शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

एकांकिका स्पर्धा, अभिवाचन महोत्सवाद्वारे तरुणांच्या कलाविष्काराचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:36 IST

कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची खाण आहे. संधी मिळेल, त्यावेळी हे कलावंत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात आणि क्षमता सिध्द करून दाखवितात. खान्देशातील कलावंतांनी आपल्या कामगिरीने असाच सुखद धक्का दिला आहे.

- मिलिंद कुलकर्णीकला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची खाण आहे. संधी मिळेल, त्यावेळी हे कलावंत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात आणि क्षमता सिध्द करून दाखवितात. खान्देशातील कलावंतांनी आपल्या कामगिरीने असाच सुखद धक्का दिला आहे.पुण्याची महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धे’साठी परिचित आहे. या संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सहा केंद्रांवर या स्पर्धा आयोजित करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. या केंद्रांवर पहिल्या आलेल्या तीन एकांकिकांना पुण्यात होणा-या अंतिम फेरीत सहभागाची संधी दिली जाते. जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी केंद्र देण्यात आले आहे. मू.जे.महाविद्यालयाने सलग दुसºया वर्षी उत्तम आयोजन केले. एकूण १५ एकांकिका सादर झाल्या. एकांकिकांच्या विषयांची विविधता, तरुण कलावंतांचा अभिनय थक्क करणारा होता. स्त्री अत्याचार, मातृभाषेचे महत्त्व, वंशाच्या दिव्याचा आग्रह, प्रेमभंग, सामाजिक विषमता या विषयांसोबतच पुरुषप्रधान संस्कृती, फाळणी, विवाह पध्दती, वृध्दत्व, शहीद जवानावरून राजकारण, कलावंतांची होरपळ अशा वेगळ्या विषयांना हात घालण्यात आला. आपली तरुणाई किती व्यापक आणि व्यासंगीपणे जीवनाचा वेध घेत आहे, याचे हे सुचिन्ह म्हणावे लागेल. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे हे बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते.असाच आणखी एक साहित्यिक उपक्रम ‘परिवर्तन’ या प्रतिष्ठित संस्थेने ‘अभिवाचन महोत्सवा’च्या रूपाने घेतला. यंदाचे हे तिसरे वर्ष होते. रवींद्रनाथ टागोर, जयवंत दळवी, भालचंद्र नेमाडेंपासून तर प्रल्हाद जाधव, श्रीकांत देशमुख, कविता महाजन यांच्यापर्यंतच्या तब्बल १२ साहित्यिकांच्या कलाकृतींचे अभिवाचन या सप्ताहात करण्यात आले. रंगभूमीवरील कलावंतांसोबतच प्रथमच अभिवाचन करणाºया वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना देण्यात आलेली संधी हे या उपक्रमातील वेगळेपण होते. वाचन संस्कृती समृध्द करूया हे ब्रीदवाक्य या महोत्सवाने सार्थ ठरविले.कवी गणेश चौधरी आणि साहित्यिक दिवाकर चौधरी यांच्या डांभुर्णी या गावातील योगेश पाटील या हरहुन्नरी दिग्दर्शकाने स्थानिक कलावंतांना सोबत घेऊन तयार केलेल्या ‘कंदील’ या लघुपटाला सात आर.सी. फिल्म फेस्टिव्हलमध्ये तृतीय बक्षीस मिळाले. १२०० लघुपटांच्या प्रवेशिकांमधून ‘कंदील’ची निवड झाली, यावरून या लघुपटाच्या उत्तम कलागुण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांची कल्पना यावी. विशेष म्हणजे या लघुपटात काम केलेल्या एकाही कलावंताने यापूर्वी अभिनय केलेला नव्हता. त्यांची पूर्ण तयारी आणि प्रशिक्षण योगेश पाटील याने करवून घेतले. असाच एक गुणी कलावंत, दिग्दर्शक जळगावकर राहुल चौधरी याने मुंबईत केलेल्या संघर्षाचे चीज झाले. ‘बंदुक्या’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला व्यावसायिक चित्रपट प्रदर्शित होताच जळगावकरांना आभाळ ठेंगणे वाटू लागले. परिवर्तनने त्याचा नागरी सत्कारदेखील केला. या घटना म्हणजे खान्देशातील कला प्रांताला ऊर्जितावस्था आणणाºया आहेत.