शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

तयारीविना वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 04:34 IST

अकल्पित निर्णय घेऊन सर्वांना चकीत करीत कारभार करण्याच्या मोदींच्या शैलीचा अनुभव नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत आला आहे.

तयारीविना वाटचाल हे नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराचे वैशिष्ट्य असल्याचा शेरा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मारला आहे. चिदंबरम आणि मोदी यांच्यातील वितुष्ट सर्वज्ञात असल्याने, या टीकेकडे दुर्लक्ष होण्याचा संभव आहे. चिदंबरम यांचा मग्रूर स्वभाव, बौद्धिक अहंकार हे दोष मान्य केले तरी तयारीविना वाटचाल हे त्यांनी केलेले मोदी सरकारचे वर्णन वस्तुस्थितीला धरून आहे.

अकल्पित निर्णय घेऊन सर्वांना चकीत करीत कारभार करण्याच्या मोदींच्या शैलीचा अनुभव नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत आला आहे. कोरोना रोगावर लस नसल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक होते. देशातील वैद्यकीय व्यवस्थेची मर्यादा पाहता रुग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय होता. तथापि, एखाद्या निर्णयाचे परिणाम काय होतील आणि या परिणामांची तीव्रता घालविण्यासाठी काय पूर्वतयारी पाहिजे याची कल्पना केंद्र सरकारला नसणे, हे योग्य नाही.

लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या महायुद्धाचा दाखला दिला. महायुद्ध लढताना केवळ धाडसी निर्णय घेऊन भागत नाही तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना काय अडचणी येतील व त्या अडचणी कशा दूर करता येतील, याची यादी सेनापतीकडे असावी लागते. अशी यादी जवळ असणारा सेनापती यशस्वी होतो, केवळ धाडस दाखिवणारा नव्हे. लॉकडाऊननंतर उद्भवणाºया अडचणींची यादी मोदी सरकारकडे नव्हती, असे गेल्या पाच दिवसातील घटनांवरून लक्षात येते. भारत हे अनेक असंघटित क्षेत्रांचे कडबोळे असून, ही क्षेत्रे एकमेकात गुंतलेली आहेत आणि देशातील ९० टक्के कामगार या असंघटित क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत.

त्यात स्थलांतरितांची संख्या प्रचंड आहे. याशिवाय शिक्षण, वैद्यकीय उपचार, पर्यटन, अशा विविध कारणांसाठी अन्य राज्यात लक्षावधी लोक जा-ये करतात. देशात दररोज अनेक लोकसमूह एका प्रदेशातून दुसºया प्रदेशात जात असतात. या सर्व समूहांची हालचाल केवळ तीन तासांची मुदत देऊन थांबविण्यात आली. त्याबरोबर रोजंदारीवर काम करणाºया मजुरांचे रोजचे वेतन थांबले. राहायचे कुठे आणि भूक भागवायची कशी, या प्रश्नांसोबतच रेल्वे, बस बंद केल्यामुळे गावाकडे जायचे कसे, ही समस्या त्यांच्यासमोर उभी राहिली.

शेवटी अशा मजुरांचे लोंढे पायी गावाकडे निघाले. ज्या सोशल डिस्टन्सिंगचा पंतप्रधानांनी आग्रह धरला होता त्याला तिलांजली देऊन हे लोंढे गावाकडे सरकू लागले. असहाय्य होऊन कित्येकांनी ३००-३५० किलोमीटरची वाट धरली. ३२६ किलोमीटरवरील गावाकडे दिल्लीहून पायी निघालेल्या रणवीरसिंग याचा आग्राजवळ मृत्यू झाला. हा कोरोनाचा नव्हे तर सरकारी अव्यवस्थेचा बळी आहे. हे सर्व थांबविता आले असते.

असंघटित क्षेत्रातील हे प्रश्न लक्षात घेऊन स्थलांतरितांच्या निवासाची व्यवस्था लॉकडाऊनच्या आधी शहरांमध्येच करता आली असती. पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, पण त्यांना लॉकडाऊनच्या निर्णयाची माहिती दिली नाही. ती दिली असती तर महाराष्ट्रासह सर्व मुख्यमंत्री तयारीत राहिले असते. जनता कर्फ्यूच्या रविवारीच पुण्यातून बिहारसाठी विशेष गाड्या सोडाव्या लागल्या होत्या. स्थलांतरितांचे लोंढे येतील याची कल्पना त्याच वेळी रेल्वेला आली होती. रेल्वेने विशेष गाड्यांची तयारीही केली. पण रेल्वेला विश्वासात न घेता प्रवासी वाहतूक त्वरित थांबविण्यात आली.

स्थलांतरितांप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व खरेदी-विक्री याबद्दलही ठोस व्यवस्था आखण्यात आलेली नाही, असे जागोजागीच्या गोंधळावरून दिसते आहे. या घटना वाढत गेल्या तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोदी रेडिओ व दूरदर्शनवरून आवाहन करीत आहेत, मात्र त्यांचा एकही मंत्री सामान्य नागरिकांच्या रस्त्यावरील अडचणी सोडविण्यासाठी कामाला लागलेला दिसत नाही. फक्त केजरीवाल यांचे मंत्रिमंडळ काम करीत आहे. मोदींच्या आवाहनाला जनता प्रतिसाद देत असली तरी भीतीवर भूक मात करते आणि मग अनावस्था प्रसंग उद्भवतो. तयारीविना वाटचाल नुकसानीची ठरते याचे भान ठेवावे.

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, पण त्यांना लॉकडाऊनच्या निर्णयाची माहिती दिली नाही. ती दिली असती तर महाराष्ट्रासह सर्व मुख्यमंत्री तयारीत राहिले असते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत