शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आपण वितळणाऱ्या बर्फाच्या पातळ चादरीवर उभे आहोत, आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 05:39 IST

जागतिक तापमानवाढीमुळे भारत हा असुरक्षित हॉटस्पॉट्सपैकी एक ठरला आहे. आपल्या देशातला निसर्ग, पीकपाणी, आजार यावर नेमके काय परिणाम होतील?

जागतिक तापमानवाढीमुळे भारत हा असुरक्षित हॉटस्पॉट्सपैकी एक ठरला आहे. आपल्या देशातला निसर्ग, पीकपाणी, आजार यावर नेमके काय परिणाम होतील?

२० मार्च २०२३ रोजी इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा (IPCC) सहावा मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात जागतिक तापमान वाढीमुळे भारत हा असुरक्षित हॉटस्पॉट्सपैकी एक असल्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याला प्रतिसाद देत भारताने हरितगृह वायू उत्सर्जन (GHG) कमी करण्यासाठी उपाययोजना करून अनुकूलन क्षमता वाढवल्या पाहिजेत.

या अहवालात गंभीर इशारा दिला आहे की, हरितगृह वायू उत्सर्जनामुळे नजीकच्या काळात जागतिक तापमानात वाढ होईल आणि २०३० आणि २०३५ दरम्यान १.५°C पर्यंत तापमान वाढ पोहोचण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत जग १.५ अंश सेल्सिअसनी ग्लोबल वॉर्मिंग मर्यादा ओलांडण्याच्या मार्गावर असून, परिसंस्थेचे अपरिवर्तनीय नुकसान होईल आणि मानवासह इतर सजीवांवर गंभीर परिणाम होतील. जागतिक लोकसंख्येपैकी ४५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक संवेदनशील असलेल्या भागात राहत असून, निरक्षर, आर्थिक आणि उपेक्षित जनता हवामान बदलांना  बळी पडणार आहे. अहवालाच्या प्रकाशनाच्या वेळी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले, “मानवजात ही जणू बर्फाच्या पातळ चादरीवर उभी असून,  ही चादर अत्यंत गतीने  वितळत आहे.'' 

भारताच्या संदर्भात अहवालातील निष्कर्ष  म्हणतो, की भारत हा असुरक्षित हॉटस्पॉट्सपैकी एक आहे, ग्लोबल वॉर्मिंगचे  घातक परिणाम होऊन भारतात उष्णतेच्या लाटा, हिमनद्या वितळणे सुरू होईल. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, मान्सूनवर परिणाम होईल व वार्षिक सरासरी पर्जन्यमानात वाढ होईल. पुरामुळे पायाभूत सुविधा कमकुवत / नष्ट होतील.

भारतातील अनेक प्रदेश आणि महत्त्वाची शहरे पुराचा सामना करतील. उदा. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पुराचे प्रमाण तसेच तीव्रतेत वाढ होईल, तर अहमदाबादला उष्णतेच्या लाटांचा गंभीर धोका आहे. मुंबईला समुद्राची पातळी वाढण्याचा आणि पुराचा धोका जास्त आहे. चेन्नई, भुवनेश्वर, पाटणा आणि लखनौसह अनेक शहरे उष्णता आणि आर्द्रतेच्या धोकादायक पातळीच्या जवळ जात आहेत. समुद्राच्या पाण्याची पातळी  वाढल्यामुळे अंदाजे ३५ दशलक्ष लोक पुराचा सामना करतील. उत्सर्जन वाढत गेले तर शतकाच्या अखेरीस ४०-५० दशलक्ष लोकांना  पुराचा धोका पोहोचेल.  

हवामानातील बदलामुळे  आरोग्यावर परिणाम होईल.  आजारात आजच्या तुलनेत ३३ टक्के वाढ झालेली असेल. भूजल उपलब्धता कमी होऊन पिकांचा नाश होईल. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर आणि उपजीविकेवर परिणाम होईल. मणिपूरमध्ये २℃ते २.५℃पर्यंत कमाल तापमानवाढीचा अंदाज आहे. तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणामधील जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यातील तापमान १.५°C ते २°C ने वाढेल.

गहू, कडधान्ये, भरड आणि तृणधान्यांचे उत्पन्न २०५० पर्यंत  ९ टक्के कमी होऊ शकते. उत्सर्जन कमी झाल्यास २४ अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल आणि उत्सर्जन जास्त राहिल्यास आणि बर्फाचे आवरण अस्थिर असल्यास ३६ अब्ज डॉलर्सचे  नुकसान होण्याचा अंदाज आहे.

हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचे उपाय* ग्रीन जीडीपी आणि ग्रीन अकाउंटिंगचा स्वीकार. लो-कार्बन इकॉनॉमिक सिस्टीमकडे जाण्याचे उपाय योजणे* समान भागीदारी, सामाजिक न्याय, हवामान न्याय, समान अधिकार आणि समावेशकतेचा स्वीकार* लो-कार्बन जीवनशैलीच, वनस्पती - आधारित आहार, अन्नाचा अपव्यय कमी करणे, चालणे, सायकलचा वापर.- राजेंद्र गाडगीळ, पक्षिमित्र, जळगावgadgilrajendra@yahoo.com