शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवातून एकतेचे, दातृत्वाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:39 IST

मिलिंद कुलकर्णी गणेशोत्सवाची सांगतेकडे वाटचाल सुरु आहे. यंदाच्या उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे मानवी जीवनाचा आविभाज्य अंग असलेल्या सुख-दु:खाच्या भावनेचा संमिश्र ...

मिलिंद कुलकर्णीगणेशोत्सवाची सांगतेकडे वाटचाल सुरु आहे. यंदाच्या उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे मानवी जीवनाचा आविभाज्य अंग असलेल्या सुख-दु:खाच्या भावनेचा संमिश्र कल्लोळ तेथे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली या भागात महापूर आल्याने मदतीचे हात तिकडे वळले आहेत. गणेशोत्सवाचे औचित्य साधून गणेश मंडळांनी, स्वयंसेवी संस्थांनी वर्गणी, देणगीचा काही भाग हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उत्स्फूर्तपणे देऊ केला. काही मंडळांनी आरासीपुढे देणगीपेटी ठेवून हा निधी पूरग्रस्तांना देणार असल्याचे आवर्जून नमूद केले. काही मंडळांनी यंदा आरास, मिरवणुका, ढोल-ताशे, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद यावरील खर्च टाळून तेवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ केली. संकटात सापडलेल्या आपल्याच भावंडांसाठी घेतलेल्या या पुढाकारातून समाजाच्या एकता आणि दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या स्तुत्य उपक्रमाविषयी या मंडळांचे मन:पूर्वक कौतुक करायला हवे.भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने, इस्त्रोने चांद्रयान पाठविल्याच्या सुखद घटनेचा समाज मनावर मोठा परिणाम दिसून आला. गणेशोत्सवाच्या आरासींवरदेखील त्याचा व्यापक प्रभाव उमटला. घरगुती मंडळांपासून तर सार्वजनिक मंडळांपर्यंत बहुसंख्य मंडळांनी चांद्रयानाशी निगडीत देखावे साकारले आहे. धर्म आणि विज्ञानाचा हा अनोखा संगम या कृतीतून दिसून आला. लोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपती देवता रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक उत्सवात आणण्याचे मूळ कारण हेच आहे. एकता, संघटनाच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक परिस्थितीत आवश्यक असलेल्या विचारांविषयी मंथन व्हावे. विचारविनिमयातून मार्ग शोधावा आणि समाजाने त्या दिशेने वाटचाल करावी. इस्त्रो आणि चांद्रयानाविषयी एवढी आत्मियता, गौरव प्रथमच दिसून आला. ही चांगली सुरुवात आहे.केवळ समाजाने विज्ञानवादी व्हावे, असा उपदेश करुन काही होत नाही. समाजातील सामान्य घटकाला तो विचार आपलासा वाटेल तेव्हा तो खºया अर्थाने स्विकारला जात असतो. गणेशोत्सवात चांद्रयानाचा देखावा साकारुन विज्ञानाविषयीची समाजाची आत्मियता प्रकट होते. भावी पिढींनी संशोधक होण्याची प्रेरणा अशा गोष्टींमधून मिळू शकते. सार्वजनिक उत्सवातून हे घडतेय, याचे मोठे समाधान वाटते.विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा उत्सव येत असल्याने राजकीय मंडळींचे मोठे अर्थसहाय्य यंदा मंडळांना लाभले. राजकीय मंडळी तसे हात मोकळे सोडत नाहीत, सरकारी तिजोरीतून पुण्यकर्म करण्याकडे त्यांचा कल अधिक असतो, असा सार्वत्रिक आरोप असला तरी निवडणुकीच्या तोंडावर मंडळांना आणि त्यातील उत्साही तरुण कार्यकर्त्यांना नाराज करण्याचे धाडस कोणत्याही राजकीय नेत्याने केले नसावे. त्यामुळे यंदाचा उत्सवाचा थाट हा दिमाखदार असा आहे. स्वागत मिरवणुका प्रचंड जल्लोष आणि उत्साहात झाल्या. त्याच प्रमाणे विसर्जन मिरवणुकादेखील होतील. पण हे सगळे करताना मंडळांनी सामाजिक भान बाळगले आहे, हे नमूद करायला हवे. जळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने सीमेवरील जवानांच्या स्वास्थ्यासाठी महामृत्यूंजय जाप करण्याचा मोठा कार्यक्रम घेतला. चंदू चव्हाण याच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. ३७० वे कलम वगळण्याचा आनंद काही मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे अभिनंदन करणारे देखावेदेखील काही मंडळांनी साकारले. राजकीय, राष्टÑीय देखाव्यांची मोठी परंपरा या शतकोत्तरी उत्सवाला आहे. ब्रिटिश राजवट, आणीबाणीच्या काळात कल्पक देखाव्यांमधून नेमका संदेश जनतेपर्यंत पोहोचविला जात होता. बांगलादेश निर्मिती, कारगिल विजय, अंतराळवीर राकेश शर्मा या घटनादेखील देखाव्यांमधून साकारल्या होत्या.आपला गणेशोत्सव त्याच वाटेने जात आहे, याचे समाधान समाजातील सर्वच घटकांना आहे, हे विशेषत्वाने नमूद करायला हवे. यासाठी नियोजन, अंमलबजावणी आणि संकल्पना राबविणाºया सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करायला हवे.

टॅग्स :ganpatiगणपतीJalgaonजळगाव