शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

हिंसाचारी : डावे आणि उजवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:03 IST

कोणत्याही वादाने कडवे वळण घेतले की तो हिंस्र होतो. तसे होणाऱ्यात माओवादी असतात आणि हिंदुत्ववादीही असतात. मुंबई, पुणे व देशातील अनेक शहरात माओवादाचे जे ‘विचारवंत’ आणि हिंदुत्ववादाचे ‘शस्त्रवंत’ पकडले गेले त्यांची नावे व त्यांच्याजवळचे साहित्य व शस्त्रास्त्रे पाहिली की या देशाला एकाच वेळी डाव्या व उजव्या अशा दोन्ही दहशतवाद्यांपासून धोका ...

कोणत्याही वादाने कडवे वळण घेतले की तो हिंस्र होतो. तसे होणाऱ्यात माओवादी असतात आणि हिंदुत्ववादीही असतात. मुंबई, पुणे व देशातील अनेक शहरात माओवादाचे जे ‘विचारवंत’ आणि हिंदुत्ववादाचे ‘शस्त्रवंत’ पकडले गेले त्यांची नावे व त्यांच्याजवळचे साहित्य व शस्त्रास्त्रे पाहिली की या देशाला एकाच वेळी डाव्या व उजव्या अशा दोन्ही दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे कळून चुकले. डाव्या दहशतीचे हस्तक अरण्यात व आदिवासींच्या क्षेत्रात असतात तर त्यांचे विचारवंत शहरातील सभ्य वस्त्यात किंवा चांगल्या आलिशान हॉटेलात वास्तव्याला असतात. उजव्या दहशतवाद्यांना तसे दडून राहण्याचे कारण नसते कारण त्यांचे आश्रयदाते त्यांना समाजात सर्वत्रच सापडतात. माओवाद्यांचे जसे सौम्य व कडवे असे दोन गट आहेत तसेच ते उजव्या दहशतवाद्यांचेही आहेत. कडव्यांनी शस्त्राचार करायचा आणि सौम्यांनी त्यांचे वैचारिक समर्थन करायचे अशी त्या दोहोंचीही कार्यपद्धती आहे. त्यामुळे डावे दहशती पकडले गेले की डावे विचारवंत व स्वत:ला मानवतावादी म्हणविणारे अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पत्रके काढतात, लेख लिहितात किंवा न्यायासनाकडे धाव घेतात. उजव्या दहशतवाद्यांना त्याची तेवढीशी गरज नसते. त्यांचे समर्थन करणारे पक्ष व पुढारी देशात आहेत त्यांच्या ‘राष्ट्रीय’ म्हणविणाºया संघटना आहेत आणि सरकारातही त्यांचे चाहते व सहकारी आहेत. त्याचमुळे गेल्या चार वर्षात सामूहिक हत्याकांडात अडकलेले सगळे हिंदुत्ववादी कडवे न्यायालयातूनही निर्दोष सुटले. (बॉम्बचे स्फोट घडविणाºयात साधू वा साध्व्या कशा असतात हा प्रश्न देशातील एकाही राजकारणी माणसाला वा माध्यमाला पडू नये या चमत्काराला कोणते नाव द्यायचे असते) असे सुटून आलेल्या एका साध्वीने ‘पक्ष सोपवील ती जबाबदारी घेण्याचे’ जाहीर केले तर दुसºया एकाने ‘अकारण अटक केली म्हणून’ पोलिसांविरुद्धच न्यायालयात धाव घेण्याचे जाहीर केले. डाव्यांना समर्थक असले तरी त्यांचा सरकारात पायरव नाही आणि त्यांना माध्यमांचा पाठिंबाही नाही.

हेमंत करकरे हे कार्यक्षम पोलीस अधिकारी चंद्रपुरात असताना त्यांनी नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले होते. पुढे मुंबईला असताना मालेगाव बॉम्बस्फोटापासून समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटापर्यंतचे सगळे उजवे हिंसाचारी शस्त्रांसह त्यांनी जेरबंद केले होते. पण करकरे यांच्यासारखीच सगळीच तटस्थ माणसे आपल्या तपास यंत्रणात नसतात. त्यांनाही उजवे वा डावे कळते, त्यातही सत्तेला कोण हवे आणि कोण नको याचाही त्यांना अंदाज असतो. दाभोलकरांचे किंवा पानसºयांचे खुनी, (त्यांचे खून अगोदर झाले असतानाही) कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या खुन्यांच्या तपासानंतरच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती कसे लागले, हा प्रश्न अद्याप कुणी विचारला नसला तरी तो आता विचारला पाहिजे. भारत हा मध्यममार्गी देश आहे. भारतीय माणूसही मध्यममार्गीच आहे. त्याला डावे व उजवे असे दोन्ही कळते. त्याला हे दोन्ही संप्रदाय मान्य नाहीत, त्यातून त्यांचा हिंसाचार काय करू शकतो हे समाजाने अनुभवले आहे. डाव्या किंवा नक्षलवादी म्हणविणाºया लोकांनी एकट्या गडचिरोली जिल्ह्यात सातशेवर आदिवासींचे आणि दीडशेवर पोलिसांचे बळी घेतले आहेत तर हिंदुत्ववादी म्हणविणाºया उजव्यांनी राष्ट्रपिता म. गांधीपासून देशातील अनेक थोरामोठ्यांचे जीव घेतले आहेत. गुजरातेतील हिंसाचार, बिहार व ओरिसातील पूजास्थानांचा बाबरीसारखा केलेला विध्वंस आणि काश्मीरपासून कर्नाटकापर्यंतचे निरपराधांचे बळी त्यांच्याही नावावर आहेत. तात्पर्य हिंसाचार वा कडवेपणा हा डावा असो वा उजवा तो देश व समाज या दोहोंनाही घातक आहे. त्याचा सरकारने कठोरपणे बंदोबस्त केला पाहिजे व समाजानेही त्यापासून स्वत:ला सावध राखले पाहिजे. 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरे