तयार करण्याकरिता मी आणि संविधान समितीने अपार कष्ट घेतले. मात्र, काही मूठभर मंडळींनी सध्या मला आरक्षणावरून आरोपीच्या पिंजºयात उभं केलंय. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा आग्रह धरून समाजातील मागासवर्गीयांसमोरील ताट खेचून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय.लोकमान्य : मी तेल्यातांबोळ्यांचा नेता होतो. मात्र, माझी पगडी, शेंडी यामुळं आता मी केवळ साडेतीन टक्क्यांचा ‘लोकमान्य’ असल्याचे ठसवण्याची धडपड सुरू आहे.गांधी : लोकमान्य तुम्ही निदान कुणाचे तरी आहात. माझं दु:ख काय सांगू? मी या देशातील साºयांचा बापू होतो. मात्र, अलीकडे मी केवळ गुजरातचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर झालोय. विदेशातून येणारा प्रत्येकजण गुजरातला येतो आणि मला भेटतो. गेली दोन वर्षे हा चरखासुद्घा माझ्याकडं राहिलेला नाही. कुुणी भलताच इसम त्यावर बसून सूतकताई करत असल्याचे फोटो मी पाहिले आणि मला धक्काच बसलाय.छत्रपती शिवाजी : आपणा साºयांची कैफियत आम्ही कान देऊन ऐकली. आम्ही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये बारा बलुतेदारांची साथ आम्हाला लाभली. कुणी रणांगणावर आमच्या खाद्याला खांदा लावून लढला, तर कुणी युद्धनीती रचली, तर कुणी दफ्तर सांभाळले. ते कोण कुठल्या जातीपातीचे होते ते आम्ही पाहिले नाही. मात्र, सध्या आम्हालाही विशिष्ट जातीचा बिल्ला लावला जात आहे. अफसोस त्याचाच वाटतो.लोकमान्य : आपल्या साºयांची चूक इतकीच आहे की, आपण या देशाकरिता, राज्याकरिता, लोकांकरिता झगडलो. त्या त्या वेळी योग्य वाटल्या, त्या त्या भूमिका घेतल्या. त्यामुळे लोकांनी आपल्याला या पुतळ्यांत चिणून टाकले आहे, आपल्या विचारांची खुलेआम कत्तल पाहण्याकरिता... तेवढ्यात, कॉफी शॉपच्या दरवाजाचे कुलूप उघडले आणि पुतळे अंतर्धान पावले... 

टॅग्स :statue Vandalismपुतळ्यांची विटंबनाIndiaभारत