शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
4
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
5
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
6
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
8
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
9
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
10
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
11
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
12
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
13
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
14
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
15
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
16
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
17
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
18
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
19
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
20
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

तरुण वयात अपंग होणाऱ्या भावंडांचं गाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:53 IST

खरं तर हे गाव नसून एक मोठा परिवारच आहे.

ब्राझीलमध्ये एक गाव आहे. सेरिन्हा डोस पिंटोस हे या गावाचं नाव. ५००० लोकवस्तीचं हे गाव अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जगात सध्या या गावाची चर्चा आहे. या गावातील बहुसंख्य लोक एकमेकांचे चुलत, मावस, आतेभाऊ-बहीण किंवा रक्ताच्या नात्यानं नातेवाईक आहेत. खरं तर हे गाव नसून एक मोठा परिवारच आहे.

आपलं गाव, आपला समाज आणि आपली कम्युनिटी त्यांनी इतर समाजापासून कायम वेगळी ठेवली. त्यामुळे त्यांचं गावही तसं दुर्गम आणि इतर जगापासून वेगळं आहे. आपलं वैशिष्ट्य कायम ठेवण्यासाठी इतर समाजापासून ते कायम वेगळेच राहिले. त्यामुळे त्यांच्यात लग्नं झाली तीही आपापसातच. चुलत-आते-मामे भावा-बहिणीत किंवा इतर नातेवाइकांत झालेल्या या लग्नांमुळे सगळं गाव तसं एकमेकांचं नातेवाईक आहे. त्यामुळे सगळ्याच गावकऱ्यांचं एकमेकांवर अतिशय जिवापाड प्रेम आणि जिवाला जीव देण्याची आपुलकी. पण या आनंदी गावाला गेल्या काही वर्षांपासून एक शापही मिळाला आहे. 

गावातली मुलं-मुली वयात आली, तरणीताठी झाली की एकाएकी ती अपंग होऊ लागली. त्यांच्यातली चालण्या-फिरण्याची शक्ती अचानक कमी होऊ लागली. जसजसं त्यांचं वय वाढू लागलं तसतसं अनेकांना तर एक पाऊलही टाकणं अशक्य झालं. त्यामुळे या गावात अनेक तरुण मुला-मुलींना आज अपंगांच्या सायकलशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. त्याशिवाय कुठेही ती हिंडू-फिरूच शकत नाही. 

अचानक आपल्या गावात आपल्या मुलांना असा त्रास का होऊ लागलाय, याचं संपूर्ण गावाला कोडं पडलं. ज्यांची मुलं-मुली अपंग झालीत ते पालक आणि ही मुलंही भविष्याच्या चिंतेनं गलितगात्र झाली. देवाचाच बहुतेक आपल्या गावावर कोप झाला, असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात देवाची आराधनाही सुरू केली; पण कसचं काय, काहीही फरक पडला नाही. आजही तिथे अनेक मुलं वयात आली की अपंग होतात..मग यामागचं रहस्य आहे तरी काय? 

सिल्वाना सँटोस ही एक जीवशास्त्रज्ञ वीस वर्षांपूर्वी सहज म्हणून या गावात गेली होती. त्यावेळी तिला कळलं, सगळे गावकरी तसे हट्टेकट्टे, आनंदी, पण यांची मुलं वयात आली की ती अपंग होतात, अचानक त्यांच्या पायांतली शक्ती जाऊ लागते.. हा काय प्रकार आहे, तिलाही काही कळेना. मग त्यावर तिनं अभ्यास सुरू केला. त्यावेळी तिच्या लक्षात आलं, एकमेकांचे नातेवाईक असणं हेच या गावावरचं सर्वांत मोठं संकट आहे. रक्ताच्या नात्यातच सगळ्यांनी लग्नं केल्यामुळे त्यांची मुलं वयात आल्यावर अपंग होताहेत! ‘स्पोआन सिंड्रोम’ हे या विकाराचं नाव. 

इतक्या लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात हा विकार होणं ही खूपच दुर्मीळ घटना होती. किंबहुना जगातली ही पहिलीच घटना असावी. सिल्वानानं अत्यंत कठोर परिश्रम घेऊन एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. तिच्या याच मेहनतीचं फळ म्हणून या विकाराला त्यानंतर वैश्विक मान्यता मिळाली. नात्यांत विवाह केल्यामुळेच, अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे हा विकार संभवतो हे सिद्ध झालं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावर अजूनही काहीच ठोस इलाज नाही. उपचारांच्या माध्यमातून त्याची तीव्रता फक्त कमी केली जाऊ शकते !.. 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीBrazilब्राझील