शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालामुखीच्या तोंडावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:06 IST

मुंबई कशी ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे, याचे उत्तम उदाहरण बुधवारी बीपीसीएलमधील रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या रूपाने पाहायला मिळाले.

मुंबई कशी ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे, याचे उत्तम उदाहरण बुधवारी बीपीसीएलमधील रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या रूपाने पाहायला मिळाले. आधीच अतिरेक्यांच्या निशाण्यावर असलेल्या मुंबईकरांच्या काळजात या भयानक स्फोटाने धस्स झाले. तब्बल सहा तासांनंतरही ही आग धुमसत होती. चेंबूर भागातील बीपीसीएल, एचपीसीएल अथवा जवळील टाटा पॉवर तसेच माहुल परिसरातील औद्योगिक कंपन्यांमुळे सर्वाधिक प्रदूषण या पट्ट्यात असते. नागरी लोकवस्तीही या ठिकाणी आहे. त्यामुळे येथील रहिवासी कायम मृत्यूच्या छायेखाली वावरत असतात. बुधवारच्या आगीने याचा प्रत्यय आणून दिला. यापूर्वीदेखील लोअर परळ येथील कमला मिल, अंधेरीतल्या साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या आगीत मोठी मनुष्यहानी झाली होती. अशा मोठ्या आगीच्या घटनांवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात आपल्याकडच्या यंत्रणा कमी पडल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या यापूर्वीच्या विकास आराखड्यातही चेंबूरसह लगतचा परिसर हा ‘हेव्ही इंडस्ट्रीयल झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी दाट वस्ती असता कामा नये, याची जाणीव तज्ज्ञांनी प्रशासनाला वारंवार करून दिली आहे. असे असतानाही मुंबई महापालिकेने लगतच्या माहुल परिसरात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. केवळ माहुलच नाही, तर चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह लगतच्या परिसरातील रहिवाशांना आधीच मूलभूत सेवासुविधांअभावी जगावे लागत आहे. माहुल येथील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने करीत प्रशासनाला याची जाणीवही करून दिली आहे. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. पूर्व उपनगरातील डम्पिंगलाही सातत्याने आगी लागत असून, आगीमुळे येथील परिसरात चार ते पाच पाच दिवस धुराचे साम्राज्य राहते. मानखुर्द आणि गोवंडीमध्ये दाटीवाटीने वसलेल्या लोकवस्तीमध्ये यापूर्वी कित्येकवेळा आगी लागल्या आहेत. परिणामी, मुंबईसारखी मायानगरी सातत्याने ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. बीपीसीएलसारख्या कंपन्यांत आपत्कालीन घटनांवर मात करण्यासाठी यंत्रणा कायम सज्ज असल्या तरीदेखील येथील दुर्घटनांचा संबंध हा इतिहासात झालेल्या चुकांशी आहे. चुकीच्या पद्धतीने वसवलेली वस्ती, त्यामुळे येथील मूलभूत सेवासुविधांवर लोकसंख्येचा येणारा ताण, डम्पिंगची अपुरी क्षमता यांसारख्या अनेक समस्यांनी आधीच डोके वर काढले आहे. त्यात पुन्हा अशा आगीच्या घटना घडतात. हे दुहेरी संकट येत्या काळात अधिकच गडद होत जाईल. याचा विचार आगामी विकास आराखड्यात झाला तरच मुंबईकरांना सुरक्षित आयुष्य जगता येईल.

टॅग्स :fireआगBPCL Mumbai Fireबीपीसीएल आग