शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आमचं ठरलंय... अहो पणऽऽ कुणा-कुणाबरोबर ?

By सचिन जवळकोटे | Updated: June 30, 2019 09:14 IST

लगाव बत्ती

 

सचिन जवळकोटे

‘निष्ठा म्हंजी काय रं भौऽऽ ?? असा भावनिक प्रश्न म्हणे आजकाल बरेच कार्यकर्ते एकमेकांना विचारू लागलेत; परंतु याचं परफेक्ट उत्तर कुणालाच न सापडलेलं. अधिक माहितीसाठी आम्ही पामरांनी दुधनीच्या ‘सिद्धूअण्णां’शी संवाद साधला. मात्र, ते ‘मातोश्री ते वर्षा’ बंगल्याच्या रस्त्यावरच हेलपाटे मारण्यात गर्क राहिलेले. बार्शीचे ‘दिलीपराव’ही भगव्या झेंड्याचा बागुलबुवा करत ‘राजाभौं’ना वाकुल्या दाखवत राहिलेले. ‘निष्ठा जपण्याचा मक्ता काय फक्त आपण एकट्यानंच घेतलाय की काय ?’ असं ‘संजयमामां’ना विचारत माढ्याचे ‘बबनदादा’ही ‘खोबरं तिकडं चांगभलंऽऽ’चा नारा देण्याच्या मूडमध्ये रमलेले. सांगोल्याचे ‘दीपकआबा’ही ‘कर्जबाजारी माजी आमदार’ हा शिक्का पुसून ‘लाटेतला लोकप्रिय आमदार’ बनण्यासाठी उत्सुक बनलेले. या सा-यांनी म्हणे खासगीत आपल्या कार्यकर्त्यांना ‘आमचं ठरलंयऽऽ’ असं सांगण्यास सुरुवात केलीय; परंतु ‘नेमकं कुणाबरोबर ठरलंय?’ याचा शोध घेता-घेता प्रामाणिक कार्यकर्त्यांना मात्र नाकीनऊ आलंय.

 ‘सिद्धूअण्णां’च्या गळ्यात भगवं उपरणं 

  ‘हातातलं घड्याळ’ सोडून ‘कमळा’ची पूजा करायला अनेक जण उत्सुक खरे; मात्र मध्येच ‘मातोश्री’कारांच्या ‘ठाकरी’ भाषेमुळं ब-याच जणांची धोरणं एका रात्रीत बदलू लागलीत... कारण ‘युती’ टिकली तरच सत्तेतल्या पार्टीत जाण्यात या मंडळींना अधिक स्वारस्य. त्या दृष्टीनं अनेकांनी ‘देवेंद्रपंतां’कडे आपली ‘फिल्डिंग’ लावलेली. मात्र, लोकसभा निकालानंतर ‘कमळा’चा ‘टीआरपी’ भलताच वाढल्यानं ‘पंतां’नी साºयांनाच ‘वेटिंग’वर  ठेवलेले. त्यांचा मोबाईल सतत ‘एन्गेज’ लागू लागलेला.हे पाहून दुधनीचे ‘सिद्धूअण्णा’ थेट ‘मातोश्री’वर जाऊन धडकले. बराच वेळ गुफ्तगू झालं. ‘अण्णां’साठी ‘बाणा’चा नेम अक्कलकोटमध्ये लावण्यास ‘उद्धो’ही तयार झाले; भगवं उपरणं आपल्या गळ्यात कसं दिसतं, याचा डेमोही ‘अण्णां’नी आमदार निवासातल्या आरशासमोर घेतला. मात्र, याच काळात ‘सीएम’ पदावरून ‘युती’त पुन्हा शेरेबाजी सुरू झाली. ‘उद्धों’च्या तिखट जिभेनं ‘पंतांची मंडळी’ पुन्हा एकदा घायाळ झाली. सावध झाली. निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी ‘मातोश्री’कारांनी कलटी मारली तर सर्वच्या सर्व जागांवर आपली हुकुमी माणसं उभारली पाहिजेत, असा फतवा वरून निघाला. मग काय...‘देवेंद्रपंतां’चा मोबाईल क्षणार्धात सगळ्यांसाठी खणखणू लागला. इतके दिवस ‘वेटिंग’ राहिलेल्या ‘सिद्धूअण्णां’नाही तत्काळ घेऊन येण्याचा मेसेज सोलापूरच्या ‘विजूमालकां’ना गेला. मार्केट यार्डातल्या चेअरमनपदाच्या गुबगुबीत खुर्चीत मस्तपैकी रेललेले-रुळलेले ‘मालक’ही लगेच ‘अण्णां’ना घेऊन मुंबईत गेले. ‘पंतां’ची भेट घालून दिली. चर्चा झाली. निर्णय फायनल झाला. त्यांचं ठरलं... मात्र इकडं ‘मातोश्री’वरची मंडळी अजूनही याच भ्रमात की ‘अण्णांशी आमचं ठरलंयऽऽ’ लगाव बत्ती...

राजाभौंची चाळ गप्पच !

  पुण्यातल्या पार्टी मिटिंगकडे पाठ फिरविणा-या ‘दिलीपरावां’चे नातू ‘आर्यन’ आजकाल सोशल मीडियावर रोज भगवा फडकवू पाहताहेत. केवळ ‘समोरच्याचं टेन्शन वाढावं’ या हेतूसाठी आपल्या आजोबाची विश्वासार्हताच पणाला लावण्याइतपत हा लाडका नातू नसावा नक्कीच भोळा. मात्र, आजोबांना भगव्याचंही सोवळं नाही, हा भाग वेगळा. सात तारखेला ‘शिवबंधन’ बांधण्यासाठी म्हणे आजोबा-नातवाचे हात सळसळू लागलेत. अगागाऽऽ ‘असं झालं तर पंतांचा आदेश मानून आख्खी रौत चाळ काय आगळगाव रोडवर प्रचारात मदतीला जाणार की काय?’ असा गहन प्रश्न पडू लागलाय बार्शीकरांना. आता रौतांच्या राजाभौंनाच माहीत, त्यांचं नेमकं काय ठरलंय.. तोपर्यंत लगाव बत्ती !

नोटा नाहीतर नाही किमान कमळाच्या पाकळ्या मोजू..

  सांगोल्याच्या ‘दीपकआबां’नी आजपावेतो राजकारणात लयऽऽ खस्ता खाल्ल्या. कर्ज काढून-काढून निवडणुका लढविल्या. जिल्हाध्यक्षपदाची खुर्ची मिळाल्यानंतर खिशातलेच पैसे घालून पार्टी आॅफिस सजवलं. मात्र, या फुकटच्या मिरवामिरवीचा कार्यकर्त्यांनाही आलाय कंटाळा. ‘नोटा नाहीतर नाही किमान कमळाच्या पाकळ्या मोजता आल्या तरी चालतंय,’ असं काही जणांना वाटू लागलंय. बघू या कडलासचे शिवाजीराव त्यांच्यासाठी काही करतात का ते.. अन्यथा घड्याळाचं आॅफिस होईल पुरतं ‘वंचित’... पण या नव्या समीकरणांवर ‘शहाजीबापू’ कशी करतील मात ? कारण त्यांचं कमळासोबत काय ठरलंय, हे कुणालाच नाही ठाऊक. तोपर्यंत लगाव बत्ती !

नाना तिकडं पंतांकडं.. मग इकडं पंत कुणाकडं ?

  लोकसभेला सुशीलकुमारांसाठी पंढरीच्या भारतनानांनी खूप प्रयत्न केले; पण ‘नानां’चा शब्द बºयाच ठिकाणी फेल गेला. तेव्हा त्यांनी आता आपला शब्द म्हणे थेट ‘देवेंद्रपंतां’कडे टाकला. कधी ‘राधाकृष्ण नगरकरां’च्या माध्यमातून, तर कधी ‘सुभाषबापूं’च्या माध्यमातून त्यांची तिकडं ‘पंतां’शी सलगी वाढतच चाललीय. यामुळं इकडं ‘वाड्यावरची पंत मंडळी’ अस्वस्थ बनत चाललीत. ‘आमचं अगोदरच ठरलेलं असताना आता पुन्हा नाना कशाला?’ अशी कुजबुज त्यांच्यात सुरू झालीय. मात्र, ‘मातोश्री’कारांकडं बघत ‘देवेंद्रपंत’ भेटलेल्या प्रत्येकासोबत ‘आमचं ठरलंयऽऽ’ म्हणू लागलेत. त्याला आता काय म्हणावं ? लगाव बत्ती...

दक्षिण’ची स्वारी ‘मध्य’ साधणार !

 बार्शीच्या ‘दिलीपरावां’ची ही कथा तर ‘दक्षिण’च्या ‘दिलीप मालकां’ची  वेगळीच तºहा. लोकसभा निवडणुकीपासून त्यांचा पक्षातल्या नेत्यांइतकाच बाकीच्या सहकाºयांशीही दुरावा वाढत गेलेला. पक्षातली दुफळी-लाथाळीही वाढत चाललेली. थोडक्यात सांगायचं म्हणजे ‘दिलीप मालकां’नाही ‘हाताची अ‍ॅलर्जी’ झालेली. मात्र, ‘सुभाषबापूं’मुळं त्यांना ‘कमळ’ ठरतंय दुर्लभ. त्यामुळं ‘धनुष्यबाणा’चा नेम ‘दक्षिण’ऐवजी ‘शहर मध्य’वर लावता येईल का, याची चाचपणी सुरू.. कारण ‘महेशअण्णा’ कधी अन् कोठे कमळाचा सुगंध घेतील, याची म्हणे नाही गॅरंटी. त्यामुळं शेवटच्या क्षणी ‘युती’ तुटली तर ‘दिलीप मालकां’चं ‘मध्य’ तिकीट फिक्सच... असं गणित म्हणे ‘दिलीपमालकां’च्या गोटात ठरलंय, परंतु ‘युती’त सध्यातरी ‘शंभर टक्के आमचं ठरलंय’ची चर्चा... तेव्हा अशा कैक नेत्यांचं निवडणुकीच्या तोंडावर नेमकं काय ठरलंय, हे जाणून घेण्यासाठी आहेच लगाव बत्ती... कारण ही सारी गुपितं बाहेर काढण्याचं ‘आमचंही ठरलंय !’

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस