शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘विराट’ सातत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 04:29 IST

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते. सातत्य म्हणजे काय आणि ते कशाप्रकारे अमलात आणावे याचा धडाच कोहलीने सर्व खेळाडूंना दिला आहे. २०१६ पूर्वी कोहलीच्या खात्यामध्ये एकही कसोटी द्विशतकाची नोंद नव्हती. परंतु, त्यानंतर त्याने सलग चार मालिकांमध्ये प्रत्येकी एक कसोटी द्विशतक ठोकण्याचा प्रयत्न केला. तसेच, नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आणखी एक द्विशतक झळकावले. सध्या कोहलीचा सुरू असलेला धडाका पाहता त्याला थांबवणे कोणालाच शक्य होणार नाही, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्याचे खेळाप्रति असलेले प्रेम आणि जिद्द वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळेच की काय व्यस्त कार्यक्रमामुळे होत असलेल्या थकव्यानंतरही त्याच्या बॅटमधील धावांचा पाऊस काही थांबत नाही. काही दिवसांपूर्वीच कोहलीने सततच्या क्रिकेट वेळापत्रकामुळे शरीरावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे कारण देत ‘मी रोबोट नाही’ असे सांगत विश्रांती मिळण्याची मागणी केली. कोहलीच्या मागणीमध्ये काहीच चुकीचे नव्हते. पण एकूणच त्याची सध्याची कामगिरी पाहता कोहली खरंच थकलेला आहे का, असा दुसरा प्रश्नही पडतो. कोहलीने राखलेली तंदुरुस्ती जबरदस्त आहे. त्यामुळेच त्याच्या खेळीपेक्षा तंदुरुस्ती कशी राखली गेली पाहिजे, हे जरी इतर खेळाडूंनी त्याच्याकडून शिकले तरी खूप झाले. विक्रमांमागून विक्र म रचताना कोहलीने स्वत:चे स्थान दिग्गजांच्या पंक्तीमध्ये सहजपणे नेले. अर्थात यामागे कोहलीच्या अफाट मेहनतीला विसरता कामा नये. तंदुरुस्तीचा विचार करताना, कोहलीने विश्रांती मिळण्याबाबत केलेले वक्तव्य गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. आज, इतर खेळाडूंच्या तुलनेत भारतीय क्रि केटपटू वर्षभर सातत्याने खेळत असतात. दखल घेण्याची बाब म्हणजे क्रिकेट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात प्रमुख खेळाडू कोहलीच असतो. त्यामुळेच आगामी विदेशी दौºयांकडे पाहता कोहलीला विश्रांती मिळणे हे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण, कितीही गुणवत्ता ठासून भरलेली असली, तरी शेवटी कोहली हादेखील माणूसच आहे. त्यालाही दुखापती होतात. शिवाय कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये इतर खेळाडूंची कामगिरी कशी होते हेही बीसीसीआयला पाहता येईल. कारण, पुढील विश्वचषकासाठी तयारी करताना आपल्याला सर्वच बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीCricketक्रिकेटIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ