शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

विराट कोहलीच्या संघाने इतिहास घडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:38 IST

नऊ आठवड्यांच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलियन दौऱ्यात विराट कोहलीच्या संघाने टी२०, कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला.

- शरद कद्रेकरनऊ आठवड्यांच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलियन दौऱ्यात विराट कोहलीच्या संघाने टी२०, कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. ७१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत भारताने आॅस्ट्रेलियाला २-१ असे हरवून आॅस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकताना बॉर्डर-गावसकर चषक आपल्याकडेच राखला. अमरनाथ, पतौडी, बेदी, गावसकर, कपिल, अझरुद्दीन, तेंडुलकर, गांगुली, धोनी या कर्णधारांना न जमलेली किमया विराट कोहली-रवी शास्त्री यांच्या संघाने करून दाखविली. याआधी ११ आॅस्ट्रेलियन दौºयांत भारताला मालिका विजय मिळविता आला नव्हता. परंतु कोहलीच्या संघाने आॅस्ट्रेलियन दौºयात मालिका २-१ अशी जिंकताना कसोटी क्रिकेटमधील भारताचा १५० वा विजयही दिमाखात साजरा केला.१२५८ चेंडूत ५२१ धावा करणारा ‘रॉक आॅफ जिब्राल्टर’ चेतेश्वर पुजारा, १७ च्या सरासरीने २१ मोहरे टिपणारा जसप्रीत बुमराह, यष्टीमागे तसेच यष्टीपुढेही (२० झेल आणि ३५० धावा) आपली छाप पाडणारा २१ वर्षीय रिषभ पंत या त्रिकूटाने भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली. आधीच्या भारतीय संघातही तारे, सितारे होते. परंतु संघ सांघिक कामगिरीत कमी पडायचा. मालिका गमावल्यावरही ‘ताºयांच्या’ कामगिरीची चर्चा व्हायची, यात भारतीय संघ मात्र बेदखलच! कोहली-शास्त्री या जोडीला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड दौºयात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर मात्र कोहली-शास्त्री जोडीला यश लाभले. आॅस्ट्रेलियातील कुकाबुरा चेंडू भारताच्या पथ्यावर पडला. ‘ड्यूक’प्रमाणे कुकाबुरा चेंडू फारसा स्विंग होत नाही. बुमराह, शमी, इशांत शर्मा या त्रिकूटाने स्टार्क, हेझलवुड, कमिन्स या आॅस्ट्रेलियन त्रिकूटावर कुरघोडी करत सरस कामगिरी बजावली.कोहलीच्या नेतृत्वाची खासियत म्हणजे संघातील बदल. बुमराह (द. आफ्रिका), हनुमा विहारी, रिषभ पंत (इंग्लंड), मयांक अगरवाल (आॅस्ट्रेलिया) या चौघांना कसोटीत पदार्पणाची संधी लाभली. त्यापैकी बुमराहने लक्षवेधी कामगिरी केली. पंतनेही कसोटीत आपली छाप पाडली. विहारी, अगरवालकडूनही उमेद बाळगता येईल.विश्वचषक (१९८३), चॅम्पियन आॅफ चॅम्पियन (१९८५), वर्ल्ड टी२० (२००७), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) या झटपट क्रिकेटच्या स्पर्धेत जेतेपद पटकाविण्याची किमया कपिल, गावसकर, धोनीच्या भारतीय संघाने केली. परंतु कसोटी क्रिकेटच्या छोट्याशा दुनियेत (१२ देश) भारतीय संघांना परदेशतील कसोटी मालिका जिंकताना खडतर प्रयत्न करावे लागतात. द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया या देशात भारताचे कसोटी विजय माफकच. द. आफ्रिकेत तर भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.कोहलीच्या संघाने आॅस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी साधून आॅस्ट्रेलियन दौºयाची यशस्वी सांगता केली. भारताच्या या मालिकेचा ‘सरदार’ ठरला महेंद्रसिंग धोनी. विश्वचषक स्पर्धा ४ महिन्यांवर आली असताना ‘धोनी हटाव’ची नारेबाजी सुरू होती. झारखंडच्या या भूमिपुत्राने आॅस्ट्रेलियातील मालिकेत सलग ३ अर्धशतके झळकावून ‘मालिकावीराचा’ किताब पटकाविला. धोनीच्या या कामगिरीवर प्रशिक्षक रवी शास्त्री अत्यंत खूश झाले. धोनीसारखा खेळाडू ३०-४० वर्षात एखादाच घडतो. त्याची जागा भरून काढणे मुश्कीलच. रवी शास्त्रीच्या या उद्गारामुळे तूर्तास तरी धोनीचे भारतीय संघातील स्थान अढळ वाटते.

( ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली