शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वट वट सावित्रीची कथा

By संदीप प्रधान | Updated: July 6, 2018 02:35 IST

काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का?

काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का? त्यावर ऋषीवर उल्हासदादा आपल्या लालेलाल दाढीवरून हात फिरवत व दोन्ही हात हवेत झाडत टाळी देत हास्यचित्कार करीत बोलले की, शिवसेना नावाच्या वट वट सावित्रीने आपल्या पातिव्रत्याची अशीच घोर परीक्षा दिली आहे. तुंबई नामे नगरीवर उद्धवोठाकरी नामे राजा राज्य करीत होता. त्याची कन्या शिवसेना ही लहानपणी अत्यंत व्रात्य, उत्पाती, राडेबाज होती. अशा कन्येशी कुणी विवाह करणार नाही या विवंचनेतून उद्धवोठाकरी राजाने महत्प्रयासाने आपल्या कन्येची शांती केली. या धार्मिक विधीत त्याला अनिलकुमार देसाई, डॉ. नीलम गोºहेताई आदी दरबारी सहकाऱ्यांनी साथ दिली. शिवसेना विवाहयोग्य झाली तेव्हा उद्धवोठाकरी राजाने तिला तिचा वर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. शिवसेना कधी बारामती नगरीचे राजे शरदबाबू भानामतीकर यांना डोळा घालायची तर कधी नागपूरकर देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा गालगुच्चा घ्यायची. धर्मशास्त्रानुसार जो पिता विवाहयोग्य कन्येचे कन्यादान करीत नाही त्याला निंदनीय मानले गेले आहे. मात्र आपली कन्या वट वट सावित्री काय गुण उधळेल, या चिंतेनी धर्मशास्त्र धाब्यावर बसवून उद्धवोठाकरी राजाने तिला स्वातंत्र्य बहाल केले. मध्यंतरीच्या पंधरा वर्षांत शिवसेना वणवण फिरली. पण तिला वर काही मिळाला नाही. शिवसेनेची ही वणवण न पाहून खाद्यमहर्षी नितीनभाऊ गडबडकरी यांनी उद्धवोठाकरी राजाला ‘मातोश्री’ महाली फोन केले. मात्र खाद्यमहर्षींचे फोन उद्धवोठाकरी राजाचे अमात्य मिलिंद नार्वेकर राँगनंबरवाले यांनी घेतले व हॅलो हॅलो करून ठेवून दिले. अखेरीस बरीच डोळे मारामार केल्यावर या वट वट सावित्रीला वर लाभला. त्याला घेऊन ती तुंबई नगरीत आली तेव्हा उद्धवोठाकरी हे देवर्षी संजय राऊतमुनींसोबत बसले होते. मिशीला पिळ देत मुनीवर म्हणाले की, हा विवाह फार काळ टिकणार नाही. या वराच्या गळ्याला अल्पावधीत नख लागेल व कुणी लावले नाही तर मीच लावेन. शिवसेना विवाहाकरिता आता घायकुतीला आली होती. तिने आपल्या पित्याला कन्यादान करण्याची गळ घातली. विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. देशोदेशीचे राजे-महाराजे हजर राहिले. पंचपक्वान्नाच्या पंक्ती उठल्या. अत्तराचे कारंजे थुईथुई नाचले. शिवसेना आपल्या पतीला अल्पायुषी ठरवण्याकरिता रोजच त्याचा छळ करू लागली. रोजच घर सोडून पळून जाण्याचे इशारे देऊ लागली. वट वट सावित्रीचा हा व्याप असह्य होऊन एक दिवस तिचा पती जंगलात लाकडं फोडायला गेला. पतीच्या मागं हात धुवून लागलेली ही सावित्री मागं मागं गेली. पतीला ढगात पोहोचवण्याकरिता तिनं ‘नाणार व्रत’ केलं होतं. त्यामुळं जो भेटेल त्याला ती जाणार...जाणार... सांगत सुटली होती. ईव्हीएमवर स्वार यमराज समोर उभे राहताच सावित्रीचा पारा चढला. अरे, यमा तू याचे प्राण सोबत न्यायला आलायस की, याच्या कुडीत प्राण फुंकायला आलायस, अशी दमदाटी तिनं केली. भयभीत यमानं सावित्रीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा ती बोलली की, पुढील सात निवडणुकीत पतीविना १५१ आमदारांनी माझी कूस उजू दे...(तिरकस)

टॅग्स :Politicsराजकारण