शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘विराट’ सातत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 04:29 IST

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते. सातत्य म्हणजे काय आणि ते कशाप्रकारे अमलात आणावे याचा धडाच कोहलीने सर्व खेळाडूंना दिला आहे. २०१६ पूर्वी कोहलीच्या खात्यामध्ये एकही कसोटी द्विशतकाची नोंद नव्हती. परंतु, त्यानंतर त्याने सलग चार मालिकांमध्ये प्रत्येकी एक कसोटी द्विशतक ठोकण्याचा प्रयत्न केला. तसेच, नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आणखी एक द्विशतक झळकावले. सध्या कोहलीचा सुरू असलेला धडाका पाहता त्याला थांबवणे कोणालाच शक्य होणार नाही, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्याचे खेळाप्रति असलेले प्रेम आणि जिद्द वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळेच की काय व्यस्त कार्यक्रमामुळे होत असलेल्या थकव्यानंतरही त्याच्या बॅटमधील धावांचा पाऊस काही थांबत नाही. काही दिवसांपूर्वीच कोहलीने सततच्या क्रिकेट वेळापत्रकामुळे शरीरावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे कारण देत ‘मी रोबोट नाही’ असे सांगत विश्रांती मिळण्याची मागणी केली. कोहलीच्या मागणीमध्ये काहीच चुकीचे नव्हते. पण एकूणच त्याची सध्याची कामगिरी पाहता कोहली खरंच थकलेला आहे का, असा दुसरा प्रश्नही पडतो. कोहलीने राखलेली तंदुरुस्ती जबरदस्त आहे. त्यामुळेच त्याच्या खेळीपेक्षा तंदुरुस्ती कशी राखली गेली पाहिजे, हे जरी इतर खेळाडूंनी त्याच्याकडून शिकले तरी खूप झाले. विक्रमांमागून विक्र म रचताना कोहलीने स्वत:चे स्थान दिग्गजांच्या पंक्तीमध्ये सहजपणे नेले. अर्थात यामागे कोहलीच्या अफाट मेहनतीला विसरता कामा नये. तंदुरुस्तीचा विचार करताना, कोहलीने विश्रांती मिळण्याबाबत केलेले वक्तव्य गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. आज, इतर खेळाडूंच्या तुलनेत भारतीय क्रि केटपटू वर्षभर सातत्याने खेळत असतात. दखल घेण्याची बाब म्हणजे क्रिकेट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात प्रमुख खेळाडू कोहलीच असतो. त्यामुळेच आगामी विदेशी दौºयांकडे पाहता कोहलीला विश्रांती मिळणे हे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण, कितीही गुणवत्ता ठासून भरलेली असली, तरी शेवटी कोहली हादेखील माणूसच आहे. त्यालाही दुखापती होतात. शिवाय कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये इतर खेळाडूंची कामगिरी कशी होते हेही बीसीसीआयला पाहता येईल. कारण, पुढील विश्वचषकासाठी तयारी करताना आपल्याला सर्वच बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीCricketक्रिकेटIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ