शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीच्या संघाने इतिहास घडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:38 IST

नऊ आठवड्यांच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलियन दौऱ्यात विराट कोहलीच्या संघाने टी२०, कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला.

- शरद कद्रेकरनऊ आठवड्यांच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलियन दौऱ्यात विराट कोहलीच्या संघाने टी२०, कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. ७१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत भारताने आॅस्ट्रेलियाला २-१ असे हरवून आॅस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकताना बॉर्डर-गावसकर चषक आपल्याकडेच राखला. अमरनाथ, पतौडी, बेदी, गावसकर, कपिल, अझरुद्दीन, तेंडुलकर, गांगुली, धोनी या कर्णधारांना न जमलेली किमया विराट कोहली-रवी शास्त्री यांच्या संघाने करून दाखविली. याआधी ११ आॅस्ट्रेलियन दौºयांत भारताला मालिका विजय मिळविता आला नव्हता. परंतु कोहलीच्या संघाने आॅस्ट्रेलियन दौºयात मालिका २-१ अशी जिंकताना कसोटी क्रिकेटमधील भारताचा १५० वा विजयही दिमाखात साजरा केला.१२५८ चेंडूत ५२१ धावा करणारा ‘रॉक आॅफ जिब्राल्टर’ चेतेश्वर पुजारा, १७ च्या सरासरीने २१ मोहरे टिपणारा जसप्रीत बुमराह, यष्टीमागे तसेच यष्टीपुढेही (२० झेल आणि ३५० धावा) आपली छाप पाडणारा २१ वर्षीय रिषभ पंत या त्रिकूटाने भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली. आधीच्या भारतीय संघातही तारे, सितारे होते. परंतु संघ सांघिक कामगिरीत कमी पडायचा. मालिका गमावल्यावरही ‘ताºयांच्या’ कामगिरीची चर्चा व्हायची, यात भारतीय संघ मात्र बेदखलच! कोहली-शास्त्री या जोडीला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड दौºयात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर मात्र कोहली-शास्त्री जोडीला यश लाभले. आॅस्ट्रेलियातील कुकाबुरा चेंडू भारताच्या पथ्यावर पडला. ‘ड्यूक’प्रमाणे कुकाबुरा चेंडू फारसा स्विंग होत नाही. बुमराह, शमी, इशांत शर्मा या त्रिकूटाने स्टार्क, हेझलवुड, कमिन्स या आॅस्ट्रेलियन त्रिकूटावर कुरघोडी करत सरस कामगिरी बजावली.कोहलीच्या नेतृत्वाची खासियत म्हणजे संघातील बदल. बुमराह (द. आफ्रिका), हनुमा विहारी, रिषभ पंत (इंग्लंड), मयांक अगरवाल (आॅस्ट्रेलिया) या चौघांना कसोटीत पदार्पणाची संधी लाभली. त्यापैकी बुमराहने लक्षवेधी कामगिरी केली. पंतनेही कसोटीत आपली छाप पाडली. विहारी, अगरवालकडूनही उमेद बाळगता येईल.विश्वचषक (१९८३), चॅम्पियन आॅफ चॅम्पियन (१९८५), वर्ल्ड टी२० (२००७), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) या झटपट क्रिकेटच्या स्पर्धेत जेतेपद पटकाविण्याची किमया कपिल, गावसकर, धोनीच्या भारतीय संघाने केली. परंतु कसोटी क्रिकेटच्या छोट्याशा दुनियेत (१२ देश) भारतीय संघांना परदेशतील कसोटी मालिका जिंकताना खडतर प्रयत्न करावे लागतात. द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया या देशात भारताचे कसोटी विजय माफकच. द. आफ्रिकेत तर भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.कोहलीच्या संघाने आॅस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी साधून आॅस्ट्रेलियन दौºयाची यशस्वी सांगता केली. भारताच्या या मालिकेचा ‘सरदार’ ठरला महेंद्रसिंग धोनी. विश्वचषक स्पर्धा ४ महिन्यांवर आली असताना ‘धोनी हटाव’ची नारेबाजी सुरू होती. झारखंडच्या या भूमिपुत्राने आॅस्ट्रेलियातील मालिकेत सलग ३ अर्धशतके झळकावून ‘मालिकावीराचा’ किताब पटकाविला. धोनीच्या या कामगिरीवर प्रशिक्षक रवी शास्त्री अत्यंत खूश झाले. धोनीसारखा खेळाडू ३०-४० वर्षात एखादाच घडतो. त्याची जागा भरून काढणे मुश्कीलच. रवी शास्त्रीच्या या उद्गारामुळे तूर्तास तरी धोनीचे भारतीय संघातील स्थान अढळ वाटते.

( ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली