शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नामस्मरण करताना पाळायचे पथ्य

By admin | Updated: July 3, 2014 08:58 IST

सदासर्वदा नित्यनेमाने सकल कामना पूर्ण करणारे श्रीरामाचे नामस्मरण करीत राहिल्यास साधकाला आपदा, संकटे त्रास देऊ शकत नाहीत.

अध्यात्म

मोहनबुवा रामदासी

सदा रामनामें वदा पूर्ण कामे।कदा बाधिजेना पदा नित्यनेमे।मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा।।

श्लोकार्थ- सदासर्वदा नित्यनेमाने सकल कामना पूर्ण करणारे श्रीरामाचे नामस्मरण करीत राहिल्यास साधकाला आपदा, संकटे त्रास देऊ शकत नाहीत. म्हणून अहंकाराने आलेला आळस सोडून देऊन अशा त्या प्रभू रामचंद्रांचे रोज सुप्रभाती चिंतन करावे.समर्थ म्हणतात, उत्कट वासनेने आणि तीव्र इच्छेने रामनामाचा सतत घोष ठेवावा. म्हणजे या घोषाने कोणतीही आपत्ती किंवा संकट बाधक होणार नाही. बाधिजेना हा शब्द मार्मिक आहे. श्रीराम हा भक्तकैवारी आहे. ‘‘आपदामपहर्तारं दाता सर्व संपदाम’’ असा तो आहे. समर्थ म्हणतात, ‘‘नामे संकटे नासती।नामे विघ्ने निवारती।नामस्मरणे पाविजेती।उत्तम पदो।’’ एवढेच काय, पण ‘‘काहीच न करून प्राणी। रामनाम जपे वाणी। तेणे संतुष्ट चक्रपाणी। भक्तालांगी सांभाळी।।’’ पण समजा काही आपत्ती प्रारब्धामुळे सहन कराव्या लागल्या, तरी त्याही बाधक होणार नाहीत. कारण नामामुळे देवाबद्दलची इतकी दृढ निष्ठा उत्पन्न होते, की आपण संकटे सोसावे अशीच रामाची इच्छा आहे, असा मनात भाव उत्पन्न होतो. ‘‘देवाचे जे मनोगत। तेचि आपुले उचित। इच्छेसाठी भगवंत। अंतरू नये।।’’ संकटनिवारण झाले तरी किंवा नाही झाले, तरी त्याची फिकीर वाटत नाही; पण इतकी बेफिकीर वृत्ती होण्यासाठी एक पथ्य सांभाळावे लागते. ते पथ्य म्हणजे नित्यनेमाने नाम घेणे. ‘‘नित्य नेमे अंतर्शुद्ध। नित्य नेमे वाढे बोध। नित्य नेमे बहुखेद। प्रपंची तुटे।।’’ नेमाने भजन केल्यामुळे प्रथम चित्ताची शुद्धी होते. नंतर रूपाचे ज्ञान होते. ज्ञानाने तेच आपले रूप आहे, हे समजते आणि शरीर म्हणजे आपण नव्हे असे समजल्याने प्रापंचिक आघातांची पर्वा वाटत नाही. नित्यनेमाने पथ्यपालनात दोन मोठी विघ्ने येतात. एक मद म्हणजे ताठा किंवा गर्व, दुसरे आळस. मनुष्य संपत्तीने, रूपामुळे, गुणामुळे, ज्ञानामुळे गर्विष्ठ होतो. या अहंतागुणे ‘‘थोर आयुष्य मोलाचे।मदे व्यर्थचि नासिले।’’ असे होते. आपला अहंकार देवाच्या सत्तेवर चालत असून रूप, गुण, ऐश्वर्य व ज्ञान सर्वच बाबतींत तोच श्रेष्ठ, आपले भजनही त्याच्याच कृपेमुळे असा नम्र भाव ठेवून त्याला स्मरावे. मदाप्रमाणेच आळस सोडावा. अंगात शक्ती असूनही प्रतिकाराची वृत्ती उत्पन्न न होणे म्हणजे आळस.