शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सर्मपणात जगा!

By admin | Updated: June 30, 2014 08:55 IST

रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो.

अध्यात्म
 
श्री मुनी तरुणसागरजी
 
रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो.
लक्षात ठेवा सुख-दु:ख स्थायी नाहीत. स्थायी-चिरंतन तर आनंद आहे. जो साधनेने मिळत असतो. वासनेने नव्हे उपासनेने लाभतो.
***
परिवर्तन नित्य आहे. विश्‍वातील प्रत्येक वस्तू परिवर्तनशील आहे. सूर्य दिवसातून तीन रूप धारण करतो.
विना परिवर्तनाने जीवन ठप्प होऊन जाते. साचलेले पाणी सुकून जाते. तव्यावर चपाती जळून जाते, पान गळून पडते.
समाज पांगळा होऊन जातो. राष्ट्र भ्रष्टाचारात बुडून जाते. आणि संत साधनेपासून भ्रष्ट होऊन गृहस्थासारखा होऊन जातो. 
ह्यास्तव चालत राहा, वाहात राहा, थांबू नका, साचू नका. थोडा विश्राम, पुन्हा सावधान.
हेच सत्य होय. विश्राम सावधान.
***
दु:ख कोणाच्या जीवनात येत नाही? गरीब असो वा श्रीमंत, संत असो वा संसारी, छोटा असो वा मोठा, सर्वांच्या जीवनात दु:ख येतच असते.
जीवनात सर्वांना दु:खाचा सामना करावा लागतो. फरक इतकाच की कोणी दु:खाला निपटून टाकतो, तर दु:ख कोणाला निपटून टाकते.
आपण माझे म्हणणे ऐकाल तर माझे निवेदन असेल : दु:खात रडू नका, सुखात झोपू नका.
अर्थ इतकाच दु:खात घाबरू, नका सुखात शेफारून जाऊ नका.
***
दोन बैल आहेत. दोघांपुढे चारा टाकला जातो. त्यातील एक बैल असा असतो, जो आपल्या समोर टाकलेला चारा खात नाही, तर दुसर्‍या बैला समोरचा चारा खाऊ लागतो. स्वत: समोरच्या चार्‍यावर पाय ठेवतो आणि दुसर्‍या बैलास शिंगाने मारू लागतो.
काही माणसे अशीही असतात जे इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात आणि संपत्ती हडप करू इच्छितात.
माझे म्हणणे असे : तुम्ही मनुष्य आहात गुरे-ढोरे नव्हे, आपला चारा खा, दुसर्‍याचा दुसर्‍याला खाऊ द्या.
***
जगायचे तर जागावे लागेल. केवळ अंथरुणातून उठणे म्हणजे जागणे नव्हे. जगण्याचे तात्पर्य : जागृतीचे सजगतेचे जीवन होय. आंतर्दृष्टी.. विवेकाचे नेत्र उघडणे होय. 
क्रोध, पाप, अपराध आणि नशा-धुंदी बेशुद्धीची परिणती होय. जग म्हणते माणूस दारू पिऊन बेहोश होतो. परंतु, भगवान महावीर एक नवीन मुद्दा मांडतात. ते म्हणतात, दारू पिऊन माणूस बेहोश होत नाही, तर बेहोश माणूसच दारू पितो.