शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पाणीप्रश्नी ठिणगी गेली पडून !

By admin | Updated: January 16, 2015 00:29 IST

पाण्याच्या प्रश्नावर केले जाणारे राजकारण महाराष्ट्रालाच काय देशालाही नवे नाही. जलतंटे हा अनादी अनंत काळापासून चालत आलेला आणि यापुढील काळातही चालूच राहणारा विषय आहे.

किरण अग्रवाल - 

पाण्याच्या प्रश्नावर केले जाणारे राजकारण महाराष्ट्रालाच काय देशालाही नवे नाही. जलतंटे हा अनादी अनंत काळापासून चालत आलेला आणि यापुढील काळातही चालूच राहणारा विषय आहे. अनेक ठिकाणी तर तो वर्षानुवर्षे निवडणुकांचा मुद्दा बनून राहिला आहे. एवढ्या एका मुद्द्यावर निवडणुकीचे मैदान मारून नेणारेही आपल्याकडे आहेत. त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पाच्या नमनालाच विरोधाची नांदी घडून येण्याला अस्वाभाविक म्हणता येऊ नये. विशेषत: उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर असताना या क्षेत्रासाठी वळवावयाचे पाणी गुजरातकडे नेले जाणार असल्यानेच या प्रकल्पांना सुरू झालेला विरोध स्वाभाविक ठरला आहे.केंद्रात ‘संपुआ’ सरकार असताना मे-२०१० मध्ये दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा लिंक प्रस्तावांचा सामंजस्यकरार करण्यात आला होता. त्यानुसार दोन्ही राज्यांना आपापल्या पाणलोट क्षेत्रातील पाणी वापरायचे होते. मात्र गुजरात सरकारने त्यात बदल करून दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पाचा नवा प्रस्ताव केंद्राला सादर करून तो महाराष्ट्राच्या गळी उतरविण्याचे प्रयत्न चालविल्याचा आरोप यासंदर्भात केला जात आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांची या महिन्याच्या प्रारंभी मुंबईत जी बैठक झाली, त्यातून सदरचा मुद्दा चर्चेत येऊन गेला आहे.मुळात, नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून नाशिक, नगर व मराठवाड्यात कायम तंटे होत आले आहेत. खान्देशमध्येही पाण्यासाठी नेहमी ओरड होत असते. त्याचदृष्टीने नाशिक जिल्ह्यातील पश्चिम वाहिनी नार-पार व दमणगंगा या नद्यांचे पाणी ३० वळण बंधारे बांधून पूर्वेकडे वळविण्याची व त्याद्वारे गिरणा-तापी खोरे समृद्ध करण्याची योजना सुचविण्यात आली होती. जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांच्या सिंचनाचा प्रश्न त्यामुळे सुटण्याची अपेक्षा होती. माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी त्यासाठी बराच पाठपुरावाही केला होता. परंतु या योजनेला मूर्तरूप मिळण्याऐवजी दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी नर्मदा लिंकद्वारे गुजरातकडे पाणी वळविण्याची योजना समोर आल्याने विरोधाला सुरुवात होऊन गेली आहे. तसेही गुजरातमधील सरदार सरोवर व उकई प्रकल्पामुळे त्या राज्याची सिंचन क्षमता ३८ टक्क्यांवर पोहोचल्याचे तर महाराष्ट्राची सिंचन क्षमता त्यापेक्षा निम्म्याहूनही कमी म्हणजे १८ टक्केच असल्याचे पाहता राज्यातील पाणी राज्यातच वळविण्याची अपेक्षा केली जात आहे, कारण महाराष्ट्रातच पाण्याची तूट आहे. पाण्याच्या समन्यायी वाटपाचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो व प्रसंगी उग्ररूप धारण करतो तो त्यामुळेच. भौगोलिक परिस्थितीचा विचार करता गोदावरी खोऱ्यास दमणगंगेच्या तर गिरणा खोऱ्यास नार-पारच्या पाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण नवीन योजनेनुसार या खोऱ्यातील पाणी अल्पशा प्रमाणात मुंबईला देण्याचे गाजर दाखवून अधिकतर गुजरातला नेऊ केल्याने विरोधाला संधी मिळून गेली आहे. नाशिकच्या जलसिंचन अभियांत्रिकी संस्थेने लाक्षणिक उपोषणाद्वारे या विषयाकडे साऱ्यांचे लक्ष वेधून संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. तर जळगाव, धुळ्यातही विरोधाचा सूर निघू लागला आहे. मातब्बर नेते शंकरराव कोल्हे, राधाकृष्ण विखे पाटील व छगन भुजबळ यांनीही या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तात्पर्य ठिणगी पडून गेली आहे.विशेष म्हणजे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातील असून नाशिकचे पालकत्वही त्यांच्याचकडे असताना त्यांनी आपल्या परिसरावर अन्यायकारक ठरू शकणाऱ्या नवीन प्रस्तावित योजनांबद्दल सुस्पष्ट भूमिका न मांडल्याने ते केंद्राच्या दबावात असल्याचा अर्थ काढता येणारा आहे. केंद्र व राज्यातील जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीस या योजनेशी संबंधित उत्तर महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना साधे निमंत्रणही देण्यात न आल्याने या दबावाला जणू दुजोराच मिळून गेला आहे.