शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

'मनोहारी' गोव्यातलं राजकारण ठरतंय भाजपासाठी ग्रहण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 17:49 IST

विश्वजित राणे यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि सध्याच्या परिस्थितीत त्यांना तेथपर्यंत जायला अडथळे आहेत, हे माहीत असल्याने ते बेचैन आहेत.

>> राजू नायक

कंड्या पिकविण्यात भाजपाचा हात कोणी धरू शकत नाही. समाज माध्यमांमधून कॉँग्रेस नेत्यांना खजील व्हावे लागेल असे बनावट, धादांत खोटे संदेश व ट्रॉलिंग भाजपाच्या प्रचार ब्रिगेडने सतत चालविले. गेली काही वर्षे अशा पद्धतीची बदनामीकारक मोहीम चालविल्यानंतर आता खजील होण्याची पाळी भाजपावर आली आहे. बुधवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची व्हायरल झालेली ध्वनिफित अशाच पद्धतीची आहे आणि तिने भाजपाची झोप उडविली. भाजपा मंत्री नीलेश काब्राल यांना संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन तसा जाहीर कबुलीजबाब द्यावा लागला. वास्तविक अशा ध्वनिफिती बनाव असतात की राणे प्रत्यक्षात बोलले होते याच्या खोलात सामान्य माणसे जात नसतात. विश्वजित राणे यांनी आपण तसे बोलल्याचा इन्कार केलेला असला तरी ज्यांनी राणे यांचा आवाज ऐकला आहे, ते गृहीतच धरून चालले आहेत की राणे तसे बेछूट बोलले आहेत. राणेंची एकूण राजनीती पाहाता ते स्वाभाविकही आहे. कारण, विश्वजित राणे यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि सध्याच्या परिस्थितीत त्यांना तेथपर्यंत जायला अडथळे आहेत, हे माहीत असल्याने ते बेचैन आहेत. अस्वस्थ आहेत आणि वैफल्यग्रस्तही बनले आहेत. 

ज्या माणसांशी ते हे बोलले ते एका इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. आता राणे जर त्या पत्रकाराशी विश्वासाने बोलले असतील तर त्याने आपल्या वृत्तपत्रात तसा गौप्यस्फोट न करता काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत ते कसे पोहोचले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण, येथे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होतो. नेतेमंडळी विश्वासाने काहीवेळा समाजहिताच्या गोष्टी पत्रकारांबरोबर शेअर करतात. पत्रकाराने त्यातील काही भाग नेत्याचे नाव गुप्त राखून वापरावा असा संकेत आहे. काहीवेळा पत्रकार या संकेताचा पडदा दूर सारून आता 'स्टिंग ऑपरेशनट करू लागले असून नेत्यांची दांभिकता किंवा खोटारडेपणा उघडा पाडणे, त्यांचा उद्देश असतो. पत्रकार किंवा प्रसिद्धी माध्यमांचे अंतिम ध्येय सत्य आणि परखड मत हेच असेल तर भल्याबुऱ्या मार्गाने सत्य शोधून काढणे हे पत्रकाराचे कामच आहे, असे मानले जाऊ लागले असून पत्रकार काहीवेळा अनैतिकच नव्हे तर बेकायदेशीरतेचाही मार्ग चोखाळू लागले आहेत. त्यामुळे पत्रकार आणि राजकीय नेत्यांमधील संबंधात वितुष्ट येऊ लागले आहे. 

विश्वजित राणे यांच्या वक्तव्याचा विचार करता ते तसे बोलले असतील तर ते निर्विवादपणे पक्षविरोधी कृत्य ठरते. मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळ बैठकीत तसे बोलले होते का, याबाबत पुरावा मिळणे कठीण असले तरी विरोधकांच्या हातात मोदी ज्याचे सारथ्य करतात त्या सरकारविरोधातील दारूगोळा पोहोचविणे हे भाजपासाठी निश्चितच भयंकर असे पक्षविरोधी कृत्य ठरणार आहे. विश्वजित राणे कधीकधी बोलताना बहकतात. उदाहरण द्यायचे झाल्यास यापूर्वी त्यांच्या तोंडून अचानकपणे पर्रीकरांना कर्करोग झाल्याचे जाहीर झाले होते. त्या वेळी पक्षाने त्यांना सांभाळून घेतले आणि त्या प्रकरणाचा फारसा बाऊही कोणी केला नाही. परंतु, विश्वजित राणे यांची कथित ध्वनिफित व्हायरल झाल्यानंतर ज्या प्रकारचे वातावरण पक्षात निर्माण झाले, ते नेत्यांमध्ये प्रचंड खळबळ माजविणारे आणि ज्येष्ठ नेत्यांचीही तारांबळ उडविणारेच होते. स्वत: पर्रीकर यांना खुलासा करावा लागला आणि कदाचित त्यांना केंद्रीय नेत्यांशी बोलून त्यांची समजूतही काढावी लागणे शक्य आहे. पर्रीकरांसारख्या राष्ट्रव्यापी प्रतिमा असलेल्या नेत्यासाठी अशा पद्धतीने खजील व्हायला लागणे आणि तेही एका कनिष्ठ मंत्र्याच्या बेलगाम वक्तव्यामुळे निश्चितच अशोभनीय आहे. वास्तविक भाजपा नेत्यांना अशा प्रकारच्या बेमुर्वतखोर, फटकळ बोलण्याची सवय नाही. दुर्दैवाने भाजपाने सत्तेवर येण्यासाठी ज्या प्रकारचे राजकारण चालविले आहे, त्याचीच ही फळे आहेत. लक्षात घेतले पाहिजे की सत्तेवर येण्यासाठी कोणालाही दरवाजे खुले केल्यानंतर अनेक महत्त्वाकांक्षी नेत्यांना या 'इतरांहून वेगळ्या' पक्षात प्रवेश मिळाला. या नेत्यांना संयम नाही आणि पक्षाच्या विचारधारेशीही संबंध नाही. पर्रीकरांनीही एकेकाळी अडवाणींसारख्या बुजुर्ग नेत्याला 'बुरशी आलेले लोणचे' म्हटले व नरेंद्र मोदी हे नुकतेच मुख्यमंत्री झाल्याने त्यांना गोध्रा प्रकरण हाताळणे जमले नाही, असे उद्गार काढून राष्ट्रीय वाद ओढवून घेतला होता. पर्रीकर आपल्या बोलण्यातूनही अनेकदा आक्रमक होतात व भावनेच्या भरात काहीबाही बोलून जातात; परंतु पर्रीकरांचा साधेपणा आणि कार्यक्षमता यापुढे अशा अघळपघळ विधानांना फारसे महत्त्व लाभत नाही. दुर्दैवाने राफेलसंदर्भात विश्वजित राणे यांनी पर्रीकरांचा हवाला देऊन जी विधाने केली त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांना पुष्टी मिळाली आणि मोदी सरकार आणखीनच अडचणीत आले. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीही जबाबदारीने आणि संयतपणे वागणे पक्षश्रेष्ठींनी गृहीत धरले तर त्यांची चूक नाही. कारण, या गदारोळात नकारात्मक गोष्टी सहज खपून जात असतात व आधीच जेरीस आलेली भाजपा आणखी गोत्यात येऊ शकते!

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा