शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

एकांकिका स्पर्धा, अभिवाचन महोत्सवाद्वारे तरुणांच्या कलाविष्काराचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:36 IST

कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची खाण आहे. संधी मिळेल, त्यावेळी हे कलावंत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात आणि क्षमता सिध्द करून दाखवितात. खान्देशातील कलावंतांनी आपल्या कामगिरीने असाच सुखद धक्का दिला आहे.

- मिलिंद कुलकर्णीकला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची खाण आहे. संधी मिळेल, त्यावेळी हे कलावंत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात आणि क्षमता सिध्द करून दाखवितात. खान्देशातील कलावंतांनी आपल्या कामगिरीने असाच सुखद धक्का दिला आहे.पुण्याची महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धे’साठी परिचित आहे. या संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सहा केंद्रांवर या स्पर्धा आयोजित करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. या केंद्रांवर पहिल्या आलेल्या तीन एकांकिकांना पुण्यात होणा-या अंतिम फेरीत सहभागाची संधी दिली जाते. जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी केंद्र देण्यात आले आहे. मू.जे.महाविद्यालयाने सलग दुसºया वर्षी उत्तम आयोजन केले. एकूण १५ एकांकिका सादर झाल्या. एकांकिकांच्या विषयांची विविधता, तरुण कलावंतांचा अभिनय थक्क करणारा होता. स्त्री अत्याचार, मातृभाषेचे महत्त्व, वंशाच्या दिव्याचा आग्रह, प्रेमभंग, सामाजिक विषमता या विषयांसोबतच पुरुषप्रधान संस्कृती, फाळणी, विवाह पध्दती, वृध्दत्व, शहीद जवानावरून राजकारण, कलावंतांची होरपळ अशा वेगळ्या विषयांना हात घालण्यात आला. आपली तरुणाई किती व्यापक आणि व्यासंगीपणे जीवनाचा वेध घेत आहे, याचे हे सुचिन्ह म्हणावे लागेल. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे हे बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते.असाच आणखी एक साहित्यिक उपक्रम ‘परिवर्तन’ या प्रतिष्ठित संस्थेने ‘अभिवाचन महोत्सवा’च्या रूपाने घेतला. यंदाचे हे तिसरे वर्ष होते. रवींद्रनाथ टागोर, जयवंत दळवी, भालचंद्र नेमाडेंपासून तर प्रल्हाद जाधव, श्रीकांत देशमुख, कविता महाजन यांच्यापर्यंतच्या तब्बल १२ साहित्यिकांच्या कलाकृतींचे अभिवाचन या सप्ताहात करण्यात आले. रंगभूमीवरील कलावंतांसोबतच प्रथमच अभिवाचन करणाºया वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना देण्यात आलेली संधी हे या उपक्रमातील वेगळेपण होते. वाचन संस्कृती समृध्द करूया हे ब्रीदवाक्य या महोत्सवाने सार्थ ठरविले.कवी गणेश चौधरी आणि साहित्यिक दिवाकर चौधरी यांच्या डांभुर्णी या गावातील योगेश पाटील या हरहुन्नरी दिग्दर्शकाने स्थानिक कलावंतांना सोबत घेऊन तयार केलेल्या ‘कंदील’ या लघुपटाला सात आर.सी. फिल्म फेस्टिव्हलमध्ये तृतीय बक्षीस मिळाले. १२०० लघुपटांच्या प्रवेशिकांमधून ‘कंदील’ची निवड झाली, यावरून या लघुपटाच्या उत्तम कलागुण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांची कल्पना यावी. विशेष म्हणजे या लघुपटात काम केलेल्या एकाही कलावंताने यापूर्वी अभिनय केलेला नव्हता. त्यांची पूर्ण तयारी आणि प्रशिक्षण योगेश पाटील याने करवून घेतले. असाच एक गुणी कलावंत, दिग्दर्शक जळगावकर राहुल चौधरी याने मुंबईत केलेल्या संघर्षाचे चीज झाले. ‘बंदुक्या’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला व्यावसायिक चित्रपट प्रदर्शित होताच जळगावकरांना आभाळ ठेंगणे वाटू लागले. परिवर्तनने त्याचा नागरी सत्कारदेखील केला. या घटना म्हणजे खान्देशातील कला प्रांताला ऊर्जितावस्था आणणाºया आहेत.