शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ द्वेष

By admin | Updated: August 9, 2016 00:59 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी राजकीय पक्षांच्या वर्तुळात अधून-मधून चर्चेला येते, त्यावर वादळ उठते, आरोप-प्रत्यारोप होतात आणि हा विषय ज्या वेगाने येतो

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी राजकीय पक्षांच्या वर्तुळात अधून-मधून चर्चेला येते, त्यावर वादळ उठते, आरोप-प्रत्यारोप होतात आणि हा विषय ज्या वेगाने येतो त्याच वेगाने विरूनही जातो. परवा महाराष्ट्राच्या विधिमंडळात विदर्भ राज्याच्या आंदोलनाची पुन्हा एकदा चर्चा झाली. शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला विरोध केला, तर भाजपाच्या वैदर्भीय नेत्यांनी या मागणीचे समर्थन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका त्यांच्या राजकीय असहाय्यतेचा एक भाग होती. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, विदर्भ राज्याची मागणी ही सर्वच राजकीय पक्षांच्या मतलबी आणि घाणेरड्या राजकारणाचा एक भाग बनली आहे. वैदर्भीय जनतेला विदर्भ राज्य हवे आहे. पण, ती मागणी पुढे नेणाऱ्या येथील नेत्यांमध्ये एकजूट नसल्याने नेमकी हीच संधी साधून हे राजकीय पक्ष स्वार्थासाठी त्याचा असा वापर करून घेत असतात.परवा विधिमंडळात तेच घडले. राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे यांनी विदर्भाच्या मागणीला विरोध करताना विदर्भावर आजवर होत असलेल्या अन्यायाची साधी दखलही घेतली नाही. राणे मुख्यमंत्री राहिले आहेत, विखे पाटील विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेचे खुशाल समर्थनही करावे; पण, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सतत अन्याय सहन करीत असलेल्या एका प्रदेशाच्या अस्मितेचा अपमान करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांचा नेहमी उल्लेख होतो. या हुतात्म्यांबद्दल वैदर्भीय माणसाला आदरच आहे. पण विदर्भद्वेषातून आणि विदर्भ राज्याला विरोध करण्याच्या मानसिकेतून हे हौतात्म्य चर्चिले जाते, ही खेदाची बाब आहे. १८८८ पासून विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे. या १२८ वर्षांच्या काळात विदर्भ राज्यनिर्मितीच्या आंदोलनात शेकडो लोकांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाची तुम्ही दखल घेणार की नाही?विदर्भाला विरोध करताना राणे, विखेंनी आपल्याच पक्षाचा इतिहास पडताळून बघायला हवा. विदर्भ महाराष्ट्रात राहिले तरच काँग्रेसची सत्ता राहील, हे ठाऊक असल्याने यशवंतराव चव्हाणांनी पंडित नेहरूंना वेगळे विदर्भ राज्य निर्माण करू दिले नाही. आता तेच राजकारण भाजपा करीत आहे. कारण विदर्भातील $४४ आमदारांच्या बळावर भाजपाचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपा नेत्यांनी आपली फसगत करून सत्ता मिळवली असे विदर्भातील जनतेला प्रकर्षाने जाणवू लागले आहे. भाजपाने मूर्ख बनवले, काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते विरोधात, स्थानिक नेते संभ्रमात, हायकमांड शांतपणे हा खेळ पाहत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला भूमिकाच नाही, अशा राजकीय चक्रव्यूहात विदर्भ राज्याची चळवळ सापडली आहे. विदर्भवाद्यांमध्ये एकजूट नाही. प्रत्येकाला स्वत:चे महत्त्व वाढवायचे आणि श्रेय लाटायचे आहे. यातील अनेकांना विदर्भ राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची आतापासूनच स्वप्ने पडू लागली आहेत. काहींनी वेगवेगळ्या राहुट्या उभारून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विदर्भवाद्यांची दहा तोंडे दहा दिशेला हाच विदर्भ राज्याच्या निर्मितीतला सर्वात मोठा अडथळा आहे. विदर्भातील जनता आज प्रामाणिक, लढवय्या, सर्वस्व झोकून देणाऱ्या नेतृत्वाच्या शोधात आहे. ‘जनमंच’ या सामाजिक संस्थेने तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या जनमत चाचणीत सहा लाख लोकांनी केलेले मतदान हा तसे नेतृत्व शोधण्याचा एक आश्वासक प्रयत्न होता.वैदर्भीय जनतेच्या मनातील नेतृत्वाची ही आस अनिवासी आणि प्रवासी आंदोलनाने पूर्ण होणार नाही. नागपुरात यायचे, पत्रपरिषद घ्यायची, टीव्हीवरील चर्चेत सहभागी व्हायचे, विदर्भाबाबत एखादे खळबळजनक विधान करायचे आणि मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मुंबईला निघून जायचे. विदर्भ अशाने अजिबात मिळणार नाही. विदर्भाच्या प्रश्नावर एकरूप व्हा, सुख-दु:खात सहभागी व्हा मग बघा हीच जनता स्वयंप्रेरणेतून भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी राहील.- गजानन जानभोर