शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

By यदू जोशी | Updated: May 16, 2022 13:12 IST

फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. ६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईला पत्र पाठवलं होतं.

>> यदु जोशी

देवेंद्र फडणवीस खरेच राममंदिर आंदोलनाच्या वेळी अयोध्येला गेले होते की नाही यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत संशय व्यक्त केला आहे. तेव्हा तुमचं वय किती होतं?, ती काय शाळेची सहल होती का?, या शब्दात ठाकरेंनी फडणवीसांना डिवचले. फडणवीस राम मंदिर आंदोलनाच्या वेळी शाळकरी होते, असा तर्क एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी दिला. त्या आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांची खिल्ली उडविली होती. १९९२ मध्ये बाबरी पडली तेव्हा फडणवीस केवळ तेरा वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस खरेच अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांच्यावर तेरा वर्षांच्या बालकाला अयोध्येस नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी केली होती. 

आता प्रश्न निर्माण झाला आहे तो हा की, फडणवीस खरेच अयोध्येला आंदोलनासाठी गेले होते का? उत्तर आहे होय! फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. पहिल्यांदा गेले तेव्हा ते  २० वर्षांचे होते आणि दुसऱ्यांदा गेले तेव्हा २२ वर्षांचे होते. सर्वात आधी ते ऑक्टोबर १९९० रोजी गेले होते पण प्रत्यक्ष अयोध्येपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून ते गेले होते. कार्यकर्ते, मित्रांसोबत ते रेल्वेगाडीने अलाहाबादला (आजचे प्रयागराज) गेले. तेथील सीताराम मंदिरात ते पाच दिवस राहिले. नंतर शंकराचार्यांच्या नेतृत्वात अयोध्येकडे निघालेल्या शेकडो कारसेवकांसोबत ते अयोध्येच्या दिशेने निघाले आणि काही किलोमीटर पायी चालल्यानंतर पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदायूच्या जेलमध्ये बंदिस्त केले. तेथे ते १७ दिवस राहिले. फडणवीस यांच्यासोबत त्यावेळी असलेले संजय बंगाले, उदय डबली, शशि शुक्ला या मित्रांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी तिथे मुलायमसिंह यांचे समाजवादी पार्टीचे सरकार होते. मात्र, बदायूचे जेलर रामभक्त होते. त्यांची पत्नी आणि दोन मुले राममंदिर आंदोलनात अटक करून प्रतापगडच्या तुरुंगात ठेवलेले होते अशी आठवण अ‍ॅड.उदय डबले यांनी सांगितली. 

६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. ते बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात असताना ढाच्याजवळ आंदोलक म्हणून होते. त्यांच्यासोबतचा थापा नावाचा नागपूरहून आलेला कार्यकर्ता घुमटावर चढला होता. मी देखील ढाचाजवळ घोषणा देत पुढेपुढे सरकत होतो, असे फडणवीस यांचे मित्र आणि आता नागपुरात नगरसेवक असलेले संजय बंगाले यांनी सांगितले. '२ डिसेंबरलाच आम्ही अयोध्येला पोहोचलो होतो आणि आमचा नागपूरचा मित्र  महेश रामडोवकर याचे नातेवाईक पुजारी असलेल्या काळा राम मंदिरात मुक्कामी होतो. ६ डिसेंबरला सकाळपासूनच अयोध्येतील वास्तूसमोर जाहीर सभा सुरू झाली होती. त्या ठिकाणी आम्ही होतो', असे फडणवीस यांचे बालमित्र हर्षल आर्विकर यांनी सांगितले. 

आधी फडणवीस पोहोचले अन् नंतर पोहोचले पत्र

तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईस पत्र पाठविले आणि जेलमध्ये आहे, पण जिवाला काही धोका नाही असे कळविले. आश्चर्याची बाब म्हणजे बदायूच्या जेलमधून सुटका होऊन फडणवीस ज्या दिवशी नागपूरला घरी परतले. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पत्र त्यांच्या घरी आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा