शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नामस्मरण करताना पाळायचे पथ्य

By admin | Updated: July 3, 2014 08:58 IST

सदासर्वदा नित्यनेमाने सकल कामना पूर्ण करणारे श्रीरामाचे नामस्मरण करीत राहिल्यास साधकाला आपदा, संकटे त्रास देऊ शकत नाहीत.

अध्यात्म

मोहनबुवा रामदासी

सदा रामनामें वदा पूर्ण कामे।कदा बाधिजेना पदा नित्यनेमे।मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा।।

श्लोकार्थ- सदासर्वदा नित्यनेमाने सकल कामना पूर्ण करणारे श्रीरामाचे नामस्मरण करीत राहिल्यास साधकाला आपदा, संकटे त्रास देऊ शकत नाहीत. म्हणून अहंकाराने आलेला आळस सोडून देऊन अशा त्या प्रभू रामचंद्रांचे रोज सुप्रभाती चिंतन करावे.समर्थ म्हणतात, उत्कट वासनेने आणि तीव्र इच्छेने रामनामाचा सतत घोष ठेवावा. म्हणजे या घोषाने कोणतीही आपत्ती किंवा संकट बाधक होणार नाही. बाधिजेना हा शब्द मार्मिक आहे. श्रीराम हा भक्तकैवारी आहे. ‘‘आपदामपहर्तारं दाता सर्व संपदाम’’ असा तो आहे. समर्थ म्हणतात, ‘‘नामे संकटे नासती।नामे विघ्ने निवारती।नामस्मरणे पाविजेती।उत्तम पदो।’’ एवढेच काय, पण ‘‘काहीच न करून प्राणी। रामनाम जपे वाणी। तेणे संतुष्ट चक्रपाणी। भक्तालांगी सांभाळी।।’’ पण समजा काही आपत्ती प्रारब्धामुळे सहन कराव्या लागल्या, तरी त्याही बाधक होणार नाहीत. कारण नामामुळे देवाबद्दलची इतकी दृढ निष्ठा उत्पन्न होते, की आपण संकटे सोसावे अशीच रामाची इच्छा आहे, असा मनात भाव उत्पन्न होतो. ‘‘देवाचे जे मनोगत। तेचि आपुले उचित। इच्छेसाठी भगवंत। अंतरू नये।।’’ संकटनिवारण झाले तरी किंवा नाही झाले, तरी त्याची फिकीर वाटत नाही; पण इतकी बेफिकीर वृत्ती होण्यासाठी एक पथ्य सांभाळावे लागते. ते पथ्य म्हणजे नित्यनेमाने नाम घेणे. ‘‘नित्य नेमे अंतर्शुद्ध। नित्य नेमे वाढे बोध। नित्य नेमे बहुखेद। प्रपंची तुटे।।’’ नेमाने भजन केल्यामुळे प्रथम चित्ताची शुद्धी होते. नंतर रूपाचे ज्ञान होते. ज्ञानाने तेच आपले रूप आहे, हे समजते आणि शरीर म्हणजे आपण नव्हे असे समजल्याने प्रापंचिक आघातांची पर्वा वाटत नाही. नित्यनेमाने पथ्यपालनात दोन मोठी विघ्ने येतात. एक मद म्हणजे ताठा किंवा गर्व, दुसरे आळस. मनुष्य संपत्तीने, रूपामुळे, गुणामुळे, ज्ञानामुळे गर्विष्ठ होतो. या अहंतागुणे ‘‘थोर आयुष्य मोलाचे।मदे व्यर्थचि नासिले।’’ असे होते. आपला अहंकार देवाच्या सत्तेवर चालत असून रूप, गुण, ऐश्वर्य व ज्ञान सर्वच बाबतींत तोच श्रेष्ठ, आपले भजनही त्याच्याच कृपेमुळे असा नम्र भाव ठेवून त्याला स्मरावे. मदाप्रमाणेच आळस सोडावा. अंगात शक्ती असूनही प्रतिकाराची वृत्ती उत्पन्न न होणे म्हणजे आळस.