शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

तयारीविना वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 04:34 IST

अकल्पित निर्णय घेऊन सर्वांना चकीत करीत कारभार करण्याच्या मोदींच्या शैलीचा अनुभव नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत आला आहे.

तयारीविना वाटचाल हे नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराचे वैशिष्ट्य असल्याचा शेरा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मारला आहे. चिदंबरम आणि मोदी यांच्यातील वितुष्ट सर्वज्ञात असल्याने, या टीकेकडे दुर्लक्ष होण्याचा संभव आहे. चिदंबरम यांचा मग्रूर स्वभाव, बौद्धिक अहंकार हे दोष मान्य केले तरी तयारीविना वाटचाल हे त्यांनी केलेले मोदी सरकारचे वर्णन वस्तुस्थितीला धरून आहे.

अकल्पित निर्णय घेऊन सर्वांना चकीत करीत कारभार करण्याच्या मोदींच्या शैलीचा अनुभव नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत आला आहे. कोरोना रोगावर लस नसल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक होते. देशातील वैद्यकीय व्यवस्थेची मर्यादा पाहता रुग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय होता. तथापि, एखाद्या निर्णयाचे परिणाम काय होतील आणि या परिणामांची तीव्रता घालविण्यासाठी काय पूर्वतयारी पाहिजे याची कल्पना केंद्र सरकारला नसणे, हे योग्य नाही.

लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या महायुद्धाचा दाखला दिला. महायुद्ध लढताना केवळ धाडसी निर्णय घेऊन भागत नाही तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना काय अडचणी येतील व त्या अडचणी कशा दूर करता येतील, याची यादी सेनापतीकडे असावी लागते. अशी यादी जवळ असणारा सेनापती यशस्वी होतो, केवळ धाडस दाखिवणारा नव्हे. लॉकडाऊननंतर उद्भवणाºया अडचणींची यादी मोदी सरकारकडे नव्हती, असे गेल्या पाच दिवसातील घटनांवरून लक्षात येते. भारत हे अनेक असंघटित क्षेत्रांचे कडबोळे असून, ही क्षेत्रे एकमेकात गुंतलेली आहेत आणि देशातील ९० टक्के कामगार या असंघटित क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत.

त्यात स्थलांतरितांची संख्या प्रचंड आहे. याशिवाय शिक्षण, वैद्यकीय उपचार, पर्यटन, अशा विविध कारणांसाठी अन्य राज्यात लक्षावधी लोक जा-ये करतात. देशात दररोज अनेक लोकसमूह एका प्रदेशातून दुसºया प्रदेशात जात असतात. या सर्व समूहांची हालचाल केवळ तीन तासांची मुदत देऊन थांबविण्यात आली. त्याबरोबर रोजंदारीवर काम करणाºया मजुरांचे रोजचे वेतन थांबले. राहायचे कुठे आणि भूक भागवायची कशी, या प्रश्नांसोबतच रेल्वे, बस बंद केल्यामुळे गावाकडे जायचे कसे, ही समस्या त्यांच्यासमोर उभी राहिली.

शेवटी अशा मजुरांचे लोंढे पायी गावाकडे निघाले. ज्या सोशल डिस्टन्सिंगचा पंतप्रधानांनी आग्रह धरला होता त्याला तिलांजली देऊन हे लोंढे गावाकडे सरकू लागले. असहाय्य होऊन कित्येकांनी ३००-३५० किलोमीटरची वाट धरली. ३२६ किलोमीटरवरील गावाकडे दिल्लीहून पायी निघालेल्या रणवीरसिंग याचा आग्राजवळ मृत्यू झाला. हा कोरोनाचा नव्हे तर सरकारी अव्यवस्थेचा बळी आहे. हे सर्व थांबविता आले असते.

असंघटित क्षेत्रातील हे प्रश्न लक्षात घेऊन स्थलांतरितांच्या निवासाची व्यवस्था लॉकडाऊनच्या आधी शहरांमध्येच करता आली असती. पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, पण त्यांना लॉकडाऊनच्या निर्णयाची माहिती दिली नाही. ती दिली असती तर महाराष्ट्रासह सर्व मुख्यमंत्री तयारीत राहिले असते. जनता कर्फ्यूच्या रविवारीच पुण्यातून बिहारसाठी विशेष गाड्या सोडाव्या लागल्या होत्या. स्थलांतरितांचे लोंढे येतील याची कल्पना त्याच वेळी रेल्वेला आली होती. रेल्वेने विशेष गाड्यांची तयारीही केली. पण रेल्वेला विश्वासात न घेता प्रवासी वाहतूक त्वरित थांबविण्यात आली.

स्थलांतरितांप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व खरेदी-विक्री याबद्दलही ठोस व्यवस्था आखण्यात आलेली नाही, असे जागोजागीच्या गोंधळावरून दिसते आहे. या घटना वाढत गेल्या तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोदी रेडिओ व दूरदर्शनवरून आवाहन करीत आहेत, मात्र त्यांचा एकही मंत्री सामान्य नागरिकांच्या रस्त्यावरील अडचणी सोडविण्यासाठी कामाला लागलेला दिसत नाही. फक्त केजरीवाल यांचे मंत्रिमंडळ काम करीत आहे. मोदींच्या आवाहनाला जनता प्रतिसाद देत असली तरी भीतीवर भूक मात करते आणि मग अनावस्था प्रसंग उद्भवतो. तयारीविना वाटचाल नुकसानीची ठरते याचे भान ठेवावे.

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, पण त्यांना लॉकडाऊनच्या निर्णयाची माहिती दिली नाही. ती दिली असती तर महाराष्ट्रासह सर्व मुख्यमंत्री तयारीत राहिले असते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत