शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

एकांकिका स्पर्धा, अभिवाचन महोत्सवाद्वारे तरुणांच्या कलाविष्काराचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:36 IST

कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची खाण आहे. संधी मिळेल, त्यावेळी हे कलावंत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात आणि क्षमता सिध्द करून दाखवितात. खान्देशातील कलावंतांनी आपल्या कामगिरीने असाच सुखद धक्का दिला आहे.

- मिलिंद कुलकर्णीकला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची खाण आहे. संधी मिळेल, त्यावेळी हे कलावंत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात आणि क्षमता सिध्द करून दाखवितात. खान्देशातील कलावंतांनी आपल्या कामगिरीने असाच सुखद धक्का दिला आहे.पुण्याची महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धे’साठी परिचित आहे. या संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सहा केंद्रांवर या स्पर्धा आयोजित करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. या केंद्रांवर पहिल्या आलेल्या तीन एकांकिकांना पुण्यात होणा-या अंतिम फेरीत सहभागाची संधी दिली जाते. जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी केंद्र देण्यात आले आहे. मू.जे.महाविद्यालयाने सलग दुसºया वर्षी उत्तम आयोजन केले. एकूण १५ एकांकिका सादर झाल्या. एकांकिकांच्या विषयांची विविधता, तरुण कलावंतांचा अभिनय थक्क करणारा होता. स्त्री अत्याचार, मातृभाषेचे महत्त्व, वंशाच्या दिव्याचा आग्रह, प्रेमभंग, सामाजिक विषमता या विषयांसोबतच पुरुषप्रधान संस्कृती, फाळणी, विवाह पध्दती, वृध्दत्व, शहीद जवानावरून राजकारण, कलावंतांची होरपळ अशा वेगळ्या विषयांना हात घालण्यात आला. आपली तरुणाई किती व्यापक आणि व्यासंगीपणे जीवनाचा वेध घेत आहे, याचे हे सुचिन्ह म्हणावे लागेल. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे हे बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते.असाच आणखी एक साहित्यिक उपक्रम ‘परिवर्तन’ या प्रतिष्ठित संस्थेने ‘अभिवाचन महोत्सवा’च्या रूपाने घेतला. यंदाचे हे तिसरे वर्ष होते. रवींद्रनाथ टागोर, जयवंत दळवी, भालचंद्र नेमाडेंपासून तर प्रल्हाद जाधव, श्रीकांत देशमुख, कविता महाजन यांच्यापर्यंतच्या तब्बल १२ साहित्यिकांच्या कलाकृतींचे अभिवाचन या सप्ताहात करण्यात आले. रंगभूमीवरील कलावंतांसोबतच प्रथमच अभिवाचन करणाºया वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना देण्यात आलेली संधी हे या उपक्रमातील वेगळेपण होते. वाचन संस्कृती समृध्द करूया हे ब्रीदवाक्य या महोत्सवाने सार्थ ठरविले.कवी गणेश चौधरी आणि साहित्यिक दिवाकर चौधरी यांच्या डांभुर्णी या गावातील योगेश पाटील या हरहुन्नरी दिग्दर्शकाने स्थानिक कलावंतांना सोबत घेऊन तयार केलेल्या ‘कंदील’ या लघुपटाला सात आर.सी. फिल्म फेस्टिव्हलमध्ये तृतीय बक्षीस मिळाले. १२०० लघुपटांच्या प्रवेशिकांमधून ‘कंदील’ची निवड झाली, यावरून या लघुपटाच्या उत्तम कलागुण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांची कल्पना यावी. विशेष म्हणजे या लघुपटात काम केलेल्या एकाही कलावंताने यापूर्वी अभिनय केलेला नव्हता. त्यांची पूर्ण तयारी आणि प्रशिक्षण योगेश पाटील याने करवून घेतले. असाच एक गुणी कलावंत, दिग्दर्शक जळगावकर राहुल चौधरी याने मुंबईत केलेल्या संघर्षाचे चीज झाले. ‘बंदुक्या’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला व्यावसायिक चित्रपट प्रदर्शित होताच जळगावकरांना आभाळ ठेंगणे वाटू लागले. परिवर्तनने त्याचा नागरी सत्कारदेखील केला. या घटना म्हणजे खान्देशातील कला प्रांताला ऊर्जितावस्था आणणाºया आहेत.