शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीच्या संघाने इतिहास घडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:38 IST

नऊ आठवड्यांच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलियन दौऱ्यात विराट कोहलीच्या संघाने टी२०, कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला.

- शरद कद्रेकरनऊ आठवड्यांच्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलियन दौऱ्यात विराट कोहलीच्या संघाने टी२०, कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. ७१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत भारताने आॅस्ट्रेलियाला २-१ असे हरवून आॅस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकताना बॉर्डर-गावसकर चषक आपल्याकडेच राखला. अमरनाथ, पतौडी, बेदी, गावसकर, कपिल, अझरुद्दीन, तेंडुलकर, गांगुली, धोनी या कर्णधारांना न जमलेली किमया विराट कोहली-रवी शास्त्री यांच्या संघाने करून दाखविली. याआधी ११ आॅस्ट्रेलियन दौºयांत भारताला मालिका विजय मिळविता आला नव्हता. परंतु कोहलीच्या संघाने आॅस्ट्रेलियन दौºयात मालिका २-१ अशी जिंकताना कसोटी क्रिकेटमधील भारताचा १५० वा विजयही दिमाखात साजरा केला.१२५८ चेंडूत ५२१ धावा करणारा ‘रॉक आॅफ जिब्राल्टर’ चेतेश्वर पुजारा, १७ च्या सरासरीने २१ मोहरे टिपणारा जसप्रीत बुमराह, यष्टीमागे तसेच यष्टीपुढेही (२० झेल आणि ३५० धावा) आपली छाप पाडणारा २१ वर्षीय रिषभ पंत या त्रिकूटाने भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली. आधीच्या भारतीय संघातही तारे, सितारे होते. परंतु संघ सांघिक कामगिरीत कमी पडायचा. मालिका गमावल्यावरही ‘ताºयांच्या’ कामगिरीची चर्चा व्हायची, यात भारतीय संघ मात्र बेदखलच! कोहली-शास्त्री या जोडीला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड दौºयात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर मात्र कोहली-शास्त्री जोडीला यश लाभले. आॅस्ट्रेलियातील कुकाबुरा चेंडू भारताच्या पथ्यावर पडला. ‘ड्यूक’प्रमाणे कुकाबुरा चेंडू फारसा स्विंग होत नाही. बुमराह, शमी, इशांत शर्मा या त्रिकूटाने स्टार्क, हेझलवुड, कमिन्स या आॅस्ट्रेलियन त्रिकूटावर कुरघोडी करत सरस कामगिरी बजावली.कोहलीच्या नेतृत्वाची खासियत म्हणजे संघातील बदल. बुमराह (द. आफ्रिका), हनुमा विहारी, रिषभ पंत (इंग्लंड), मयांक अगरवाल (आॅस्ट्रेलिया) या चौघांना कसोटीत पदार्पणाची संधी लाभली. त्यापैकी बुमराहने लक्षवेधी कामगिरी केली. पंतनेही कसोटीत आपली छाप पाडली. विहारी, अगरवालकडूनही उमेद बाळगता येईल.विश्वचषक (१९८३), चॅम्पियन आॅफ चॅम्पियन (१९८५), वर्ल्ड टी२० (२००७), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) या झटपट क्रिकेटच्या स्पर्धेत जेतेपद पटकाविण्याची किमया कपिल, गावसकर, धोनीच्या भारतीय संघाने केली. परंतु कसोटी क्रिकेटच्या छोट्याशा दुनियेत (१२ देश) भारतीय संघांना परदेशतील कसोटी मालिका जिंकताना खडतर प्रयत्न करावे लागतात. द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया या देशात भारताचे कसोटी विजय माफकच. द. आफ्रिकेत तर भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.कोहलीच्या संघाने आॅस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी साधून आॅस्ट्रेलियन दौºयाची यशस्वी सांगता केली. भारताच्या या मालिकेचा ‘सरदार’ ठरला महेंद्रसिंग धोनी. विश्वचषक स्पर्धा ४ महिन्यांवर आली असताना ‘धोनी हटाव’ची नारेबाजी सुरू होती. झारखंडच्या या भूमिपुत्राने आॅस्ट्रेलियातील मालिकेत सलग ३ अर्धशतके झळकावून ‘मालिकावीराचा’ किताब पटकाविला. धोनीच्या या कामगिरीवर प्रशिक्षक रवी शास्त्री अत्यंत खूश झाले. धोनीसारखा खेळाडू ३०-४० वर्षात एखादाच घडतो. त्याची जागा भरून काढणे मुश्कीलच. रवी शास्त्रीच्या या उद्गारामुळे तूर्तास तरी धोनीचे भारतीय संघातील स्थान अढळ वाटते.

( ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली