शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

विराटने आगे आकर खेलना था यार!

By यदू जोशी | Updated: May 29, 2018 06:57 IST

राजकारणीअन् एसटी बसमध्ये काहीही फरक नाही. राज्यातील शेवटच्या माणसाला घेऊन चालते ती एसटीच पण बंदच्या काळात फुटते; तीही एसटीच.

राजकारणीअन् एसटी बसमध्ये काहीही फरक नाही. राज्यातील शेवटच्या माणसाला घेऊन चालते ती एसटीच पण बंदच्या काळात फुटते; तीही एसटीच. सरपंचांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांची परिस्थिती तीच. अंथरुणातून उठत नाही तर जी गाºहाणी सुरू होतात ती पुन्हा अंथरुणात जाईपर्यंत... (नेत्यांच्या बायका त्यांना काय म्हणत असतील कोण जाणे!) आडव्याउभ्याने फाडायची वेळ आली की लोकांना परत राजकारणीच दिसतात. नेतेही बिच्चारे पुढच्या पंचवार्षिकसाठी काय काय बोल सहन करत असतात. मोदींनी एक निर्णय घेतला रे घेतला की त्याचे विरोध-समर्थन करणारे सोशल मीडियातून फिरू लागतात. आपल्या देशात सल्ल्यांची वर्षातील ३६५ दिवस दुकाने थाटून बसणाऱ्यांची कमतरता नाही. सचिन असो की विराट कुणी आऊट झाले की यांचं दुकान लगेच सुरू, ‘अरे यार! उसने सामने आकर खेलना चाहीए था.’ आता ताशी दीडशे किलोमीटरच्या स्पीडने बॉल कानफटापासून जाताना तुम्ही स्वत: खेळून बघितलाय का कधी? पण नाही सल्ला देण्याचं त्यांचं पेटेंट आहे नं भौ! घरासमोरची फरशी लावण्यापासून देश विकासाच्या बड्या योजनांपर्यंत सगळं काही नेत्यांनीच कसं करावं यासाठीचा सल्लारूपी माल त्यांच्याकडे तयार असतो. घरचा महिन्याकाठचा हिशेब नीट सांभाळता येणार नाही पण मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीचा हिशेब विचारायला चटकन तयार. बायकोनं चार वस्तू बाजारातून आणायला सांगितल्या तर त्यातलीही एक विसरतील पण तीन वर्षांपूर्वी कोडाइकॅनलमध्ये परकीय गुंतवणुकीसंदर्भातील एका सेमिनारमध्ये बोलताना मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण मात्र बरोब्बर ठेवतील. नियमानुसार असलेल्या वर्षभरातील एकूणएक सुट्या घेतील पण वर्षभरात एकही दिवस सुटी न घेणाºया मोदींना प्रत्येक गोष्टीसाठी जाब विचारतील. घरातील निवडणुकीत बायकोचंही मत मिळणार नाही, असे लोक कर्नाटकात कुणाचं काय चुकलं हे सांगत सुटतील. देशाची काँग्रेस सांभाळणाºया राहुल गांधींची हालत तर फारच खराब... निवडणुकीत साºया गावात ज्याला सगळ्यात कमी मतं पडली असा माणूसही राहुलबाबांची चेष्टा करू शकतो अन् काँग्रेस कशी चालवायची हेही फुशारकीनं सांगतो. गांधी-आंबेडकर-सावरकर यांच्याबाबत मुक्तचिंतन करणाºयांनी त्यांचे साहित्य वा जीवनप्रवास किती अभ्यासलंय हे विचारण्याची सोय नसते. हातची कामं सोडून सल्ले वाटणं सुरू असतं.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना ‘बच्चा’ म्हणत त्यांची खेचली होती. त्याला सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्री जे काही म्हणाले ते जागोजागी तयार झालेल्या सल्लागारांनी लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातील ऐंशी टक्के सामाजिक, राजकीय प्रश्न सुटू शकतील. मुख्यमंत्री म्हणाले होते, रामदासभाई! तुमचा पगार किती अन् तुम्ही बोलता किती...? आता मुख्यमंत्री-रामदासभार्इंचा वाद सोडा पण आपल्या पगाराइतकंच (म्हणजे आपल्या लायकीइतकं) बोलण्याचं पथ्य सगळ्यांनी पाळलं तर पुरोगामी महाराष्ट्राचं भलंच होईल पण वास्तविकता ही आहे की जो उठला तो आपल्या पगारापेक्षा जास्तच बोलत सुटतो. पगार (कुवत) चपराश्याचा अन् बोलणं आयएएसचं ही खरी अडचण आहे. सल्ल्याचं बोट धरून मोकाट फिरणाºयांनी समजूतदारपणाचं बोट धरलं तर किती बरं होईल?- यदु जोशी