शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

तरुण वयात अपंग होणाऱ्या भावंडांचं गाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:53 IST

खरं तर हे गाव नसून एक मोठा परिवारच आहे.

ब्राझीलमध्ये एक गाव आहे. सेरिन्हा डोस पिंटोस हे या गावाचं नाव. ५००० लोकवस्तीचं हे गाव अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जगात सध्या या गावाची चर्चा आहे. या गावातील बहुसंख्य लोक एकमेकांचे चुलत, मावस, आतेभाऊ-बहीण किंवा रक्ताच्या नात्यानं नातेवाईक आहेत. खरं तर हे गाव नसून एक मोठा परिवारच आहे.

आपलं गाव, आपला समाज आणि आपली कम्युनिटी त्यांनी इतर समाजापासून कायम वेगळी ठेवली. त्यामुळे त्यांचं गावही तसं दुर्गम आणि इतर जगापासून वेगळं आहे. आपलं वैशिष्ट्य कायम ठेवण्यासाठी इतर समाजापासून ते कायम वेगळेच राहिले. त्यामुळे त्यांच्यात लग्नं झाली तीही आपापसातच. चुलत-आते-मामे भावा-बहिणीत किंवा इतर नातेवाइकांत झालेल्या या लग्नांमुळे सगळं गाव तसं एकमेकांचं नातेवाईक आहे. त्यामुळे सगळ्याच गावकऱ्यांचं एकमेकांवर अतिशय जिवापाड प्रेम आणि जिवाला जीव देण्याची आपुलकी. पण या आनंदी गावाला गेल्या काही वर्षांपासून एक शापही मिळाला आहे. 

गावातली मुलं-मुली वयात आली, तरणीताठी झाली की एकाएकी ती अपंग होऊ लागली. त्यांच्यातली चालण्या-फिरण्याची शक्ती अचानक कमी होऊ लागली. जसजसं त्यांचं वय वाढू लागलं तसतसं अनेकांना तर एक पाऊलही टाकणं अशक्य झालं. त्यामुळे या गावात अनेक तरुण मुला-मुलींना आज अपंगांच्या सायकलशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. त्याशिवाय कुठेही ती हिंडू-फिरूच शकत नाही. 

अचानक आपल्या गावात आपल्या मुलांना असा त्रास का होऊ लागलाय, याचं संपूर्ण गावाला कोडं पडलं. ज्यांची मुलं-मुली अपंग झालीत ते पालक आणि ही मुलंही भविष्याच्या चिंतेनं गलितगात्र झाली. देवाचाच बहुतेक आपल्या गावावर कोप झाला, असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात देवाची आराधनाही सुरू केली; पण कसचं काय, काहीही फरक पडला नाही. आजही तिथे अनेक मुलं वयात आली की अपंग होतात..मग यामागचं रहस्य आहे तरी काय? 

सिल्वाना सँटोस ही एक जीवशास्त्रज्ञ वीस वर्षांपूर्वी सहज म्हणून या गावात गेली होती. त्यावेळी तिला कळलं, सगळे गावकरी तसे हट्टेकट्टे, आनंदी, पण यांची मुलं वयात आली की ती अपंग होतात, अचानक त्यांच्या पायांतली शक्ती जाऊ लागते.. हा काय प्रकार आहे, तिलाही काही कळेना. मग त्यावर तिनं अभ्यास सुरू केला. त्यावेळी तिच्या लक्षात आलं, एकमेकांचे नातेवाईक असणं हेच या गावावरचं सर्वांत मोठं संकट आहे. रक्ताच्या नात्यातच सगळ्यांनी लग्नं केल्यामुळे त्यांची मुलं वयात आल्यावर अपंग होताहेत! ‘स्पोआन सिंड्रोम’ हे या विकाराचं नाव. 

इतक्या लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात हा विकार होणं ही खूपच दुर्मीळ घटना होती. किंबहुना जगातली ही पहिलीच घटना असावी. सिल्वानानं अत्यंत कठोर परिश्रम घेऊन एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. तिच्या याच मेहनतीचं फळ म्हणून या विकाराला त्यानंतर वैश्विक मान्यता मिळाली. नात्यांत विवाह केल्यामुळेच, अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे हा विकार संभवतो हे सिद्ध झालं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावर अजूनही काहीच ठोस इलाज नाही. उपचारांच्या माध्यमातून त्याची तीव्रता फक्त कमी केली जाऊ शकते !.. 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीBrazilब्राझील