शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालामुखीच्या तोंडावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:06 IST

मुंबई कशी ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे, याचे उत्तम उदाहरण बुधवारी बीपीसीएलमधील रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या रूपाने पाहायला मिळाले.

मुंबई कशी ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे, याचे उत्तम उदाहरण बुधवारी बीपीसीएलमधील रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या रूपाने पाहायला मिळाले. आधीच अतिरेक्यांच्या निशाण्यावर असलेल्या मुंबईकरांच्या काळजात या भयानक स्फोटाने धस्स झाले. तब्बल सहा तासांनंतरही ही आग धुमसत होती. चेंबूर भागातील बीपीसीएल, एचपीसीएल अथवा जवळील टाटा पॉवर तसेच माहुल परिसरातील औद्योगिक कंपन्यांमुळे सर्वाधिक प्रदूषण या पट्ट्यात असते. नागरी लोकवस्तीही या ठिकाणी आहे. त्यामुळे येथील रहिवासी कायम मृत्यूच्या छायेखाली वावरत असतात. बुधवारच्या आगीने याचा प्रत्यय आणून दिला. यापूर्वीदेखील लोअर परळ येथील कमला मिल, अंधेरीतल्या साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या आगीत मोठी मनुष्यहानी झाली होती. अशा मोठ्या आगीच्या घटनांवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात आपल्याकडच्या यंत्रणा कमी पडल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या यापूर्वीच्या विकास आराखड्यातही चेंबूरसह लगतचा परिसर हा ‘हेव्ही इंडस्ट्रीयल झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी दाट वस्ती असता कामा नये, याची जाणीव तज्ज्ञांनी प्रशासनाला वारंवार करून दिली आहे. असे असतानाही मुंबई महापालिकेने लगतच्या माहुल परिसरात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. केवळ माहुलच नाही, तर चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह लगतच्या परिसरातील रहिवाशांना आधीच मूलभूत सेवासुविधांअभावी जगावे लागत आहे. माहुल येथील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने करीत प्रशासनाला याची जाणीवही करून दिली आहे. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. पूर्व उपनगरातील डम्पिंगलाही सातत्याने आगी लागत असून, आगीमुळे येथील परिसरात चार ते पाच पाच दिवस धुराचे साम्राज्य राहते. मानखुर्द आणि गोवंडीमध्ये दाटीवाटीने वसलेल्या लोकवस्तीमध्ये यापूर्वी कित्येकवेळा आगी लागल्या आहेत. परिणामी, मुंबईसारखी मायानगरी सातत्याने ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. बीपीसीएलसारख्या कंपन्यांत आपत्कालीन घटनांवर मात करण्यासाठी यंत्रणा कायम सज्ज असल्या तरीदेखील येथील दुर्घटनांचा संबंध हा इतिहासात झालेल्या चुकांशी आहे. चुकीच्या पद्धतीने वसवलेली वस्ती, त्यामुळे येथील मूलभूत सेवासुविधांवर लोकसंख्येचा येणारा ताण, डम्पिंगची अपुरी क्षमता यांसारख्या अनेक समस्यांनी आधीच डोके वर काढले आहे. त्यात पुन्हा अशा आगीच्या घटना घडतात. हे दुहेरी संकट येत्या काळात अधिकच गडद होत जाईल. याचा विचार आगामी विकास आराखड्यात झाला तरच मुंबईकरांना सुरक्षित आयुष्य जगता येईल.

टॅग्स :fireआगBPCL Mumbai Fireबीपीसीएल आग