शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

By यदू जोशी | Updated: May 16, 2022 13:12 IST

फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. ६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईला पत्र पाठवलं होतं.

>> यदु जोशी

देवेंद्र फडणवीस खरेच राममंदिर आंदोलनाच्या वेळी अयोध्येला गेले होते की नाही यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत संशय व्यक्त केला आहे. तेव्हा तुमचं वय किती होतं?, ती काय शाळेची सहल होती का?, या शब्दात ठाकरेंनी फडणवीसांना डिवचले. फडणवीस राम मंदिर आंदोलनाच्या वेळी शाळकरी होते, असा तर्क एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी दिला. त्या आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांची खिल्ली उडविली होती. १९९२ मध्ये बाबरी पडली तेव्हा फडणवीस केवळ तेरा वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस खरेच अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांच्यावर तेरा वर्षांच्या बालकाला अयोध्येस नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी केली होती. 

आता प्रश्न निर्माण झाला आहे तो हा की, फडणवीस खरेच अयोध्येला आंदोलनासाठी गेले होते का? उत्तर आहे होय! फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. पहिल्यांदा गेले तेव्हा ते  २० वर्षांचे होते आणि दुसऱ्यांदा गेले तेव्हा २२ वर्षांचे होते. सर्वात आधी ते ऑक्टोबर १९९० रोजी गेले होते पण प्रत्यक्ष अयोध्येपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून ते गेले होते. कार्यकर्ते, मित्रांसोबत ते रेल्वेगाडीने अलाहाबादला (आजचे प्रयागराज) गेले. तेथील सीताराम मंदिरात ते पाच दिवस राहिले. नंतर शंकराचार्यांच्या नेतृत्वात अयोध्येकडे निघालेल्या शेकडो कारसेवकांसोबत ते अयोध्येच्या दिशेने निघाले आणि काही किलोमीटर पायी चालल्यानंतर पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदायूच्या जेलमध्ये बंदिस्त केले. तेथे ते १७ दिवस राहिले. फडणवीस यांच्यासोबत त्यावेळी असलेले संजय बंगाले, उदय डबली, शशि शुक्ला या मित्रांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी तिथे मुलायमसिंह यांचे समाजवादी पार्टीचे सरकार होते. मात्र, बदायूचे जेलर रामभक्त होते. त्यांची पत्नी आणि दोन मुले राममंदिर आंदोलनात अटक करून प्रतापगडच्या तुरुंगात ठेवलेले होते अशी आठवण अ‍ॅड.उदय डबले यांनी सांगितली. 

६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. ते बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात असताना ढाच्याजवळ आंदोलक म्हणून होते. त्यांच्यासोबतचा थापा नावाचा नागपूरहून आलेला कार्यकर्ता घुमटावर चढला होता. मी देखील ढाचाजवळ घोषणा देत पुढेपुढे सरकत होतो, असे फडणवीस यांचे मित्र आणि आता नागपुरात नगरसेवक असलेले संजय बंगाले यांनी सांगितले. '२ डिसेंबरलाच आम्ही अयोध्येला पोहोचलो होतो आणि आमचा नागपूरचा मित्र  महेश रामडोवकर याचे नातेवाईक पुजारी असलेल्या काळा राम मंदिरात मुक्कामी होतो. ६ डिसेंबरला सकाळपासूनच अयोध्येतील वास्तूसमोर जाहीर सभा सुरू झाली होती. त्या ठिकाणी आम्ही होतो', असे फडणवीस यांचे बालमित्र हर्षल आर्विकर यांनी सांगितले. 

आधी फडणवीस पोहोचले अन् नंतर पोहोचले पत्र

तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईस पत्र पाठविले आणि जेलमध्ये आहे, पण जिवाला काही धोका नाही असे कळविले. आश्चर्याची बाब म्हणजे बदायूच्या जेलमधून सुटका होऊन फडणवीस ज्या दिवशी नागपूरला घरी परतले. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पत्र त्यांच्या घरी आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा